शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीच्या नव्या निर्णयाचे तरुणांकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:24 IST

उस्मानाबाद : राज्यातील एसईबीसी आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील तरुणांना खुल्या प्रवर्गात टाकण्याचा गृहविभागाने काढलेला आदेश रद्द करण्याचा निर्णय ...

उस्मानाबाद : राज्यातील एसईबीसी आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील तरुणांना खुल्या प्रवर्गात टाकण्याचा गृहविभागाने काढलेला आदेश रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भरतीप्रक्रिया लवकर राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचे तरुणांनी स्वागत केले आहे.

मागील तीन-चार वर्षांपासून पोलीस भरतीसाठी अथक परिश्रम घेणाऱ्या तरुणांना पोलीस भरतीचा जीआर रद्द झाल्याने तरुणांचा हिरमोड झाला होता. भरतीसंदर्भात उलटसुलट चर्चाही सुरू होत्या. तयारी करणाऱ्या तरुण, तरुणींमधून नाराजीचा सूर उमटत होता. ही बाब लक्षात घेऊन गृहविभागने हा आदेश रद्द करण्याची घोषणा केली आहे. शिवाय, राज्यात जवळपास १२ हजार पदांकरिता पोलीस भरती राबविण्यात येणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात ५ हजार २९५ पदांसाठी भरती होणार आहे. त्यामुळे तरुणांमधून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

मागील तीन वर्षांपासून तरुण पोलीस भरतीची तयारी करीत आहेत. भरतीसंदर्भात घोषणा झाल्याने त्यांना आनंद झाला होता. मात्र भरतीचा जीआर रद्द करण्यात आल्याने आशेवर पाणी फेरले होते. मात्र, भरतीची तयारी सुरू ठेवली आहे. शासनाने भरतीची घोषणा केली आहे. त्याप्रमाणे भरतीची प्रक्रियाही लवकर राबवावी.

बालाजी औंटी, वाडी बामणी, ता. उस्मानाबाद

पदवीपर्यंत शिक्षण घेऊन कमी वेळेत नोकरी मिळविण्यासाठी पोलीस भरतीकडे वळलो. तीन वर्षांपासून भरतीची तयारी उस्मानाबाद शहरात करत होतो. भरती होईल, असे वाटत असतानाच पुन्हा भरती लांबवणीवर पडली होती. शासनाने भरती होणार असल्याचे जाहीर केल्याने उत्साह वाढला आहे.

सचिन रोहिले, खामसवाडी, ता. कळंब

पोलीस भरतीबाबतचा जीआर निघाला होता. त्यानुसार तरुण मैदानावर सराव करीत होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर अध्यादेश थांबविण्यात आला होता. त्यामुळे तरुणांत नाराजी होती. शासनाने भरतीप्रक्रिया राबविणार असल्याची घोषणा केल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.

अजय गायकवाड,

साैंदणा अंबा, ता. कळंब

९२० नागरिकांमागे केवळ १ पोलीस

उस्मानाबाद जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास १६ लाख ५७ हजार एवढी आहे. पोलिसांची संख्या जवळपास १ हजार ८०० इतकी आहे. यात १०० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात ८ तालुके असून पोलीस कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. विशेष म्हणजे, ९२० नागरिकांमागे १ पोलीस कर्मचारी आहे.