शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
3
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
4
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
5
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
6
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
7
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
8
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
9
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
10
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
11
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
12
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
13
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
14
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
15
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय
16
बाबो! ३ मुलांची आई सासऱ्यासोबत झाली फरार; पतीने जाहीर केलं २० हजारांचं बक्षीस
17
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
18
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
19
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?

भारतीय वायुदलाचा पाकिस्तानवर ‘एअर स्ट्राईक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 13:21 IST

अनेक अड्डे उध्वस्त : १२ मिराज विमानातून बॉम्बचा वर्षाव

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : भारतीय वायुदलाच्या टीमने पाकिस्तानवर ‘एअर स्ट्राईक’ करत बॉम्बचा वर्षाव केला़ १२ मिराज विमानातून १ हजार किलो बॉम्ब फेकल्याने दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उध्वस्त झाले आहेत़ ही कारवाई मंगळवारी पहाटे करण्यात आली़ यात सुमारे ३०० दहशतवादी ठार झाले़ संरक्षण राज्यमंत्री ना़ डॉ़ सुभाष भामरे यांचा या घडामोडींमध्ये सक्रीय सहभाग राहिला़ पाकिस्तान विरोधात मंगळवारी ‘एअर स्ट्राईक’ मोठी कारवाई केली़ भारतीय वायुसेनेच्या मिराज २ हजार या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद सह दहशतवादी संघटनांच्या तळावर १ हजार किलो वजनाच्या बॉम्बचा वर्षाव केला़ एकाच तडाख्यात ३०० दहशतवाद्यांचा खात्मा करीत पुलवामा येथे शहीद झालेल्या ४० भारतीय जवानांच्या बलिदानाचा एकप्रकारे बदला घेतला़ या सर्व कारवाईच्या महत्वपूर्ण घडामोडींमध्ये संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांचा सक्रीय सहभाग राहिला़ रविवारी रात्रीच डॉ़ सुभाष भामरे यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले होते़ सोमवारी दिवसभर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सितारामन आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत बैठका, चर्चांमध्ये डॉ़भामरे हे व्यस्त होते़ डॉ़ सुभाष भामरे यांनी पुलवामा हल्याचा बदला भारतीय सैन्य दल घेईल, पाकिस्तानला चोख आणि कठोर असे प्रतिउत्तर आम्ही देवू असे बोलून दाखविले होते़ त्यांचे शब्द मंगळवारी पहाटे झालेल्या या कारवाईवरुन खरे ठरले असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत़ ३०० दहशतवाद्यांचा खात्मा करुन आमच्या शहिद जवानांच्या रक्तांचा बदला घेण्यात आला. भारतीय वायू दलाचा मला अभिमान आहे. पाकिस्तानला मोठी अद्दल आपल्या वीर जवानांनी घडवली आहे. दहशतवाद्यांचे कंबरडे मोडून काढण्यात आले़ यासर्व कारवाईचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असेही संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे