शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीच्या मृत्यूस प्रशासनच जबाबदार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:10 IST

सरपंच व ग्रामस्थांचा आरोप : गावासाठी चार टँकरची मागणी करुनही दुर्लक्ष,भीषण पाणीटंचाई, १२ दिवसानंतर होतो पुरवठा

ठळक मुद्देचिमुकली नंदिनीच्या मृत्यूस प्रशासनच जबाबदारदुसया दिवशी शुक्रवारी गावात व मयत नंदिनीच्या घरी शोककळा खाली उतरतांना नंदिनीचा तोल जाऊन  विहीरीत पडली गावांसाठी पाच टँकरची गरज असतांना अधिकाºयांनी केवळ दोनच  मंजूर

रविंद्र बोरसेविंचूर : तालुक्यातील मोरदड तांडा येथील ऊसतोड मजुराची १३ वर्षीय चिमुकली नंदिनीचा  पाय घसरून विहरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. त्यानंतर   तब्बल २४ तासानंतर दुसºया दिवशी झाला घटनेचा पंचनामा शासनातर्फे करण्यात आला. गावात भीषण पाणीटंचाई असून १२ दिवसानंतर नळांना पाणी येते. गावातील पाणीटंचाई पाहता चार टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करुनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच ग्रामस्थांना आपला जीव धोक्यात टाकून पाणी आणावे लागते. चिमुकली नंदिनीच्या मृत्यूस प्रशासनच जबाबदार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केल्या.घटनेच्या दुसया दिवशी शुक्रवारी गावात व मयत नंदिनीच्या घरी शोककळा पसरली होती. घरी सांत्वन करणाºयांची गर्दी होती. ऊसतोड मजुराची मुलगी - नंदिनी ही ऊसतोड मजूर नथ्थू पवार यांची मुलगी आहे. नथ्थू पवार हे मुलींचे शिक्षण गावात पूर्ण व्हावे यासाठी नंदिनीसह आपल्या चार मुली व एक मुलाला मोरदड तांडा येथे आपल्या आई वडिलांकडे सोडून ऊसतोड साठी वर्षभर बाहेर जात होते. ते यंदाही १५ दिवसापूर्वीच ऊसतोडीचे काम पूर्ण करुन गावात आले होते. गावात पाणीटंचाई असल्याने नंदिनीही दुपारी पाणी भरण्यासाठी   रेल्वे रुळ ओलांडून गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या४५ फूट खोल खाजगी विहीरीवर पाणी भरण्यासाठी गेली.   विहीरीत ८ ते १० फूट पाणी होते. विहीर मातीची असल्याने खाली उतरतांना नंदिनीचा तोल जाऊन  विहीरीत पडली. डोक्याला मार लागल्याने ती बेशुद्ध अवस्थेत पाण्यात बुडाली. दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास नंदिनी परत का आली नाही म्हणून  शोध घेण्यासाठी विहीरीवर गेले असता नंदिनी  पाण्यात बुडल्याचे दिसले. तिला तातडीने उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याठिकाणी तिला मृत घोषीत करण्यात आल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली. दोन टँकर सुरु - गावासाठी जिल्हा प्रशासनाकडून दिवसातून पाण्याचे दोन टँकर येतात. पण ते पुरेसे नसल्याने ग्रामपंचायतीने आधीच चार टँकरची मागणी केली आहे. तसेच गावासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून ३७ लाखाची पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. पण या योजनेस काही शेतकºयांनी विरोध केल्याची माहिती सरपंचांनी दिली.जंगलातून आणतात पाणी - गावात पाणीटंचाई असल्याने जंगलात  व    नाल्यावरुन ग्रामस्थ पाणी आणतात.

संबधित अधिकाºयावर कारवाईची मागणीमोरदड तांडा येथील नंदिनी पवार (वय १३) या चिमुकलीचा गुरूवारी दुपारी विहीरीवर पाणी भरतांना पाय घसरल्याने विहरीत पडून मृत्यू झाला़ दुष्काळ निवारणासाठी  शासनाकडून कल्याणकारी योजना राबविल्या जातात़ मात्र प्रशासकीय अधिकाºयांच्या चुकीच्या निर्णयामुळे  नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते़ मोरदड तांडा गावांसाठी पाच टँकरची गरज असतांना अधिकाºयांनी केवळ दोनच  मंजूर केले़  अधिकाºयांचा हलगर्जीपणामुळे चिमुकलीचा मृत्यू झाला आहे़  शासनाकडून मुलीच्या कुटूंबियांना पाच लाखांची मदत व तिच्या मृत्यूस जबादार  अधिकाºयांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन भाजपाचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी केली़निवेदनावर मनोहर पवार, ज्ञानेश्वर पवार, देवेद्र पाटील, हेमराज गवळी, नवल पवार यांनी दिले आहे.

पुरेसा पाणी नसल्याने प्रशासनाकडे चार टॅकरव्दारे पाणीपुरवठ्याची मागणी केली होती़ मात्र २ टॅकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात आला़ पेयजल योजनेसाठी मंजूरी मिळाली होती़ मात्र गावकºयांनी विरोध केल्याने काम होऊ शकले नाही़          -कनीराम पवार सरपंच, मोरदड तांडागुरूवारी पत्तीसह कामाला गेली होती़ गावात पाणीटंचाई असल्याने विहीतुन पाणी भरावे लागते़ पिण्यासाठी पाणी नसल्याने मुलगी पाणी भरण्यासाठी गेली आणि तिचा पाणीटंचाईमुळे बळी गेला़ यापुढे तरी प्रशासनाने प्रयत्न करावे  -ललिता पवार  नंदिनीची आई 

गेल्यावर्षी देखील पाणी भरण्यासाठी गेलेल्या मुलीचा पाय घसरून पडल्याने ती जखमी झाली होती़ पाण्यासाठी अनेक दुर्दवी घटना गावात वारंवार होतात़ मात्र प्रशासनाकडून पाण्यासाठी ठोस भुमिका घेतली जात नाही़ -दिनेश जाधव ,नागरिक 

 

टॅग्स :Dhuleधुळे