शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
4
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
5
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
6
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
7
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
8
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
9
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
10
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
11
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
12
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
13
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
14
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
15
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
16
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
17
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
18
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
19
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
20
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेतील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:24 IST

कळंब -मागील काही दिवसांपासून कळंब शहर व तालुक्याचा कोरोनाबाधितांचा पाॅझिटिव्हिटी दर कमी होत असल्याने नागरिकांमधील घबराटीचे वातावरण कमी ...

कळंब -मागील काही दिवसांपासून कळंब शहर व तालुक्याचा कोरोनाबाधितांचा पाॅझिटिव्हिटी दर कमी होत असल्याने नागरिकांमधील घबराटीचे वातावरण कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेवरील निर्बंधही आता शिथिल करण्याची व्यापाऱ्यांची मागणी पुढे आली आहे. त्यामुळे प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

मागील दोन-तीन महिने कोरोनाने कळंबकरांना चांगलेच बांधून ठेवले होते. कोरोना संसर्गाचा पाॅझिटिव्हिटी दर आटोक्यात येत नसल्याने व मृत्यूदर वाढल्याने आरोग्य यंत्रणेचीही धावपळ उडाली. त्यातच कळंब येथे अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा, कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे अनेकदा रुग्ण उस्मानाबाद, लातूर, बार्शी, अंबाजोगाई आदी ठिकाणी रेफर करावे लागले. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, रुग्णवाहिका मिळविण्यासाठीही कसरत करावी लागली.

या सगळ्या संकटानंतर आता रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही दिलासा देणारी बाब समोर येत आहे. गुरुवारी आरोग्य विभागाने केलेल्या आरटीपीसीआर तपासणीत ५५ पैकी १२, तर रॅपिडच्या ६०८ पैकी ३२ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये पाॅझिटिव्हिटी दर कायम असला तरी रॅपिड चाचण्यांमध्ये तो कमी दिसतो आहे.

मागील काही दिवसांत मृत्यूदरही कमी होताना दिसत असला तरी दुसऱ्या लाटेत तब्बल शंभर जणांना जीव गमवावा लागला, हेही खरे आहे. पहिल्या लाटेपेक्षा ही संख्या जवळपास दुप्पट असल्याचेही समोर आले. त्यामुळे दुसरी लाट ओसरत

असल्याच्या भावनेमुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून बंद असलेल्या बाजारपेठेवरील निर्बंध काहीसे शिथिल करावेत, अशी मागणी आता व्यापारी वर्गातून पुढे येत आहे. शासनाने आता १५ जूनपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. कोरोनाचा धोका अजून पूर्णपणे संपला नाही व तज्ज्ञ तिसऱ्या लाटेचे संकेत देत आहेत. त्यामुळे बाजारपेठ खुली करण्याबाबत प्रशासन ठोस पावले उचलत नसल्याचे चित्र आहे.

चौकट -

व्यापाऱ्यांच्या वतीने बलाई यांचा पुढाकार

कळंब शहरातील व्यापाऱ्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन केले. कोरोना संसर्गाचा धोका संपला नसल्याने कोरोनाबाबतचे नियम पाळूनच उद्योग, व्यवसाय सुरू राहणार आहेत. सध्या प्रशासनाने अत्यावश्यक सेवा ठराविक वेळेत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. याबरोबरच इतर दुकाने त्याच कालावधीत उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी येथील व्यापारी आनंद बलाई यांनी व्यापाऱ्यांच्या वतीने प्रशासनाकडे केली आहे.

अनेक व्यापाऱ्यांना उदरनिर्वाहाचे इतर साधन नाही. अनेकांना उपासमार सहन करावी लागत आहे. कोरोनाचे नियम पाळून निर्धारित वेळेत त्यांना दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली, तर त्यांना दिलासा मिळेल व त्यांची उपासमार टळेल, असेही बलाई यांनी निवेदनात म्हटले आहे. बलाई यांनी शहरातील व्यापाऱ्यांच्या वतीने केलेली ही शिष्टाई फळाला यावी, अशी अपेक्षा व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

चौकट -

जिल्हा प्रशासन निर्णय घेईल -उपविभागीय अधिकारी

कोरोनाचा संसर्ग दर कमी झाला आहे; पण संपला नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना सर्व बाजूने विचार करावा लागेल. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सुरू करण्याबाबत अजून कोणत्याही सूचना वरिष्ठ कार्यालयातून मिळाल्या नाहीत; पण परिस्थिती पाहून त्या दुकानांना ठराविक वेळेत उघडण्यासाठी परवानगी मिळू शकेल; पण तूर्तास त्याबद्दल सांगता येणार नाही, अशी माहिती उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी दिली.

चौकट -

कोट्यवधींची उलाढाल ठप्प!

कापड, किराणा, अडत, सोने-चांदी या खरेदीसाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातील ग्राहकांची कळंब बाजारपेठ पहिल्या पसंतीची ठरली आहे. मागील जवळपास दीड वर्षापासून कोरोनाने या बाजारपेठेला कोट्यवधीचा फटका बसला आहे. या बाजारपेठेवर अवलंबून लहान-मोठे व्यापारीही हतबल झाले आहेत. हे चित्र कधी बदलेल, याकडे आता बाजारपेठेचे लक्ष लागले आहे.