आंदाेलन -शिवरायांच्या पुतळ्याचे सुशाेभिकरण करा
तुळजापूर : मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी नगरपालिकेसमोर भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गुरुवारी लाक्षणिक उपाेषण करण्यात आले.
तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तातडीने बसवावा. जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व जनतेचे कुलदैवत श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना शहरात आल्याबरोबर तमाम रयतेचा राजा छत्रपती शिवरायांचेही दर्शन व्हायला पाहिजे होते; परंतु, मागील तीन वर्षांत काहीच झाले नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पुतळ्याविना होत असल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे पुतळ्याचे तातडीने सुशाेभीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने पालिकेसमाेर गुरुवारी लाक्षणिक उपाेषण करण्यात आले. आंदाेलनामध्ये नगरसेवक भाई राहुलजी खपले, राष्ट्रवादीचे गोकुळ शिंदे, रिपाइंचे आनंद पांडगळे, तानाजी कदम, सेनेचे सुधीर कदम, नगरसेवक अमर मगर, जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजय साळुंके, जिजामाता प्रतिष्ठानचे मधुकर शेळके, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप गंगणे, लखन पेंदे, नगरसेवक सुनील रोचकरी, भाई उत्तम अमृतराव, महेश चोपदार आदी उपस्थित हाेते.
चाैकट...
आंदाेलनास यांचाही पाठिंबा...
भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने केलेल्या आंदाेलनास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं (अ), बजरंग दल, प्रहार संघटना, लहुजी सेना, जनसंघटनेने पाठिंबा दिला.