शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

अवघड क्षेत्रातील १४ शाळा भरतात झोपडीत

By admin | Updated: July 14, 2017 01:17 IST

तत्कालीन सीईओंनी सुरुवातीला ३३ शाळांना दिली मंजुरी, मात्र शेवटी १९ शाळांना वगळले

सुनील साळुंखे । लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यात अवघड क्षेत्रातील ३३ जिल्हा परिषद मराठी शाळांना तत्कालीन सीईओंनी सर्वेक्षण करून मंजुरी दिली होती़ परंतु त्यामधून १९ शाळा कुठलाही सारासार विचार न करता वगळण्यात आल्यामुळे आता फक्त १४ शाळांना मंजुरी देण्यात आली आहे़ त्यामुळे डोंगर-दºयातील व त्या शाळांना ये-जा करण्यासाठी रस्ता, भौतिक सुविधा नसतानाही वगळण्यात आलेल्या १९ शाळांमधील शिक्षकांवर अन्याय झालेला आहे़ वगळण्यात आलेल्या शाळा कोणत्या कारणाने रद्द केल्या, त्याची फेर चौकशी व्हावी तसेच त्या शाळा पात्र केल्या नाही तर कोर्ट आॅफ कन्टेन केला जाईल, असा इशारा धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने सीईओंना दिलेल्या पत्रात नमूद केला आहे़जून २०१७ मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी तालुक्यातील अवघड क्षेत्रातील शाळांचा सर्व्हे करून ३३ शाळांची यादी मंजूर केली होती़ त्यात या तालुक्यातील अंबडपाडा-सामºयापाडा, एकलव्यपाडा-बोराडी, धाबादेवीपाडा- सलईपाडा, विद्यानगर -टेंभेपाडा, वरचे रोषमाळ-गधडदेव, मालपुरापाडा-मालकातर, नवादेवी, उमरपाडा-चाकडू,  धरमपुरापाडा-गधडदेव, विकलापाडा- मालकातर, इंगन्यापाडा-  फत्तेपूर फॉरेस्ट, रोषमाळ, रामपूर, कढईपाणी- उमर्दा, प्रधानदेवी - उमर्दा, साकळीपाडा, कंज्यापाणी, बिकानेर- हाडाखेड, कुंडीपाडा-खैरखुटी, शेकड्यापाडा-खैरखुटी, काकडमाळ,  थुवानपाणी-गुºहाळपाणी,  निशानपाणी, पिपल्यापाणी- रोहिणी, नोटूपाडा-हिगांव, कौपाटपाडा-हिगांव, नवापाडा  -लाकड्या हनुमान, टिटवापाणी-चिलारे,  खुटमळी-चिलारे, पिरपाणी-चिलारे, कोईडोकीपाडा- सावेर, सातपाणीपाडा-महादेव दोंदवाडे, न्यू सातपाणी-महादेव दोंदवाडे या शाळांचा समावेश होता़ या गावातील शाळा ये-जा करण्यासाठी मुख्य रस्त्यापासून ४-५ कि.मी. अंतरावर असून तेथे जाण्यासाठी पायवाटेने जावे लागते़ कुठलेही वाहन जात नाही, खडकाळ रस्ता, नदी-नाल्यातून जावे लागते. पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो, विजेची सोय नाही तसेच भौतिक सुविधांपासून तेथील ग्रामस्थ वंचित राहतात़ अशाही परिस्थितीत तेथे झोपडीवजा घरात ज्ञानदानाचे काम केले जाते़ अवघड क्षेत्रातील शाळा सर्वसाधारणपणे तालुका मुख्यालयापासून दूर, दळणवळणाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोहचण्यास सोईसुविधा नाहीत, दुर्गम व डोंगराळ भागातील गावे तसेच काम करण्यास प्रतिकूल असलेली गावे ही अवघड क्षेत्र म्हणून निश्चित केली जातात असा अध्यादेश आहे़ या अवघड क्षेत्रातील शिक्षकांना बदली करतेवेळी प्राधान्य दिले जाते़ किमान  ३ वर्षे त्या भागात नोकरी केली  अशा शिक्षकांना अधिक लाभ होतो, भविष्यात या शिक्षकांना आर्थिक व इतर लाभदेखील मिळू शकणार आहेत़ पेसा अंतर्गत आदिवासी