शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
4
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
5
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
6
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
7
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
8
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
9
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
10
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
11
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
12
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
13
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
14
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
15
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
16
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
17
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
18
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
19
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
20
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...

पाण्यासाठी महिलांची ४ कि.मी.ची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 22:49 IST

शाळेतील चिमुकल्यांनाही पाणी आणल्यावरच खिचडी खायला मिळते़

सुनील साळुंखे ।शिरपूर : ‘पाणी हेच जीवन आहे, त्याचा काटकसरीने वापरा करा’ या उक्तीनुसार पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे जतन करण्याचा निर्धार शासनस्तरावरून करण्यात आला असला तरी तालुक्यातील आदिवासी भागातील महिलांना आजही पाण्याच्या थेंबाकरीता वणवण भटकावे लागत आहे़ गेल्या ७ वर्षापासून चोंदी गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकतात़ पाणी नसल्यामुळे पिके सुध्दा घेता येत नाही़ विशेषत: गावातील हातपंप बंद़, पाण्याची टाकी नाही़, बोअरवेल नाही, विहिरी कोरडी, त्यामुळे गावातील महिलांना किमान ३-४ किमीची भटकंती करून पाणी आणावे लागत आहे़ शाळेतील चिमुकल्यांनाही पाणी आणल्यावरच खिचडी खायला मिळते़बोराडी-सांगवी रस्त्यावरील बोराडी गावापासून ४ किमी अंतरावर चोंदी गांव आहे़ सदर गांव टेंभेपाडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येते़ सुमारे १५०० लोकवस्तीचे हे गांव आहे़ गेल्या ६-७ वर्षापासून या गावाला अधिक पाणीटंचाई भासवू लागली आहे़ विशेषत: उन्हाळ्यात ग्रामस्थांसह महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते़ उन्हाळ्याच्या सुरवातीलाच गावात भीषण पाणी टंचाई जाणवत असल्याने राहीलेला उन्हाळा कसा काढणार असा प्रश्न ग्रामस्थांना पडू लागला आहे़ पाणीटंचाई इतकी तीव्र आहे की, गावातील अबालवृद्धांचा संपूर्ण दिवस एक हंडा पाणी आणण्यासाठी जातो.गेल्या वर्षी गावातील खुलदार बासरा पावरा यांचे गावापासून ३ किमी अंतरावर शेत असून त्यांनी घर बांधकामासाठी पाईप लाईन टाकून घरापर्यंत पाणी आणले होते़ घर बांधकाम होईपर्यंत ग्रामस्थांना दर १५ दिवसातून एकदा तेथून पाण्यासाठी झुंबड उडत होती़ त्यांच्याकडे पाणी आले तर महिला अक्षरक्षा तासोन् तास तेथे उन्हयात थांबवून हंडाभर पाणी घेत होते़ विशेषत: या पाण्यासाठी चिमुकल्यांसह वृध्दापर्यंत सारे जण तेथे गर्दी करीत होते़ मात्र यंदा पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे़ गावात लाईट असून देखील केवळ पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे परिसरात पाणी लागत नाही़ एकच हातपंप होता तो देखील अडीच महिन्यापासून कोरडा पडला आहे़गावाजवळील अर्धा किमी अंतरावरील नाला देखील कोरडा पडला आहे़ त्यातील डबक्यांमधील पाण्यात महिला कपडे, आंघोळ करीत असल्याचे सांगण्यात आले़ गावात जिल्हा परिषदेची मराठी शाळा असून मुलांना पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी विद्यार्थ्यांनाच पाणी आणावे लागते़ त्यानंतरच मुलांना खिचडी खायला मिळते़ गावातील जनावरांना सुध्दा पाणीकरीता भटकंती करावी लागते़ जेथून महिला पाणी आणतात त्याच डबक्यातून जनावरे पाणी पितात़ त्यामुळे रोगराई पसरण्याची सुध्दा भिती वाटते़गावातील परिसरातील जवळपास असलेले पाण्याचे स्रोत पूर्णपणे कोरडे टाक पडले आहे. ग्रामपंचायतची विहीर देखील डिसेंबर-जानेवारीमध्येच कोरडी पडली़ त्यामुळे जवळपास पाण्यासाठी गावकरी परिसरातील २-३ किलोमीटर वरुन पाणी आणावे लागत आहे़ मागील पाच वर्षापासून चोंदी गावातील ग्रामस्थांना डिसेंबर- जानेवारीपासूनच सतत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.ग्रामपंचायतने खारीखांड येथील दौलत पावरा यांची विहीर अधिग्रहण केली आहे़ या विहीरीला ही पाणी कमी असल्यामुळे तब्बल ८-१० दिवसांनी पाणी मिळत आहे, तेही गावात दहा ते पंधरा मिनिटे चालते़ गावातील उर्वरित भागात पाणी पोहचत नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. गावातील जनावरांना चारा व पाण्यासाठी सतत भटकंती करावी लागत आहे़ जनावरांना पाण्यासाठी बोराडी येथील काळेपाणी धरणावर ३-४ किमीवर न्यावे लागत असल्यामूळे या दुष्काळात मुलांसारखे वागवलेल्या जनावरचे चाराटंचाई व पाणीटंचाईमुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे़पाण्यासारख्या मुलभूत गरजेच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्री पेयजल सारख्या इतर योजनाही कार्यान्वीत असून देखील गावाला पिण्यासाठी पाणी मिळत नाही. दरवर्षी पाणीपट्टी नियमित भरून देखील पाण्याची सोय होत नसल्याने पाण्याअभावी गावकऱ्यांबरोबरच मुक्या प्राण्यांचेही प्रचंड हाल होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले़ मिळेल तेथून पाणी आणतांनाही नागरिकांमध्ये पाण्यांवरून संघर्ष होत असल्याचे चित्र आहे. उन्हाळ्याच्या सुरवातीलाच पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असुन, यापुढे ते आणखीनच वाढणार असल्याने पाण्याची व्यवस्था त्वरीत प्रशासनाने करावी अन्यथा तहसिल कार्यालयावर ‘पाणी भिक मांग’ आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले़

टॅग्स :Dhuleधुळे