शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

एसटीत ३० टक्के उपस्थितीत कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : कोरोनामुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसत आहे. जवळपास दोन हजारांवर कर्मचारी उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा आगारात आहेत. शासनाच्या ...

उस्मानाबाद : कोरोनामुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसत आहे. जवळपास दोन हजारांवर कर्मचारी उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा आगारात आहेत. शासनाच्या आदेशानुसार चालक-वाहकांची १५ टक्के उपस्थिती आहे, तर यांत्रिकी विभाग व प्रशासकीय विभागात ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थित काम चालू आहे.

कोेरोनाच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध बसावा, यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. त्याचा महामंडळाला फटका बसत आहे. मागील वर्षीपासून एसटीच्या उत्पन्नाला ग्रहण लागले आहे. कर्मचाऱ्यांचा पगार कसा करायचा, हा मोठा प्रश्न व्यवस्थापनासमोर निर्माण झाला आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे एसटीची चाके रुतल्याने हे महामंडळ प्रचंड अडचणीत सापडले आहे. वाहनात तांत्रिक बिघाड झाल्यास मेकॅनिकल विभागातील कुशल कामगारांना बालवावेच लागत आहे. त्यामुळे यांत्रिक विभाग व प्रशासकीय विभागात ३० ते ५० टक्के, तर वाहक व चालकांसाठी १५ टक्के उपस्थितीचा नियम असून, बसेस सुरू नसल्याने चालकांना स्वाक्षरीसाठी बोलाविले जात आहे. त्याची उपस्थिती १५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. बससेवा बंद असल्यामुळे एसटीला प्रतिदिन ५० लाख रुपयांचा फटका बसत आहे.

जिल्ह्यातील एकूण

चालक - १०५०

वाहक ९५०

अधिकारी १४

यांत्रिकी कर्मचारी ३७५

प्रशासकीय अधिकारी १८

वाहक-चालक महिनाभरापासून घरीच

राज्य शासनाने संचारबंदी जाहीर करताना अत्यावश्यक सेवा म्हणून बसचा वापर करण्याचा आदेश दिला आहे. मात्र, जिल्ह्यातील सहाही आगारात अत्यावश्यक सेवेला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे महिनाभरापासून वाहक-चालक घरीच आहेत.

शासनाने एसटीला शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच दुर्धर आजार, लग्न, निधन अशा कामासाठी प्रवाशांना एसटीतून प्रवासासाठी मुभा दिली आहे. मात्र, संचारबंदीमुळे प्रवासी बसकडे फिरकत नाहीत. त्यामुळे बस डेपोतच थांबून राहते.

चालक

१५ टक्के कर्मचारी उपस्थिती आदेशानुसार वाहक व चालक कर्तव्यावर उपस्थित राहण्यास तयार आहेत. मात्र मागील महिन्याभरापासून बससेवा बंद असल्यामुळे घरीच थांबावे लागत आहे.

वाहक

शासनाने वाहक व चालकांना १५ टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. तसेच यांत्रिकी व प्रशासकीय विभागातील ५० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थिती ठेवण्याचा आदेश आहे. सध्या प्रवासी नसल्याने बसेस बंद आहेत. त्यामुळे यांत्रिकी व प्रशासकीय विभागात गरजेनुसार म्हणजेच ३० ते ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहत आहेत तर बसेस सुरू नसल्याने वाहक-चालकांची १५ टक्केही उपस्थिती नाही.

ए.एम. पाटील,

आगारप्रमुख, उस्मानाबाद