शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

संतप्त शेतकऱ्यांनी जामफळचे काम बंद पाडले, महामार्गावर रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 22:37 IST

शिंदखेडा पोलीस निरीक्षकांची मध्यस्थी : जिल्हाधिकाऱ्यांशीही केली चर्चा

धुळे : शेतकºयांचे भाग्य बदलणाºया जामफळ सुलवाडे कान्होली प्रकल्पाचे काम शेतकºयांनी बंद पाडले. शेतजमीनी पाण्याखाली गेल्यानंतर देखील मोबदला मिळत नसल्याचा आरोप करीत मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला. परिणामी काही काळ तणाव निर्माण झाला होता. लागलीच शिंदखेड्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी नियंत्रण आणत शेतकºयांची समजूत काढली. आंदोलन करणाºया शेतकºयांना जिल्हाधिकारी यांच्या भेटीला घेवून आले. प्रश्न तडीस नेण्याचे आश्वासन मिळाल्याने शेतकºयांचा संताप कमी झाला. पोलीस निरीक्षक तिवारी यांची मध्यस्थी फलदायी ठरली.महत्वाकांक्षी अशा सुलवाडे जामफळ प्रकल्पाचे काम जोरात सुरु आहे. या कामासाठी भूमिअधिग्रहणही शासनातर्फे करण्यात आले आहे. अनेकांना भूमिअधिग्रहणात मोबदला मिळाल्याचे समोर येत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या पाण्याखाली गेल्या आहेत. त्यांना मोबदला देखील मिळाला आहे. मात्र, सोनगीर, सोंडले शिवारात जामफळ धरणाचे काम सुरु असून त्यात सोनगीर व सोंडल्याचे शेतकºयांच्या सुमारे ५०० हेक्टर शेतजमिनी या पाण्याखाली जात आहेत. या बाधीत शेतकºयांना मोबदला मात्र मिळालेला नाही. त्यासाठी त्यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून काही दिवसांपुर्वी आंदोलन देखील केले. या आंदोलनाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना शेतकºयांची आहे.मंगळवारी जामफळ धरणाचे काम सुरु असताना संतप्त शेतकरी घटनास्थळी गेले. त्यांनी कामबंद पाडले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. यासोबतच शेतकºयांनी महामार्ग रोखून धरला. घटनेची माहिती मिळताच शिंदखेड्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी पोलीसांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकºयांची भावना समजून घेत त्यांना विश्वासात घेतले. काम सुरु द्या असे म्हणत आपण शेतीच्या मोबदल्यासाठी जिल्हाधिकारी यांना भेटू, असे सांगत त्यांनी त्यांचाच गाडीतून शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात घेवून आले. तेथे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. हे प्रकरण शिरपूरचे प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांच्याकडे असल्याने त्यांच्याशी बोलणे करुन दिले. येत्या पाच ते सहा दिवसात अहवाल पाठवून शेतकºयांच्या मोबदल्याचा प्रश्न सोडविण्यात येईल असे आंदोलन करणाºया शेतकºयांना आश्वासीत करण्यात आले. यानंतरही प्रश्न न सुटल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा केदारेश्वर मोरे, अविनाश महाजन, रविंद्र माळी, भटू धनगर, लखन रुपनर, श्याम माळी, पराग देशमुख, दंगल धनगर आदींनी दिला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे