शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

अमरावती प्रकल्पात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 21:26 IST

मालपूर : भीषण पाणीटंचाईचे सावट, प्रकल्पाच्या पात्रात चार विहीरीचे खोदकाम फेल

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे आतापासूनच दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. अमरावती मध्यम प्रकल्प हा एकमेव गावाची तहान भागविण्याचा पर्याय असून तेथेही संपूर्णपणे पाण्याचा साठा संपला आहे. यामुळे पाणीटंचाई भीषण स्वरुप धारण करणार आहे. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात जमिनीत झिरपलेले पाणी पोकलँड मशिनच्या सहाय्याने मोठा खड्डा करुन जलस्त्रोत वाढविण्याचा सध्या प्रयत्न दिसून येत आहे.कधी नव्हे एवढे भीषण पाण्याचे संकट मालपूर गावावर घिरट्या घालत आहे. सुमारे २० हजार लोकवस्तीच्या गावाची तहान कशी भागवावी या विवंचनेत ग्रामपंचायत प्रशासन दिसून येत आहे. यासाठी वेळ न घालवता नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पदभार स्विकारण्याच्या आधीच येथील अमरावती मध्यम प्रकल्पात नवीन विहीरीचे खोदकाम युद्धपातळीवर सुरु केले. चार ठिकाणी आधुनिक पोकलँडच्या यंत्राच्या सहाय्याने भला मोठा खड्डा केला. मात्र, १५ ते २० फुटावर खडक लागल्याने अपयश आले. पाचव्या ठिकाणी प्रयत्नांना थोडेफार यश आले. मात्र, यावर आगामी पावसाळ्यापर्यंत गावाची तहान भागेल, याची शाश्वती नाही. याशिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्यामुळे मालपूर गावावर पाण्याचे संकट गडद होतांना दिसत आहे. एवढ्या मोठ्या गावाला टँकरने पाणीपुरवठा करणेही अशक्य असून या संकटाचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकारी काय उपाययोजना करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Dhuleधुळे