शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

५३ नवीन बंधाऱ्यांची होणार निर्मिती

By admin | Updated: December 26, 2016 22:55 IST

शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीला बारमाही करण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

ऑनलाइन लोकमतदोंडाईचा, दि. 26 -  शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीला बारमाही करण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार बुराई नदीत आता नव्याने ५३ ठिकाणी साठवण बंधारे तयार होणार असून त्यासाठी २० कोटी ६१ लाखांच्या निधीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदी ४ महिने पाण्यात तर ८ महिने तहानलेली असते. त्यात पावसाअभावी तालुक्यातील पाण्याची टंचाई विचारात घेता, बुराई नदी काठावरील गावातील पाणी टंचाई आणि सिंचनाचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने बुराई नदी बारमाही करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.बंधारे नसल्यामुळे पाणी वाहून जाते शिंदखेडा मतदारसंघाच्या दृष्टीने बुराई नदी ही साक्री तालुक्यातील दुसाणे, बळसाणे परिसरासह शिंदखेडा तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या शेवाडे, चिमठाणे, शिंदखेडा, वरसुस येथून वाहत जाऊन थेट तापीला मिळते. नदीला दरवर्षी पावसाळ्यात पाणी असते. परंतु, पाणी अडविण्यासाठी बंधारे नसल्याने हे पाणी तापीनदीच्या प्रवाहाद्वारे वाहून जाते. त्यादृष्टीने मंत्री रावल यांनी गेल्या अनेक वर्षांपासून बुराई नदीला बारमाही करण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला होता. फेरप्रस्ताव सादर आघाडी शासनाच्या काळात मानव विकास मिशनमधून या कामाला मंजुरी द्यावी, अशी मागणी केली होती. परंतु, आघाडी शासनाने या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. म्हणून राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्री रावल यांनी ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाला याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव पुन्हा सादर केला होता. याप्रश्नी अनेकदा बैठका झाल्या. अखेर ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाने बुराई नदीला बारमाही करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार बुराई नदी बारमाही करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असली तरी बुराई नदीच्या काठावरील दुसाणे, बळसाणे, म्हसाळे, उभंड, सतमाने, जखाणे, अमराळे, दरखेडा, चिमठाणे, शेवाळे, रेवाडी, कढरे, सुलवाडे, फोफरे, घाणेगांव, नागपूर, अशा विविध ठिकाणी ५३ साठवण बंधाऱ्यांची नव्याने निर्मिती होणार असून हजारो हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे.पाणी साठवणुकीवर भर मंत्री रावल यांनी हा प्रस्ताव तयार करताना शिंदखेडा मतदारसंघातील बुराई नदीतील बंधाऱ्यांमध्ये पूर्णत: पाणी साठवणूक होईल, असा प्रस्ताव तयार केला आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर शिंदखेडा तालुक्याचा दुष्काळाची झळ कमी करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. मागील काळातील साठवण बंधाऱ्याचा कामाचा अनुभव पाहता मंत्री रावल यांनी बंधाऱ्यांची कामे दर्जेदार स्वरूपाची व्हावीत; तसेच त्यांचा पुढच्या ५० वर्ष जनतेला लाभ व्हावा म्हणून ही सर्व कामे जलसंधारण विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कामाना प्रशासकीय मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे कामांची गुणवत्ता राखण्यास मोठी मदत होणार आहे.