शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पपईला हवामानावर आधारीत विमा लागु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 22:02 IST

कृषीभूषण प्रकाश पाटील : केळी पिकासाठीही दोन स्वतंत्र योजना सुरू करण्याची मागणी

धुळे : पपई या फळपिकाचा हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजनेत समावेश करावा़ तसेच डाळींब, संत्रा, मोसंबी या पिकांप्रमाणे केळी पिकाला देखील मृग व आंबिया बहारासाठी दोन स्वतंत्र योजना सुरू कराव्यात, अशी मागणी कृषीभूषण अ‍ॅड़ प्रकाश भुता पाटील यांनी केली आहे़यासंदर्भात त्यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह कृषी विभागाचे सचिव, आयुक्त आणि फलोत्पादन आयुक्तालयाच्या संचालकांना निवेदन दिले आहे़निवेदनात म्हटले आहे की, राज्यात पपई पिकाला पोषक वातावरण आहे़ त्यामुळे १३ हजार ८०० हेक्टर क्षेत्रवार पपईची लागवड झाली आहे़ पपई लागवडीचे प्रमाण वाढत आहे़ पपई फळ पिकाचा हवामानावर आधारीत पिक विमा योजनेत समावेश करावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे़ सन २०१५ मध्ये तत्कालीन कृषी मंत्र्यांनी पुढील हंगामापासुन योजना लागू करण्याची घोषणा केली होती़ परंतु ही घोषणा हवेतच विरली़ राज्यात केवळ एक हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड असलेल्या स्ट्रॉबेरीचा योजनेत समावेश झाला़ परंतु अजुनपर्यंत पपई उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही़ त्यामुळे पुढील वर्षापासून पपईचा या योजनेत समावेश करावा अशी मागणी निवेदनात केली आहे़तसेच महाराष्ट्रात केळीचे उत्पादन तीन बहारात घेतले जाते़ परंतु केळी पिकाचा केवळ आंबिया बहारासाठी योजनेत समावेश असल्याने विमा संरक्षण एकाच बहाराचे मिळते़ केळी उत्पादक शेतकरी आंबिया बहाराचा विमा भरतात़ परंतु प्रत्येक बहारात हवामान आणि धोके वेगवेगळे आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांना रास्त नुकसान भरपाई मिळत नाही़ त्यामुळे संत्री, मोसंबी, डाळींब पिंकांप्रमाणेच केळी पिकाला देखील मृग बहार आणि आंबिया बहार अशा दोन स्वतंत्र योजना लागु करुन विम्याचे सुरक्षा कवच उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी कृषीभूण प्रकाश पाटील यांनी केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे