शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

८० टक्के बसेस झाल्या सुरू; केवळ २० टक्के बसेस आगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST

धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बससेवा सुरै झाली आहे. जिल्ह्यातील ८० टक्के बसेस रस्त्यावर धावू लागल्या आहेत. केवळ ...

धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बससेवा सुरै झाली आहे. जिल्ह्यातील ८० टक्के बसेस रस्त्यावर धावू लागल्या आहेत. केवळ २० टक्के बसेस आगारातच थांबलेल्या आहेत. बस सुरै न झाल्याने काही गावातील नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर निर्बंध कडक करण्यात आले होते. मे महिन्यापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच मृत्यूदरही कमी झाला आहे. त्यामुळे निर्बंध हटवून बससेवादेखील सुरु करण्यात आली होती. बससेवा सुरु झाल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मिळाली. तालुक्याच्या ठिकाणी किंवा शहरात येण्यासाठी नागरिकांना एसटी महामंडळाच्या बसचा मोठा आधार असतो. मात्र कोरोना आल्यानंतर मागील दीड वर्षापासून बससेवा कधी बंद तर कधी सुरु असते. त्याचा मोठा फटका महामंडळाला बसतो आहे. तसेच आरोग्याच्या कामासाठी किंवा शासकीय कार्यालयातील कामासाठी येणाऱ्या नागरिकांचीही गैरसोय होत होती. मात्र आता बसेस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्याने वाहक व चालकांमध्येही उत्साह दिसून येत आहे.

या गावांना बस कधी सुरू होणार?

लांब पल्ल्याच्या सर्व बसेस सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील बसफेऱ्यांचे प्रमाण मात्र त्या तुलनेत कमी आहे. शिरपूर तालुक्यातील सांगवी, पळासनेर, रोहिणी, खंबाडे या गावांना अजूनही बसची प्रतीक्षा आहे.

बस सुरू न झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच साक्री तालुक्यातील मांजरी, विरखेल, पारगाव या गावातही बस सुरू झालेली नाही.

प्रवाशांना खासगी गाड्यांचाच आधार -

ज्या गावातील बसफेऱ्या सुरू झाल्या नाहीत तेथील लोकांना अजूनही खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे. तसेच ग्रामीण भागात सुरू झालेल्या फेऱ्यांचे प्रमाण कमी आहे. फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून केली जात आहे. टप्प्या-टप्प्याने ग्रामीण भागातील सर्व फेऱ्या सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.

काय म्हणतात प्रवास करणारे...

बससेवा सुरू झाल्याने आनंद झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून बस बंद असल्याने शहरात येण्यासाठी खासगी वाहतूक व्यवस्थेचाच वापर करावा लागत होता. बस सुरू झाली असली तरी बहुतेक गावांच्या फेऱ्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. तसेच बसफेऱ्यांची संख्या वाढवावी.

- प्रवासी

साक्री तालुक्यातील बहुतेक आदिवासी भागातील बसफेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. आदिवासी भागातील बसफेऱ्या सुरू झाल्या तर वेळ व श्रम दोन्ही वाचतील. लवकरात लवकर बसफेऱ्या सुरू कराव्यात.

- प्रवासी