शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

जिल्ह्यात वर्षभरात सायबर क्राईमचे १५ गुन्हे!

By admin | Updated: February 23, 2017 00:25 IST

धुळे : बदलत्या काळात फसवणुकीची माध्यमेही बदलत असून, त्यासाठी आता इंटरनेटचा वापर वाढत असल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे.

धुळे : बदलत्या काळात फसवणुकीची माध्यमेही बदलत असून, त्यासाठी आता इंटरनेटचा वापर वाढत असल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. मोबाइलद्वारे बँक खात्याची माहिती घेऊन  लुबाडणूक होण्याबरोबरच आता फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर करून मुली व महिलांना त्रास देण्याचे प्रकार वाढत आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षी असे १५ गुन्हे दाखल झाले आहेत. २०१५ मध्ये सायबर क्राईमचे १० गुन्हे दाखल होते़क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे फसवणूक, फेसबुकवर अश्लील फोटो किंवा पोस्ट टाकणे, तरुणींची, महापुरुषांची बदनामी करणे, मोबाइलवरून त्रास देणे, आॅनलाइन फसवणूक अशा घटना वाढल्या आहेत़ त्यामुळे सायबर गुन्हे हा आता चिंतेचा विषय ठरू लागला आहे.फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप यासारखी संपर्काची अनेक माध्यमे आहेत. जिल्ह्यात फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, आता त्याचा गैरवापर वाढू लागला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात मोबाइलद्वारे बँक खात्याबाबत माहिती घेऊन फसवणुकीसह फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून दुसºयाला त्रास देणे, बदनामीबाबतचे १५ गुन्हे दाखल झाले आहेत. २०१५ मध्ये सायबर क्राईमचे १० गुन्हे दाखल झाले होते़ त्यामुळे गेल्या वर्षी सायबरच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसून येते़ दरम्यान सायबर सेल हा विभाग आता वेगळा झाला असल्यामुळे अशा प्रकरणांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. काय करावे, काय करू नयेसोशल मीडियातून वाढणाºया गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे काळाची गरज बनली आहे. फेसबुकवर खाते बनविताना ते कोणी पाहू नये, असे सेटिंग करून घेणे आवश्यक आहे.  फेसबुकवर अनोळखी व्यक्तीला आपला मित्र बनवणे टाळणे गरजेचे आहे. अनोळखी लोकांकडून आपल्या खासगी फोटो व व्हिडिओंचा गैरवापर केला जाऊ शकतो. तसेच मोबाइलवर फोन करून काही बतावणी करून कोणी आपल्या बँक खात्याची माहिती मागत असेल तर ती देऊ नये़ ३ ते ५ वर्षांची शिक्षासोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ तयार करणे, कोणीतरी अपलोड केलेला मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणे, लाईक करणे हा कायद्याने गुन्हा आहे. याबद्दल माहिती तंत्रज्ञान, भारतीय दंडविधान संहितेत ३ ते ५ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.