शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
3
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
4
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
5
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
6
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
7
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
9
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
10
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
11
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
12
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
13
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
14
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
16
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
17
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
18
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
19
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
20
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक

कोरोनामुळे भीमस्मृती यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 22:11 IST

प्रमुख २० पदाधिकाऱ्यांना परवानगी : प्रातिनिधीक स्वरुपात बाबासाहेबांना अभिवादन

धुळे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन दिवस मुक्काम केलेल्या लळींग कुरणातील लांडोर बंगल्यावरील भीम स्मृती यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे़ गेल्या वीस वर्षांपासून भरणारा भीम अनुयायांचा या मेळाव्याला कोरोनाच्या संसर्गामुळे पहिल्यांदाच खंड पडणार आहे़दरवर्षी ३१ जुलैला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यासह शेजारच्या गुररात आणि मध्यप्रदेशातील हजारो अनुयायी लांडोर बंगल्यावर येतात़ परंतु यावर्षी कोरोनाची आपत्ती असल्याने गर्दीमुळे विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने भीम स्मृती यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे़ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियासह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या भीम अनुयायांनी देखील प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला असून समाज बांधवांनी घरी राहूनच अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे़प्रातिनिधीक स्वरुपात अभिवादन करण्यासाठी प्रमुख २० पदाधिकाऱ्यांना लांडोर बंगल्यावर जाण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे़ त्यात रिपाईचे नेते वाल्मिक दामोदर, जिल्हाध्यक्ष शशीकांत वाघ, दिलिप साळवे, शोभा चव्हाण, नयना दामोदर, राजू शिरसाठ, महेंद्र निळे यांच्यासह इतर पदाधिकाºयांचा समावेश आहे़ सकाळी १० वाजता शहरातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पदाधिकरी लांडोर बंगल्यावर जाणार आहेत़दरम्यान, लांडोर बंगल्यावर गर्दी होवू नये यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावरील प्रवेशद्वार बांबू लावून बंद करण्यात आले आहे़ याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे़ तसेच लळींग कुरणातील लांडोर बंगल्याचे प्रवेशद्वार देखील कुलूप लावून बंद करण्यात आले आहे़ लांडोर बंगल्याकडे जाणाºया इतरही छुप्या रस्त्यांवर पोलिसांचा पहारा असणार आहे़भीमस्मृती यात्रा रद्द झाली असली तरी या दिवसाचे महत्व असल्याने वन विभागातर्फे लांडोर बंगल्याचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे़ बंगल्याच्या चौफेर पेव्हर ब्लॉक लावण्यात आले आहेत़मोहाडी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत यांनी सांगितले की, कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य शासनाने साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केलेला आहे़ या कायद्यातील तरतुदीनुसार जाहीर कार्यक्रमांवर प्रतिबंध लावला आहे़ आदेशाचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई केली जाणार आहे़डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांचा धुळे शहरात तीन दिवस मुक्कामभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धुळे शहरात तीन दिवस मुक्काम केला होता. सन १९३७ मध्ये ते शहरात न्यायालयीन कामकाजासाठी आले होते. तवंग नावाच्या वकिलांचा खटला चालविण्यासाठी त्यांना धुळे शहरात बोलाविण्यात आले होते. त्यावेळी बाबासाहेबांनी दि. २९, ३० व ३१ जुलै १९३७ ला तीन दिवस शहरातील मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या लळींग किल्ल्यावरील लांडोर बंगला येथे मुक्काम केला आणि धुळे जिल्हा व शहराची सविस्तर माहिती घेतली होती. त्याकाळात शहरातील अ‍ॅड. प्रेमसिंग तवंग यांच्या खटल्याच्या कामकाजाला मदत करण्यासाठी डॉ. आंबेडकर हे धुळे शहरात आले असता त्यांनी शहरातील विजयांनद चित्रमंदिरामध्ये जाहीर सभा घेवून जनतेला मार्गदर्शन केले. धुळ्यातील असंख्य कार्यकर्त्यांसह लळींग किल्ल्यावर विश्वासू लाडके सेवक पुनाजी लळींगकर यांना भेटायला गेले. त्यांच्या घरीच भोजन करून डोंगरावरील लांडोर बंगल्यावर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी करण्यात आल्या. या तीन दिवसांच्या मुक्कामात बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांना, समाजाला आणि महिलांना उपदेश व मार्गदर्शन केले. गप्पा, विनोदात वेळ घातला. बाबासाहेबांनी शहरातील गरूड वाचनालयाला भेट दिली आणि इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळाला देखील भेट देऊन अभिप्राय नोंद केला आहे. त्याचा आजही संग्रह आहे. आण्णासाहेब लळींकरांची बहिण कृष्णाबाई यांनी स्वरचित अहिराणी गीते गावून तर तालुक्यातील नरव्हाळचे दिवंगत रतन जाधव या शाहीराने आपल्या शाहिरीतून बाबासाहेबांचे मनोरंजन केले. दि. १ आॅगस्टला बाबासाहेब मुंबईला परत जाताना आण्णासाहेब लळींगकरांना तात्कालीन धुळे जिल्ह्यातील तालुका असलेल्या नंदुरबार या आदिवासी मागास असलेल्या गावी जावून शैक्षणिक कार्य करण्याचे आदेश दिले. त्यानंतर लळींगकर यांनी नंदुरबार शहरात जिल्ह्याचे तत्कालीन धुळे जिल्हाधिकारी कॅप्टन कुºहे यांच्या हुकुमाने साक्री नाका परिसरात पातळगंगा नदीकिनारी जागा मिळवली होती आणि त्याठिकाणी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी छात्रालयाची स्थापना करण्यात आली. यानिमित्त अजूनही ३१ जुलै रोजी लळिंग किल्ल्यावरील लांडोर बंगला येथे दलित बांधवांचा मेळावा भरतो. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

टॅग्स :Dhuleधुळे