शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

रब्बी कांद्याला खंडित वीजपुरवठा

By admin | Updated: January 7, 2017 00:33 IST

वेळापत्रक कोलमडले : शेतात पाणी भरण्यासाठी शेतक:यांची धडपड

पिंपळनेर : सद्य:स्थितीत रब्बी हंगामास वेगात सुरुवात झाली असून कांदा लागवड अंतिम टप्प्यात असल्याने पीक  जगवण्यासाठी रात्रंदिवस शेतात पाणी भरण्यासाठी शेतक:यांना थंडीत जावे लागते. त्यातच पाण्याचे वेळापत्रक देऊनसुद्धा त्यात मोठय़ा प्रमाणात विजेचा लपंडाव सुरू असून अखंडित वीज मिळावी, अशी मागणी शेतक:यांनी केली आहे. रब्बी हंगाम सुरू झाला असून शेतक:यांनी गहू, कांदा, मका, ऊस यांची लागवड केली आहे. पिकांना योग्यवेळी पाणी मिळावे यासाठी शेतक:यांची पाणी भरण्यासाठी धडपड सुरू आहे. यात वीज वितरण विभागाने कृषीसाठी स्वतंत्र लाईनचे आठवडय़ाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. मात्र शेतक:यांना त्या वेळापत्रकानुसार वीजपुरवठा केला जात असला तरी त्या वेळेतच असंख्य वेळेस वीजपुरवठा खंडित होत असल्याने तसेच रात्री-पहाटे फ्यूज उडून जात असल्याने फ्यूज नव्याने टाकावा लागतो. पाण्याचा भरणा योग्यवेळी पूर्ण होत नाही. शेतक:यांना थंडीत पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे. अशा अनेक प्रकारच्या समस्या शेतक:यांना येत आहेत.सध्या शेतक:यांना रब्बी हंगामासाठी सोमवार ते गुरुवार रोज रात्री 12 ते सकाळी 10 वाजेर्पयत वीजपुरवठा सुरू असतो. तर शुक्रवार ते रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी सहा वाजेर्पयत पुरवठा देण्यात आला आहे. यात सोमवार ते गुरुवार ही जी रात्रीची वेळ वीज मंडळातर्फे देण्यात आली आहे त्यातही रात्री ब:याच वेळा पुरवठा खंडित होतो. तसेच फ्यूज उडतो. म्हणजे जे शेतकरी रात्री-पहाटे शेतात पाणी भरतात त्यांना या अडचणी येतात. तसेच रात्री-पहाटे शेतात लाईट गेल्यानंतर शेतात थांबून राहावे लागते. विजेची वाट पाहावी लागते. रात्रीच्या वेळी थंडी, तसेच विंचूकाटय़ाची, साप, जनावरे यांची भीती असते. रात्री फ्यूज उडाला तर वायरमन रात्री येत नाहीत. पाणी भरणे थांबते. यामुळे पिकं खराब होतात. सोमवार ते गुरुवार रात्री 12 ते सकाळी 10 वाजेर्पयत जी वीज मिळते ती 10 तास मिळते. तर शुक्रवार ते रविवार या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी सहा वाजेर्पयत म्हणजे आठ तास वीज मिळते. शेतक:यांची मागणी आहे की, जी रात्रीची वीज मिळते ती दिवसा करावी, त्यामुळे          शेतक:यांना पाणी भरणे सोपे होणार आहे. सरकारने दिवसा 12 तास लाईट द्यावी. रात्रीच्या वेळी जीवाला धोका असतो. नुकत्याच पाच दिवसांपूर्वी इनाम शिवारात तरस मयत आढळून आला. यामुळे शेतक:यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.