शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
4
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
5
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
6
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
7
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
8
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
9
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
10
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
11
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
12
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
13
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
15
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
16
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
17
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
19
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
20
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

७ लाख ९७ हजार बालकांना मिळणार जंतनाशकाची गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:42 IST

धुळे जिल्ह्यात १ मार्च रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त ७ लाख ९७ हजार ६७४ बालकांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. ...

धुळे जिल्ह्यात १ मार्च रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त ७ लाख ९७ हजार ६७४ बालकांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. या मोहिमेची ग्रामीण व शहरी भागात ४१ प्राथमिक आरोग्य केंद्र, २३२ उपकेंद्र, २ उपजिल्हा रुग्णालय, १३ मनपाचे दवाखाने, २,२४६ अंगणवाडी, १,८४८ शासकीय व खासगी शाळांमार्फत गाेळ्यांचे वाटप केले जाणार आहे.

देशात ६८ टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमी दोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतांमुळे होतो. देशात २८ टक्के बालकांना कृमीदोष होण्याची शक्यता असते. त्याची प्रमुख कारणे म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे आहे. या कृमी दोषांचा संसर्ग दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे होतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमी दोष हा व्यापक स्वरूपाचा असून, मुलांना कमकुवत करणारा आहे. कृमी दोष हा रक्ताक्षय आणि कुपोषणाचे कारण आहे, शिवाय बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. देशात ६ ते ५९ महिने वयोगटांतील प्रत्येकी दहा बालकांमागे सात बालकांमध्ये रक्ताक्षय आढळतो. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्तही असू शकते, तसेच १५ ते १९ वर्षे वयोगटांतील किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्ताक्षय आढळतो.

देशात पाच वर्षांखालील सुमारे ५० टक्के बालके वाढ खुंटलेली आहेत. साधारणतः ४३ टक्के बालके कमी वजनाची आहेत. राष्ट्रीय जंतनाशकाचा उद्देश १ ते १९ वर्षे वयोगटांतील सर्व पूर्व शालेय वयोगटांतील मुलांना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषणस्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. जंतनाशक मोहिमेची अंमलबजावणी १ मार्च, २०२१ व ८ मार्च, २०२१ रोजी करण्यात येणार आहे.

तालुकास्तरावर मोहिमेंतर्गत शाळेतील नोडल शिक्षकांना शिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांनी आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य पर्यवेक्षक व इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेले आहे. १ मार्च रोजी जिल्ह्यातील ७ लाख ९७ हजार ६७४ बालकांना सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानित शाळा, खासगी शाळा, तसेच अंगणवाडी केंद्र, आश्रमशाळा येथे जेवणानंतर जंतनाशक गोळीचा लाभ देण्यात येणार आहे. गोळी ही जेवण करूनच घ्यावी. या कार्यक्रमामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबर शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभागाचा सहभाग आहे. या दिवशी जंतनाशक गोळी दिली गेली नाही, तर अशा बालकांना ८ मार्च रोजी मॉप-अप दिनी जेवणानंतर ही गोळी देण्यात येणार आहे.

या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नवले, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे यांनी केले आहे.