शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST

सध्या कोरोनामुळे जिल्ह्यातील नव्हे देशभरातील नागरिकांची झोप उडाली आहे. त्यात आता मध्य प्रदेशासह इतर काही राज्यांमध्ये बर्ड फ्लू आजाराची ...

सध्या कोरोनामुळे जिल्ह्यातील नव्हे देशभरातील नागरिकांची झोप उडाली आहे. त्यात आता मध्य प्रदेशासह इतर काही राज्यांमध्ये बर्ड फ्लू आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. धुळे जिल्ह्यात जरी कोंबड्यांचा मृत्यू झाला नसला तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. भीतीचे वातावरण जरी असले तरी मागणी मात्र कमी झालेली दिसून येत नाही. त्यामुळे भाव नेहमीप्रमाणे स्थिर आहेत. बर्ड फ्लू आजाराच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात कुक्कुटपालन करणाऱ्या नागरिकांसह पोल्ट्री फार्मचालकांनाही बर्ड फ्लू आजाराची लक्षणे, घ्यावयाची दक्षता याबाबत माहिती दिली जात आहे. जिल्ह्यात बर्ड फ्लूचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. इतर राज्यांमध्ये रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर ही दक्षता घेतली जात असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

पशुसंवर्धन विभागाकडून अशी घेतली जाते काळजी

n पोल्ट्री फार्मवरील किंवा आपल्या घरातील, शेतातील एखादा पक्षी मृत पावला तर त्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाला देणे गरजेचे आहे. पशुवैद्यकीय विभागातील तज्ज्ञांमार्फत मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन केले जाते. याद्वारे त्या पक्ष्याचा कोणत्या कारणाने मृत्यू झाला याची माहिती समजू शकते. त्यामुळे मृत पक्षाची माहिती प्रशासनाला देणे गरजेचे आहे. त्यामुळे वेळीच उपाय योजना केल्या जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

लसीकरणाचा उपाय

बर्ड फ्लू हा सर्दीसारखा आजार आहे. कोंबड्यांना सर्दी होऊन त्यांचा श्वास गुदमरतो आणि त्या गतप्राण होतात. लसीकरण त्यावर उपाय आहे.

जिल्ह्यात बर्ड फ्लूचा अद्याप धोका आढळून आलेला नाही. मात्र पशु संर्वधन विभागाकडून आवश्यक ती काळजी व नियोजन करण्यात आलेले आहेत. त्यासाठी वेळोवेळी जनजागृती केली जात आहे.

- डाॅ. राजेंद्र लंघे,

पशुसंवर्धन अधिकारी