शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

बलसूरला पंधरा दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:17 IST

बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर गावाला ग्रामपंचायतीकडून सध्या पंधरा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. यामुळे ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी ...

बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर गावाला ग्रामपंचायतीकडून सध्या पंधरा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. यामुळे ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी ही वेळ ओढवल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.

बलसूर गावची लोकसंख्या तेरा ते चौदा हजार असून, भूकंपानंतर या गावाचे अन्य ठिकाणी पुनर्वसन झाले आहे. गावात २००५ साली जवळपास सव्वा ते दीड कोटी रुपये खर्च करून शासनाची जलस्वराज पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. सदर योजनेतून तांड्यासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा करण्यासाठी बलसूर साठवण तलाव क्र. २ च्या बांधाखाली सिंचन विहीर तसेच टाकी उभारण्यात आली, तसेच गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी बलसूर साठवण तलाव क्र. १ च्या बांधाखाली सिंचन विहीर आणि गावासाठी दोन लाख लिटर क्षमतेची टाकी उभारण्यात आली. याशिवाय, गावात पाइप लाइनही करण्यात आल्याने सततच्या पाणी टंचाईपासून कायमस्वरूपी मुक्ती मिळेल, अशी आशा ग्रामस्थांना होती; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनाअभावी उन्हाळा असो वा पावसाळा, गावात चौदा ते पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरला. यामुळे गावाला पाणी पुरवठा करणारी सिंचन विहीरही तुडुंब भरली आहे. असे असतानाही ग्रामस्थांना मात्र घागरभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असून, काही जण विकतच्या पाण्यावर तहान भागवित आहेत. पाणी टंचाईबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारुन नेत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.

चौकट...........

सौरपंपाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

पूर्वीची गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी बलसूर पाझर तलावाच्या बांधाखाली असलेली विहीर सध्या पाण्याने तुडुंब भरली आहे; मात्र त्याचा वापरच नसल्याने त्याचे पाणी शेतकरी वापरत आहेत. शिवाय, काळनिंबाळा तलावाच्या बांधाखालीही एक विहीर असून, तलाव भरल्यामुळे त्यातदेखील भरपूर पाणी आहे. यातून जलवाहिनीद्वारे पाणी टाकीत सोडले जाते; परंतु या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे, तसेच या विहिरीवर ७ लाख ८५ हजार रुपये खर्च करून वर्षभरापूर्वी सौर उर्जेवर आधारित १० एचपी क्षमतेचा सौरपंपही बसविण्यात आला; परंतु अतिवृष्टीमुळे त्याचे काही नुकसान झाले असून, आठ ते दहा महिन्यांपासून याच्या दुरुस्तीकडे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग देखभाल दुरुस्ती कक्षाचेही दुर्लक्ष झाले आहे.

पाइपलाइन आहे, पण टाकी नाही !

मल्लिकार्जुन वस्तीवर जलस्वराज योजनेतून काही ठिकाणी केवळ पाइपलाइन करण्यात आलेली आहे; परंतु अद्याप टाकी उभारली गेली नसल्याने पंधरा वर्ष उलटले तरी येथे नळाद्वारे पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. तीनशे ते चारशे लोकसंख्या असलेल्या या वस्तीवर जलस्वराज योजना हे नाव केवळ ऐकण्यापुरतेच राहिले आहे. येथील रहिवाशांनादेखील पंधरा वर्षांपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

कोट........

बलसूर साठवण तलावाच्या बांधाखालील गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीवरील विद्युत ट्रान्सफार्मरवर जास्तीचा भार असून, त्यातच आठ तास विद्युत पुरवठा होत असल्याने टाकीमध्ये सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. पाणी पुरवठ्यासाठी गावठाण फिडरहून स्वतंत्र विद्युत ट्रान्सफार्मरची मागणी करण्यात आली आहे. त्याचे काम झाल्यास सुरळीत पाणी पुरवठा होईल.

- एस. आर. पांढरे, ग्रामविकास अधिकारी

गावात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर असून, गावात चौदा ते पंधरा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. अनेक जण टँकरचे पाणी विकत घेत आहेत; परंतु गोरगरिबांनी काय करायचे? लाखो रुपये खर्च करूनही ग्रामपंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी असून, ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.

- संदीप बिराजदार, ग्रामस्थ.

जलस्वराज योजना राबवून पंधरा वर्षे झाली; परंतु अद्याप नळाला पाणी आले नाही. लाखो रुपये खर्च करूनही मल्लीकार्जुंन वस्तीवरील नागरिकांना सतत पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या योजनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच वस्तीवरील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा.

व्यंकट गव्हाणे, रहिवासी, मल्लीकार्जुन वस्ती

फोटो - 1)काळनिंबाळा साठवण तलावाच्या बांधाखालील विहिरीवर सौर उर्जेवर आधारित सौर पंप बसविण्यात आले आहे; मात्र काही कारणांमुळे ते ही नादुरुस्त असल्याने ते दहा महिन्यांपासून बंद आहे.

2)नागरिकांना पाण्यासाठी अशी वनवन भटकंती करावी लागत आहे.

3)गावात अशा प्रकारे टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे.

4)काळनिंबाळा तलावाच्या बांधाखालील पाणी पुरवठा करणारी विहीर अशी तुडूंब भरुन आहे.