शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:38 IST

उस्मानाबाद : यंदा जून व जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. पिके जोमदार आली ...

उस्मानाबाद : यंदा जून व जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. पिके जोमदार आली असतानाच मागील २० दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने ५ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

मे महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. जून महिन्यात अधूनमधून पाऊस हजेरी लावत राहिला. त्यामुळे बहुतांश भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ५ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या सर्वाधिक ३ लाख ६३ हजार १२३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा झाला आहे, तूर ६० हजार १९१ हेक्टर, उडीद ४९ हजार ५१८ हेक्टर, मुगाची १८ हजार ९०३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. कापसाची २ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. पिके बहरली असतानाच मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे पिके माना टाकू लागली आहेत. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे. असे शेतकरी तुषार सिंचनाचा वापर करुन पिके जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. सर्वांनी एकाच वेळी पाणी देण्यास सुरुवात केल्याने विजेचा वापर वाढला आहे. परिणामी शेतीपंपास कमी दाबाने वीजपुरवठा होऊ लागला आहे.अतिरिक्त भार वाढल्याने रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे.

पीकनिहाय क्षेत्र क्षेत्रफळमध्ये

ज्वारी २,८०७

सोयाबीन ३,७०,२६२

तूर ६२,६२०

मूग १९,३२६

उडीद ५२,४६४

जून महिन्यात पाऊस झाल्यानंतर दोन एकर क्षेत्रावर सोयाबीन लागवड केली. पिके जोमात आली असतानाच पावसाने पाठ फिरविली आहे. पिकांनी माना टाकल्या आहेत.

अशोक मनसुके, शेतकरी

पाच एकर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली आहे. पिके चांगली आली होती; मात्र पावसाने उघडीप दिल्याने पिके करपू लागली आहेत. पाऊस न झाल्यास पिके जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सागर भोंग, शेतकरी

कोट...

पावसाने उघडीप दिल्याने हलक्या जमिनीवरील सोयाबीन, उडीद, मूग माना टाकू लागले आहे. पावसाचा खंड पडल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. पिकांचे सॅम्पल घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बी. यू. बिराजदार, प्रभारी कृषी अधीक्षक कृषी अधिकारी