शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

आवाड शिरपुरा बंधाऱ्यात पाणी साेडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST

कळंब : तालुक्यातील आवाड शिरपुरा येथील बंधाऱ्यात पाणी साेडण्यास मांजरा प्रकल्प टाळाटाळ करीत हाेता. हा प्रकार समाेर आल्यानंतर खासदार ...

कळंब : तालुक्यातील आवाड शिरपुरा येथील बंधाऱ्यात पाणी साेडण्यास मांजरा प्रकल्प टाळाटाळ करीत हाेता. हा प्रकार समाेर आल्यानंतर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बैठक घेत तंबी दिली. यानंतर मांजरा प्रकल्प विभागाकडून बंधाऱ्यात पाणी साेडले. याचा चार गावातील शेतीला फायदा होणार आहे.

मांजरा प्रकल्पाचा लातूर, उस्मानाबाद व बीड या तीनही जिल्ह्याला फायदा होतो. मांजरा नदी चांगली प्रवाही होत प्रकल्प भरला की लातूर, अंबाजोगाई, कळंब, केज आदी शहरे व गावांची तहान तर भागवली जातेच, शिवाय बॅकवॉटर व लाभक्षेत्रातील गावातील बागायती बहरते.

एकूणच प्रकल्पात पुरेशा पाणीसाठा असला की प्रकल्पाच्या ९० किमी डाव्या व ७८ किमी लांबीच्या उजव्या कालव्यातून पाण्याचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात येते. याबरोबरच या कालव्यातून आवाड शिरपुरा शिवारातील दोन को.प. बंधाऱ्यांतही पाणी सोडण्यात येत असते. प्रकल्पाची ओंजळ भरलेली असल्यावर आजवर हा शिरस्ता पाळण्यात आलेला आहे.

असे असताना यंदा मात्र प्रकल्प फक्त लातूरकरांसाठीच आहे असा समज करून बसलेल्या प्रकल्प विभागाने मागणी होऊनही शिरपुऱ्याच्या बंधाऱ्यात पाणी सोडण्यास टाळाटाळ केल्याने यावर निर्भर शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. अखेर या विषयावर आयोजित बैठकीत खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यामुळे बुधवारी तत्काळ बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे.

चौकट...

एकमेव ‘अ‍ॅक्टिव्ह’ पाणी वापर संस्था तरी...

तालुक्यातील आवाड शिरपुरा, सौंदना अंबा, दाभा व केज तालुक्यातील सौंदना भिसे येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत श्री विठ्ठल कालवा पाणी वाटप सहकारी संस्था उभी केली आहे. या संस्थेचे उमेश कुलकर्णी अध्यक्ष, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख रामलिंग आवाड उपाध्यक्ष असून, ही एकमेव ‘अ‍ॅक्टिव्ह’ असलेली पाणी वापर संस्था आहे. प्रकल्प विभागाचा एक रुपयाही देणं ठेवत नाही. अगदी अगाऊ रक्कम जमा करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. असे असतानाही प्रकल्प विभाग या संस्थेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बंधाऱ्यात पाणी सोडण्यास टाळाटाळ करत होता.

शेकडो हेक्टरला फायदा; पण....

विठ्ठल पाणी वापर संस्थेच्या कार्यक्षेत्रातील आवाड शिरपुरा हद्दीमधील नदीपात्रात दोन काेल्हापुरी बंधारे आहेत. यातील एकात उजव्या तर दुसऱ्यात डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येते. यापैकी एकाचा टेलएन्ड प्रकल्पालगत तर दुसऱ्याचा शिरपुऱ्यालगत आहे. एकूणच चारेक किमी अंतरावर कोट्यावधी लीटर पाण्याचा साठा होत शेकडो एकर शेतीला याचा फायदा होत असतो. परंतु, यात पाणी सोडण्यास टाळाटाळ करत तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो.

खासदारांनी घेतली आक्रमक भूमिका...

शेतकऱ्यांना मांजरा प्रकल्प विभाग जुमानत नसल्याच्या तक्रारी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी लाभक्षेत्र विभागाचे लातूरचे अधीक्षक अभियंता श्री म्हेत्रे व प्रभारी कार्यकारी अभियंता यांची मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीस शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख रामलिंग आवाड व काही शेतकरी उपस्थित होते. यावेळी पाणी सोडण्यास का टाळाटाळ केली जाते, याचा जाब खासदारांनी उभय अधिकाऱ्यांना विचारत धारेवर धरले. उद्यापर्यंत पाणी नाही सोडले तर मी स्वतः तेथे पोहोचून पुढील पावले उचलेल, असा सज्जड इशारा दिला. यानंतर गुरुवारी तातडीने पाणी सोडले.