शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

एकाच जागेवर उभ्या बसेसची दुरवस्था, सीट, टायर फाटले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:26 IST

गेल्यावर्षी २५ मार्चपासून लॉकडाऊन लागल्यानंतर तब्बल साडेतीन महिने बससेवा बंद होती. त्यामुळे एकाच जागी उभ्या राहिल्याने अनेक बसगाड्यांची दुरवस्था ...

गेल्यावर्षी २५ मार्चपासून लॉकडाऊन लागल्यानंतर तब्बल साडेतीन महिने बससेवा बंद होती. त्यामुळे एकाच जागी उभ्या राहिल्याने अनेक बसगाड्यांची दुरवस्था झालेली होती. ऑगस्टनंतर बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत बससेवा सुसाट होती. रेल्वे बंद असल्याने, बसशिवाय पर्याय नव्हता. मात्र कोरोनाची दुसरी लाट आली. हा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे बससेवेला पुन्हा ‘ब्रेक’ लागला आहे. सध्या बस रस्त्यावर नसल्याने अपघात नाहीत. मात्र अनेक बसगाड्यांची दुरवस्था झालेली आहे. काचा फुटलेल्या, आरसे फुटलेले, आसनांची दुरवस्था झालेली दिसून आली.

धुळे आगारात उभ्या असलेल्या एका बसची समोरची कास फुटलेली आहे. तसेच चालकाच्या बाजूचा भागही तुटलेले होता. तसेच बसचे मडगार्डही लोंबकळत होते.

महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या नवीन बसचे आसनही तुटलेले दिसून आले. तसेच काही लाल गाड्यांमधील आसनही फाटलेले दिसून आले.

अनेक दिवसांपासून आगारात उभ्या असलेल्या बसगाड्यांच्या टायरचीही दुरवस्था झालेली आहे. अनेक गाड्यांचे टायर फाटू लागल्याची स्थिती आहे.

एस.टी. ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजली जाते. आजही अनेकजण बसनेच प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून एस.टी. जागच्या जागीच उभी असल्याने, सर्वच आगारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यातच बसेसची झालेली दुरवस्था म्हणजे दुष्काळात तेरावा महिना, अशीच स्थिती आहे.

n गेल्यावर्षी लॉकडाऊन लागल्यामुळे २५ मार्चपासून ते १८ ऑगस्टपर्यंत एस.टी.ची आंतरजिल्हा वाहतूक बंद होती. आता पुन्हा २५ एप्रिलपासून बससेवा बंद आहे.

n गेल्या वर्षभरात फक्त तीन महिने एस.टी. सुरळीतपणे रस्त्यावर धावली आहे. एस.टी. आगारातच उभी असल्याने मोठा फटका बसत आहे.

n दरम्यान, आता एस.टी.ची सेवा काही प्रमाणात सुरू झालेली आहे. काही गावांसाठी दोन-तीन फेऱ्या होऊ लागल्या आहेत.

n कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर एस.टी. पुन्हा पूर्ण क्षमतेने धावेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.