शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

बियाणे प्रक्रिया, साठवण गृह योजना प्रस्तावांची चाैकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:32 IST

धुळे : बियाणे प्रक्रिया व साठवण गृह योजनेत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या प्रस्तावांमध्ये राज्य शासनाने घोळ घातला असून या ...

धुळे : बियाणे प्रक्रिया व साठवण गृह योजनेत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या प्रस्तावांमध्ये राज्य शासनाने घोळ घातला असून या प्रकरणाची चाैकशी करावी, अशी मागणी बीजोत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे पदाधिकारी व शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्न पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन निवेदन दिले. शेतकऱ्यांनादेखील पद्मविभूषण, पद्मश्री यांसारखे पुरस्कार द्यावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली. केंद्र शासनाने बियाणे प्रक्रिया व साठवण गृह योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत ६० लाखांपर्यंत अनुदान मिळते. या याजनेसाठी २१ प्रस्तावांची छाननी करून केंद्र सरकारकडे पाठविले होते. केंद्राने २१ प्रस्तावांना मंजुरी देत १२ कोटी ६० लाख रुपयांचा निधी राज्य शासनाला दिला. मात्र राज्य शासनाने हा निधी वितरीत केलाच नाही. याऊलट २० मार्च २०२० मध्ये १५ प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली. त्यानंतर १० मार्चला ७ प्रस्ताव मंजूर केले. त्यापैकी दोन प्रस्ताव केंद्राच्या मंजुरी यादीत नाहीत. केंद्राने दिलेला निधी दोन वर्षे खर्च न करणे, मूळ मंजूर यादीत बदल करून ऐनवेळी नवीन मंजुरी देण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चाैकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बीजोत्पादन करणारे शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. केंद्र शासन राज्याचा हक्काचा निधी देत नाही तर राज्य शासन विविध योजनांसाठी मिळणारा निधी खर्च करत नाही. केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्राधान्य देण्याचे धोरण जाहीर करते. परंतु कृषी विद्यापीठ या धोरणाच्या विरोधात निर्णय घेते. यामुळे हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.

बीजोत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून कृषी विद्यापीठातर्फे फी व राॅयल्टी घेण्यात येते. हा चुकीचा प्रकार थांबविण्यात यावा. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत केंद्र शासनाने राज्य शासनाला निधी दिला आहे. या निधीतून राज्य शासन शेतकरी प्रमाणित बियाणे अनुदान देते. हे अनुदान महाबीज, नॅशनल सीड काॅर्पोरेशन, शेतकरी उत्पादक कंपन्यांना देण्यात येते. पुरस्कारात शेतकरी उत्पादक कंपन्यांना वगळले आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही अनुदान द्यावे. पद्मविभूषण, पद्मश्री सारखे पुरस्कार शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणीही निवेदनात केली आहे.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याशी चर्चा करून समस्यांचा निपटारा करण्याचे आश्वासन रावसाहेब दानवे यांनी दिले. शिष्टमंडळात शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाचे राज्याध्यक्ष प्रकाश पाटील, अनंता पाटील, भाऊसाहेब कदम, गणेश नवले, राजू गाडे, श्रीकांत आखाडे, भगवानसिंग इंगळे, दत्तात्रय पाटील, चंद्रकांत क्षीरसागर, योगराज पवार आदींचा समावेश होता.