शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

जिल्ह्यात दुपारी 2 वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:27 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. ...

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सध्या नियंत्रणात असली, तरी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आवश्यक ती काळजी न घेतल्यास तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला खबरदारी बाळगावी लागणार आहे. व्यापारी, ग्राहकांनीही कोरोना विषाणूविषयक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येक आस्थापना मालकासह आस्थापनेत कार्यरत कामगारांची दर आठवड्याला कोरोना विषयक चाचण्या करणे अत्यावश्यक आहे. तसेच दर शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्हिटीचा आढावा घेवून पॉझिटिव्हीटी वाढताना दिसल्यास शिथिल केलेल्या निर्बंधांबाबत पुनर्विचार करण्यात येईल. शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कार्यवाहीचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना असतील.

अश्या कोरोना विषयक नियमांच्या अंमलबजावणी होते किंवा कसे हे तपासण्यासाठी महानगरपालिका, पोलिस व प्रांत अधिकारी यांनी नेमलेले क्षेत्रीय अधिकारी यांची संयुक्त फिरती पथके गठित करावीत. तसेच व्यापक जनजागृतीसाठी मोहीम राबवावी. व्यापारी महासंघाने आपल्या स्तरावर पथके गठित करून व्यापाऱ्यांना नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करावे. कोरोना बाधित रुग्णांसाठी असलेली गृह विलगीकरणाची सुविधा पूर्णत: बंद करन अशा रुग्णांना नजीकच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी यादव यांनी दिल्या.

पोलिस अधीक्षक पंडित यांनी सांगितले, गर्दी टाळण्यासाठी आस्थापनांनी नियोजन करावे. व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनेटायझर, दो गज की दुरी या सूत्राचा नियमितपणे वापर करावा. महानगरपालिकेचे आयुक्त शेख यांनी सांगितले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेतर्फे आस्थापना मालक व कामगारांची दर आठवड्याला तपासणी करण्यात येईल. मात्र, व्यापाऱ्यांनी मास्क, सॅनेटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक राहील. बंग यांनी सांगितले, की सर्व व्यापारी बांधव राज्य शासनाच्या नियमांचे पालन करतील. तसेच दर आठवड्याला कोरोना चाचणी करून घेतील. प्रशासनाच्या सहकार्यासाठी व्यापाऱ्यांची पथके गठित करण्यात येतील, असे सांगितले.