शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

आप्पासाहेब चव्हाण यांचा सपत्निक सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:34 IST

उमरग्यात अवैध धंदे सुरूच उमरगा : शहरासह ग्रामीण भागातही काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. पाेलीस, महसूल विभागाकडून प्रतिबंधात्मक आदेशाची ...

उमरग्यात अवैध धंदे सुरूच

उमरगा : शहरासह ग्रामीण भागातही काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. पाेलीस, महसूल विभागाकडून प्रतिबंधात्मक आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे पाेलीस यंत्रणेवर ताण आहे. त्यामुळे अवैध धंदेचालकांचे फावले आहे. निर्बंध असतानाही अनेक ढाबे बाहेरून बंद दिसत असले, तरी आतून सुरू आहेत. यासाेबतच अन्य व्यवसायांच्या बाबतीतही असेच चित्र आहे. त्यामुळे काेराेनाचा संसर्ग वाढण्याचा धाेका बळावला आहे. हा प्रकार लक्षात घेता, अवैध धंदेचालकांविरूद्ध कठाेर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उमरगेकरांतून हाेऊ लागली आहे.

बाजारातील गर्दी कमी हाेता हाेईना

उस्मानाबाद : काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्हाभरातील आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. असे असतानाही आठवडी बाजाराच्या दिवशी बाजारपेठेत गर्दी हाेत आहे. अशा गर्दीमध्ये सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा विक्रेत्यांसह ग्राहकांनाही विसर पडल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत काेराेनाचा धाेका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबतीत ठाेस पावले उचलण्याची गरज आता उस्मानाबादकरांतून व्यक्त केली जात आहे.

साेनारी येथे काेविड सेंटर सुरू

परंडा : तालुक्यातील साेनारी येथे भैरवनाथ काेविड केअर सेंटर गुरूवारी सुरू करण्यात आले. याचे उद्घाटन आमदार प्रा.डाॅ. तानाजी सावंत यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी ५१ बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके, जिल्हा प्रमुख गाैतम लटके, प्रतिष्ठानचे रामचंद्र घाेगरे, नवनाथ जगताप, अंगद फडतरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

आठ महिन्यांनंतर पथदिव्यांची दुरुस्ती

लाेहारा : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैक ते बस स्थानक या दरम्यानच्या रस्त्यावरील पथदिवे मागील सात ते आठ महिन्यांपासून नादुरुस्त हाेते. पथदिवे बंद असल्याने या मार्गावर अंधार असे. परिणामी, या परिसरात अधून-मधून अपघाती घटनाही घडत हाेत्या. याबाबत नागरिकांतून नाराजी व्यक्त केल्यानंतर नगरपंचायतीचे सभपती श्रीनिवास फुलसुंदर यांनी तातडीची बैठक घेऊन वायरिंग दुरुस्ती व पथदिवे बसविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करीत दिवे सुरू केले. त्यामुळे तब्बल आठ महिन्यांनंतर हा रस्ता पथदिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे. याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त केले जाऊ लागले आहे.