शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

पीककर्जासाठी बँकांनी शेतकऱ्यांना फिरवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST

शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जवळ आला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बॅंकाची कामे बंद होती. त्यामुळे पीककर्ज नूतनीकरण करण्यासाठी, तसेच पाच वर्षे ...

शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जवळ आला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बॅंकाची कामे बंद होती. त्यामुळे पीककर्ज नूतनीकरण करण्यासाठी, तसेच पाच वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना खूप चकरा माराव्या लागत आहेत. त्यात पीककर्ज घेऊन पाच वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज फाइल मंजुरीसाठी धुळे येथे पाठविल्या जात आहेत आणि या धुळे येथे पाठविलेल्या फाइलला १ ते दीड महिन्याच्या वर कालावधी होऊनही अजूनही शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर होण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे हंगाम जवळ असूनही शेतीचे कामे सोडून शेतकऱ्यांना बॅंकांच्या चकरा माराव्या लागत आहेत. शेतकऱ्यांनी आपल्याजवळील सर्व पैसे बॅंकेत भरून पीककर्ज भरले आहे, परंतु आता बियाणे खते यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज असताना बॅंक त्यांना चकरा मारावयास लावत आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बॅंकांची बैठक घेऊन शेतकऱ्यांचे प्रकरणे सुलभ व लवकर कसे मंजूर होतील, यासाठी सूचना कराव्यात, अशी मागणी आ.रावल यांनी केली आहे.

*सर्च रिपोर्टसाठी दरपत्रक निश्चित करावेत...*

पीककर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांना बॅंकानी निश्चित केलेल्या वकिलांकडून सर्च रिपोर्ट काढावयास लावतात, त्यासाठी प्रत्येक वकिलाची फी ही वेगवेगळी आहे, वकिलांमार्फत अवाजवी दर आकारणी करून शेतकऱ्यांना लुटले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी माझ्याकडे केली आहे. अशा पार्श्वभूमीवर सरकारने अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्च रिपोर्टचे दर निश्चित करून, त्याचे दरपत्रक वकिलांनी आपल्या कार्यालयात लावण्यासाठीच्या आदेश व्हावेत, अशी मागणीही आ.रावल यांनी केली आहे.