शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

कोरोनामुळे भीमस्मृती यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 22:11 IST

प्रमुख २० पदाधिकाऱ्यांना परवानगी : प्रातिनिधीक स्वरुपात बाबासाहेबांना अभिवादन

धुळे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन दिवस मुक्काम केलेल्या लळींग कुरणातील लांडोर बंगल्यावरील भीम स्मृती यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे़ गेल्या वीस वर्षांपासून भरणारा भीम अनुयायांचा या मेळाव्याला कोरोनाच्या संसर्गामुळे पहिल्यांदाच खंड पडणार आहे़दरवर्षी ३१ जुलैला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यासह शेजारच्या गुररात आणि मध्यप्रदेशातील हजारो अनुयायी लांडोर बंगल्यावर येतात़ परंतु यावर्षी कोरोनाची आपत्ती असल्याने गर्दीमुळे विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने भीम स्मृती यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे़ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियासह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या भीम अनुयायांनी देखील प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला असून समाज बांधवांनी घरी राहूनच अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे़प्रातिनिधीक स्वरुपात अभिवादन करण्यासाठी प्रमुख २० पदाधिकाऱ्यांना लांडोर बंगल्यावर जाण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे़ त्यात रिपाईचे नेते वाल्मिक दामोदर, जिल्हाध्यक्ष शशीकांत वाघ, दिलिप साळवे, शोभा चव्हाण, नयना दामोदर, राजू शिरसाठ, महेंद्र निळे यांच्यासह इतर पदाधिकाºयांचा समावेश आहे़ सकाळी १० वाजता शहरातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पदाधिकरी लांडोर बंगल्यावर जाणार आहेत़दरम्यान, लांडोर बंगल्यावर गर्दी होवू नये यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावरील प्रवेशद्वार बांबू लावून बंद करण्यात आले आहे़ याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे़ तसेच लळींग कुरणातील लांडोर बंगल्याचे प्रवेशद्वार देखील कुलूप लावून बंद करण्यात आले आहे़ लांडोर बंगल्याकडे जाणाºया इतरही छुप्या रस्त्यांवर पोलिसांचा पहारा असणार आहे़भीमस्मृती यात्रा रद्द झाली असली तरी या दिवसाचे महत्व असल्याने वन विभागातर्फे लांडोर बंगल्याचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे़ बंगल्याच्या चौफेर पेव्हर ब्लॉक लावण्यात आले आहेत़मोहाडी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत यांनी सांगितले की, कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य शासनाने साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केलेला आहे़ या कायद्यातील तरतुदीनुसार जाहीर कार्यक्रमांवर प्रतिबंध लावला आहे़ आदेशाचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई केली जाणार आहे़डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांचा धुळे शहरात तीन दिवस मुक्कामभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धुळे शहरात तीन दिवस मुक्काम केला होता. सन १९३७ मध्ये ते शहरात न्यायालयीन कामकाजासाठी आले होते. तवंग नावाच्या वकिलांचा खटला चालविण्यासाठी त्यांना धुळे शहरात बोलाविण्यात आले होते. त्यावेळी बाबासाहेबांनी दि. २९, ३० व ३१ जुलै १९३७ ला तीन दिवस शहरातील मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या लळींग किल्ल्यावरील लांडोर बंगला येथे मुक्काम केला आणि धुळे जिल्हा व शहराची सविस्तर माहिती घेतली होती. त्याकाळात शहरातील अ‍ॅड. प्रेमसिंग तवंग यांच्या खटल्याच्या कामकाजाला मदत करण्यासाठी डॉ. आंबेडकर हे धुळे शहरात आले असता त्यांनी शहरातील विजयांनद चित्रमंदिरामध्ये जाहीर सभा घेवून जनतेला मार्गदर्शन केले. धुळ्यातील असंख्य कार्यकर्त्यांसह लळींग किल्ल्यावर विश्वासू लाडके सेवक पुनाजी लळींगकर यांना भेटायला गेले. त्यांच्या घरीच भोजन करून डोंगरावरील लांडोर बंगल्यावर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी करण्यात आल्या. या तीन दिवसांच्या मुक्कामात बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांना, समाजाला आणि महिलांना उपदेश व मार्गदर्शन केले. गप्पा, विनोदात वेळ घातला. बाबासाहेबांनी शहरातील गरूड वाचनालयाला भेट दिली आणि इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळाला देखील भेट देऊन अभिप्राय नोंद केला आहे. त्याचा आजही संग्रह आहे. आण्णासाहेब लळींकरांची बहिण कृष्णाबाई यांनी स्वरचित अहिराणी गीते गावून तर तालुक्यातील नरव्हाळचे दिवंगत रतन जाधव या शाहीराने आपल्या शाहिरीतून बाबासाहेबांचे मनोरंजन केले. दि. १ आॅगस्टला बाबासाहेब मुंबईला परत जाताना आण्णासाहेब लळींगकरांना तात्कालीन धुळे जिल्ह्यातील तालुका असलेल्या नंदुरबार या आदिवासी मागास असलेल्या गावी जावून शैक्षणिक कार्य करण्याचे आदेश दिले. त्यानंतर लळींगकर यांनी नंदुरबार शहरात जिल्ह्याचे तत्कालीन धुळे जिल्हाधिकारी कॅप्टन कुºहे यांच्या हुकुमाने साक्री नाका परिसरात पातळगंगा नदीकिनारी जागा मिळवली होती आणि त्याठिकाणी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी छात्रालयाची स्थापना करण्यात आली. यानिमित्त अजूनही ३१ जुलै रोजी लळिंग किल्ल्यावरील लांडोर बंगला येथे दलित बांधवांचा मेळावा भरतो. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

टॅग्स :Dhuleधुळे