शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पीककर्जासाठी बँकांनी शेतकऱ्यांना फिरवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST

शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जवळ आला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बॅंकाची कामे बंद होती. त्यामुळे पीककर्ज नूतनीकरण करण्यासाठी, तसेच पाच वर्षे ...

शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जवळ आला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बॅंकाची कामे बंद होती. त्यामुळे पीककर्ज नूतनीकरण करण्यासाठी, तसेच पाच वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना खूप चकरा माराव्या लागत आहेत. त्यात पीककर्ज घेऊन पाच वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज फाइल मंजुरीसाठी धुळे येथे पाठविल्या जात आहेत आणि या धुळे येथे पाठविलेल्या फाइलला १ ते दीड महिन्याच्या वर कालावधी होऊनही अजूनही शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर होण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे हंगाम जवळ असूनही शेतीचे कामे सोडून शेतकऱ्यांना बॅंकांच्या चकरा माराव्या लागत आहेत. शेतकऱ्यांनी आपल्याजवळील सर्व पैसे बॅंकेत भरून पीककर्ज भरले आहे, परंतु आता बियाणे खते यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज असताना बॅंक त्यांना चकरा मारावयास लावत आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बॅंकांची बैठक घेऊन शेतकऱ्यांचे प्रकरणे सुलभ व लवकर कसे मंजूर होतील, यासाठी सूचना कराव्यात, अशी मागणी आ.रावल यांनी केली आहे.

*सर्च रिपोर्टसाठी दरपत्रक निश्चित करावेत...*

पीककर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांना बॅंकानी निश्चित केलेल्या वकिलांकडून सर्च रिपोर्ट काढावयास लावतात, त्यासाठी प्रत्येक वकिलाची फी ही वेगवेगळी आहे, वकिलांमार्फत अवाजवी दर आकारणी करून शेतकऱ्यांना लुटले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी माझ्याकडे केली आहे. अशा पार्श्वभूमीवर सरकारने अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्च रिपोर्टचे दर निश्चित करून, त्याचे दरपत्रक वकिलांनी आपल्या कार्यालयात लावण्यासाठीच्या आदेश व्हावेत, अशी मागणीही आ.रावल यांनी केली आहे.