शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
4
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
5
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
6
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
7
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
8
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
9
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
10
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
11
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
13
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
14
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
15
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
16
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
17
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
18
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
19
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
20
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:38 IST

उस्मानाबाद : यंदा जून व जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. पिके जोमदार आली ...

उस्मानाबाद : यंदा जून व जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. पिके जोमदार आली असतानाच मागील २० दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने ५ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

मे महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. जून महिन्यात अधूनमधून पाऊस हजेरी लावत राहिला. त्यामुळे बहुतांश भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ५ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या सर्वाधिक ३ लाख ६३ हजार १२३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचा पेरा झाला आहे, तूर ६० हजार १९१ हेक्टर, उडीद ४९ हजार ५१८ हेक्टर, मुगाची १८ हजार ९०३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. कापसाची २ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. पिके बहरली असतानाच मागील वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे पिके माना टाकू लागली आहेत. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे. असे शेतकरी तुषार सिंचनाचा वापर करुन पिके जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. सर्वांनी एकाच वेळी पाणी देण्यास सुरुवात केल्याने विजेचा वापर वाढला आहे. परिणामी शेतीपंपास कमी दाबाने वीजपुरवठा होऊ लागला आहे.अतिरिक्त भार वाढल्याने रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे.

पीकनिहाय क्षेत्र क्षेत्रफळमध्ये

ज्वारी २,८०७

सोयाबीन ३,७०,२६२

तूर ६२,६२०

मूग १९,३२६

उडीद ५२,४६४

जून महिन्यात पाऊस झाल्यानंतर दोन एकर क्षेत्रावर सोयाबीन लागवड केली. पिके जोमात आली असतानाच पावसाने पाठ फिरविली आहे. पिकांनी माना टाकल्या आहेत.

अशोक मनसुके, शेतकरी

पाच एकर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली आहे. पिके चांगली आली होती; मात्र पावसाने उघडीप दिल्याने पिके करपू लागली आहेत. पाऊस न झाल्यास पिके जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सागर भोंग, शेतकरी

कोट...

पावसाने उघडीप दिल्याने हलक्या जमिनीवरील सोयाबीन, उडीद, मूग माना टाकू लागले आहे. पावसाचा खंड पडल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. पिकांचे सॅम्पल घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बी. यू. बिराजदार, प्रभारी कृषी अधीक्षक कृषी अधिकारी