भागातील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी दिली आहे, त्याप्रमाणे भविष्यात या शिक्षकांनादेखील लाभ होऊ शकणार आहे़त्यामुळे आता फक्त या तालुक्यातील १४ शाळांतील शिक्षकांनाच लाभ मिळणार आहेत़ त्यात वरचे रोषमाळ-गधडदेव, मालपुरापाडा- मालकातर, कढईपाणी- उमर्दा, प्रधानदेवी-उमर्दा, साकळीपाडा, कंज्यापाणी, थुवानपाणी- गुºहाळपाणी, निशानपाणी, पिपल्यापाणी-रोहिणी, टिटवापाणी-चिलारे,  खुटमळी-चिलारे, पिरपाणी-चिलारे, कोईडोकीपाडा- सावेर,  न्यू सातपाणी-महादेव दोंदवाडे या शाळांचा समावेश आहे़उर्वरित १९ शाळांना वगळण्यात आल्यामुळे त्या शाळेतील शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे़ त्याही शाळा डोंगरदºयात असताना नेमके कोणत्या कारणामुळे वगळ्यात आल्या त्याचा खुलासा करावा, अशा आशयाचे निवेदन सीईओंना देण्यात आले आहे़ मात्र अद्यापपर्यंत त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही़शासनाच्या धोरणामुळे आदिवासी मुलांची शिक्षणाची गैरसोय नको म्हणून शाळांना मंजुरी दिली जाते़ ग्रामस्थांच्या मदतीनेच झोपडीवजा खोली मुलांसाठी सजली जाते़ मुले अ-ब-क-ड़़़ गिरवू लागतात, गाणी म्हणू लागतात, त्याच झोपडीत कुटुंबांची रेलचेल़़़ कोंबड्यांची पिलावळ तर कधी सापाचे दर्शनही घडते़  आज ना उद्या आपल्या गावात शाळेची टुमदार इमारत होईल असे स्वप्न साºयांचेच, परंतु ८-१० वर्षे झाली तरी या मुलांना दिवस मात्र झोपडीतच काढावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले़ दहा बाय दहाच्या खोलीत पहिली ते चौथीची मुले, गुरेढोरांचा कुबट वास, ऊन-पावसाची परिस्थिती, त्यातच मुलांना गोणपाटाची स्वच्छतागृहे तग धरून आहेत़ पाण्याची पुरेसी सोय नाही़ खिचडी शिजविण्याची जागा नाही़ प्रत्येक शाळेत भौतिक सुविधा पुरविण्याच्या जाहिराती पाहून धन्य वाटते, परंतु असे वास्तवदेखील आहे हे कळाल्यावर मात्र शासन किती निष्ठूर आहे याची जाणीव होते़ पाऊस आला म्हणजे काय हाल होत असतील कोण जाणे! तेथील गुरूजनांची होणारी परवड लक्षात घेण्याजोगी आहे़ शाळा खोली, स्वच्छतागृह, पाण्याची सुविधा, स्वयंपाकगृह आदी भौतिक सुविधा नसल्याने शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होताना दिसते़ आदिवासी मुलांना गुणवत्तेचा आग्रह धरण्याअगोदर अशा शाळांना भौतिक सुविधा द्याव्यात़ जेणेकरून मुलांचे मन रमणे शक्य होईल अन्यथा मुलांचे भविष्य अंधारातच राहील व तो दोष-पाप हे शासनाच्या माथी आल्याशिवाय राहणार नाही़ झोपडीत शाळाअनेर अभारण्य क्षेत्रात शाळा बांधकामास परवानगी मिळत नसल्यामुळे तब्बल ७-८ वर्षांपासून त्या परिसरातील जि़प़च्या शाळा आजही झोपडीवजा खोलीत शाळा भरतात. त्यात पिरपाणी, पिपल्यापाणी, सोज्यापाडा, न्यू सातपाणी, खुटमळी, भूपेशनगर, प्रधानदेवी, कौपाटपाडा आदींचा समावेश आहे़१० बाय १० च्या खोलीत पहिली ते चौथीची मुले, गुरेढोरांचा कुबट वास, ऊन पावसाची परिस्थिती, त्यातच मुलांना गोणपाटाची स्वच्छतागृहे तग धरून आहेत़ पाण्याची पुरेसी सोय नाही़ खिचडी शिजविण्याची जागा नाही, अशा एक ना अनेक समस्या आहेत.