शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

एसटीत ३० टक्के उपस्थितीत कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : कोरोनामुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसत आहे. जवळपास दोन हजारांवर कर्मचारी उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा आगारात आहेत. शासनाच्या ...

उस्मानाबाद : कोरोनामुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसत आहे. जवळपास दोन हजारांवर कर्मचारी उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा आगारात आहेत. शासनाच्या आदेशानुसार चालक-वाहकांची १५ टक्के उपस्थिती आहे, तर यांत्रिकी विभाग व प्रशासकीय विभागात ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थित काम चालू आहे.

कोेरोनाच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध बसावा, यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. त्याचा महामंडळाला फटका बसत आहे. मागील वर्षीपासून एसटीच्या उत्पन्नाला ग्रहण लागले आहे. कर्मचाऱ्यांचा पगार कसा करायचा, हा मोठा प्रश्न व्यवस्थापनासमोर निर्माण झाला आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे एसटीची चाके रुतल्याने हे महामंडळ प्रचंड अडचणीत सापडले आहे. वाहनात तांत्रिक बिघाड झाल्यास मेकॅनिकल विभागातील कुशल कामगारांना बालवावेच लागत आहे. त्यामुळे यांत्रिक विभाग व प्रशासकीय विभागात ३० ते ५० टक्के, तर वाहक व चालकांसाठी १५ टक्के उपस्थितीचा नियम असून, बसेस सुरू नसल्याने चालकांना स्वाक्षरीसाठी बोलाविले जात आहे. त्याची उपस्थिती १५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. बससेवा बंद असल्यामुळे एसटीला प्रतिदिन ५० लाख रुपयांचा फटका बसत आहे.

जिल्ह्यातील एकूण

चालक - १०५०

वाहक ९५०

अधिकारी १४

यांत्रिकी कर्मचारी ३७५

प्रशासकीय अधिकारी १८

वाहक-चालक महिनाभरापासून घरीच

राज्य शासनाने संचारबंदी जाहीर करताना अत्यावश्यक सेवा म्हणून बसचा वापर करण्याचा आदेश दिला आहे. मात्र, जिल्ह्यातील सहाही आगारात अत्यावश्यक सेवेला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे महिनाभरापासून वाहक-चालक घरीच आहेत.

शासनाने एसटीला शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच दुर्धर आजार, लग्न, निधन अशा कामासाठी प्रवाशांना एसटीतून प्रवासासाठी मुभा दिली आहे. मात्र, संचारबंदीमुळे प्रवासी बसकडे फिरकत नाहीत. त्यामुळे बस डेपोतच थांबून राहते.

चालक

१५ टक्के कर्मचारी उपस्थिती आदेशानुसार वाहक व चालक कर्तव्यावर उपस्थित राहण्यास तयार आहेत. मात्र मागील महिन्याभरापासून बससेवा बंद असल्यामुळे घरीच थांबावे लागत आहे.

वाहक

शासनाने वाहक व चालकांना १५ टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. तसेच यांत्रिकी व प्रशासकीय विभागातील ५० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थिती ठेवण्याचा आदेश आहे. सध्या प्रवासी नसल्याने बसेस बंद आहेत. त्यामुळे यांत्रिकी व प्रशासकीय विभागात गरजेनुसार म्हणजेच ३० ते ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहत आहेत तर बसेस सुरू नसल्याने वाहक-चालकांची १५ टक्केही उपस्थिती नाही.

ए.एम. पाटील,

आगारप्रमुख, उस्मानाबाद