शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरासाठी 100 कोटींची मागणी

By admin | Updated: March 27, 2017 18:34 IST

जळगाव शहरातील विकास कामांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र अजून 100 कोटींच्या निधीची मागणी केल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गिरीश महाजन : 25 कोटींच्या कामांपूर्वी अधिकारी व पदाधिका:यांची बैठक

 
जळगाव, दि.27 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहरातील विकास कामांसाठी 25 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र अजून 100 कोटींच्या निधीची मागणी केल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिवतीर्थ मैदानासमोरील जी.एम.फाउंडेशनच्या कार्यालयात त्यांनी सोमवारी  पत्रकारांनी संवाद साधला.
अधिकारी व पदाधिका:यांची बैठक घेणार
जळगाव शहरातील विकासासाठी शासनाने 25 कोटींचा निधी दिला आहे. या निधीमध्ये होणा:या कामांसंदर्भात जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त तसेच लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक घेणार आहे. जळगाव शहरात अमृत योजनेंतर्गत काम होणार आहे. त्यावेळी पाईप लाईनसाठी खोदकाम होईल, त्यामुळे अमृत योजनेचे काम केल्यानंतर रस्त्याचे काम करावे का? असा दुसरा मतप्रवाह समोर येत आहे. त्या विषयावरदेखील चर्चा करण्यात येणार आहे.
नाथाभाऊंचा राष्ट्रवादी प्रवेश ही अफवा
माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या सून या खासदार तर मुलगी जिल्हा बँक अध्यक्षा आहेत. त्यामुळे नाथाभाऊ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ही निव्वळ अफवा आहे. सध्या कोण कुणाबाबत अफवा पसरविणार हे सांगता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
सीबीआयने चौकशी केलेल्या अधिका:यांशी संबंध गैर नाही
चोपडा येथील जिल्हा बँकेच्या शाखेतून जुन्या नोटा बदल केल्याप्रकरणी सीबीआयने जि.प.चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदू वाणी यांची चौकशी केली आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी नंदू वाणी यांचे कुणासोबत संबंध आहे हे जगजाहीर असल्याचे विधान केले होते, याबाबत विचारले असता, त्यांनी अधिकारी यांच्यासोबत संबंध असणे गैर नसल्याचे स्पष्ट केले. लोकप्रतिनिधी म्हणून अनेक अधिकारी व कर्मचा:यांशी संबंध येत असतात. सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे चौकशी नंतर खरा प्रकार काय आहे, ते समोर येणारच आहे. ज्याने चूक केली आहे त्याला शिक्षा झालीच पाहीजे असे परखड मत त्यांनी नोटबदली प्रकरणाबाबत व्यक्त केले.
भादली दरोडा लवकरच उलगडणार
भादली येथील दरोडय़ातील मारेक:यांना अटक करण्यात पोलिसांना अजूनही यश आलेले नाही. आजच आपण पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली. गावातील नागरिक माहिती देत नसल्याने पोलिसांची अडचण आहे. मात्र पोलिसांना काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असून लवकरच या दरोडय़ाचा उलगडा होऊन मारेक:यांना अटक करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.