शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

धुळ्यात डेंग्युचे १६ रुग्ण

By admin | Updated: November 18, 2014 14:40 IST

महापालिकेतर्फे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाठविण्यात आलेल्या संशयित ४0 रुग्णांपैकी १६ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

 धुळे : महापालिकेतर्फे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाठविण्यात आलेल्या संशयित ४0 रुग्णांपैकी १६ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने मोहीम अधिक तीव्र केली आहे. मात्र संशयित रुग्णांची संख्या आता कमी होत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. शहरातील साक्री रोडवरील मोगलाई व गवळीवाडा परिसरापासून डेंग्यू निर्मूलनासाठी मोहीम राबविण्यास सुरवात झाली. या भागातील पाण्याच्या साठय़ात डेंग्यू आजारास कारणीभूत होणार्‍या डासाच्या अळ्य़ा आढळून आल्याने सर्व साठे रिकामे करण्याची कारवाई करण्यात आली. परंतु हळूहळू शहरातील प्रत्येक भागातून डेंग्यूचे संशयित रुग्ण वाढू लागल्याने मनपाने धुरळणी, अँबेटिंग व पाण्याचे साठे खाली करण्यास सुरवात केली. मात्र डेंग्यूने शहराभोवती अधिक विळखा घट्ट केला.जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या १0६ पर्यंत पोहचली आहे. त्यात सर्वाधिक रुग्णांची वाढ ही ऑक्टोबरमध्ये झाल्याने यंत्रणा खळबळून जागी झाली. विशेष म्हणजे गेल्या ऑक्टोबर महिन्यात विविध भागात रुग्णसंख्येत वाढ झाली. १३६ संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्यावर त्यातील ८६ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तर १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ४0 संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यातील १६ रुग्णांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. धुळे : शहरात रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे पुन्हा डेंग्यूच्या उत्पत्तीस्थळांमध्ये वाढ झाली आहे. ही उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.शहरात गेल्या महिन्याभरापासून डेंग्यूच्या साथीने नागरिक हैराण झाले आहेत. तर ही साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे फॉगिंग, अबेटिंग व पाण्याचे साठे रिकामे करण्याची कारवाई सुरू आहे. परंतु परतीच्या पावासाने या मोहिमेवर पाणी फिरविले आहे. शहरातील विविध भागांमध्ये विक्रेत्यांनी फेकलेले शहाळे, माठ विक्रेत्यांकडे पडलेले माठ, दुचाकी, चारचाकींचे पंक्चर काढणार्‍या दुकानांसमोर पडलेल्या रिकाम्या टायरांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे पुन्हा डासांच्या उत्पत्तीस्थानांमध्ये वाढ झाल्याने आरोग्य विभागासमोर नव्याने आव्हान उभे राहिले आहे.

---------------

गेल्या आठवड्यात मंगळवारी झालेल्या पावसामुळे टायरची दुकाने, कुंड्यांची दुकाने, फळांची व मटण विक्रीच्या दुकानांबाहेरील माठांमध्ये साचलले पाणी खाली करण्यात आले होते. त्यात पुन्हा रविवारी रात्री पाऊस झाल्याने संकट वाढले. संबंधित दुकानदारांना पुन्हा स्वच्छतेच्या सूचना दिल्या आहेत. - अर्पणा पाटील, मलेरिया विभागप्रमुख, मनपा