शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सिमला मिरची शेतकऱ्यांकडून पाच रुपयांना किलाे, ग्राहकांच्या पदरात वीसला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:36 IST

सवाल - ग्राहकांना लुटणारी ‘‘मध्यस्थी’’ कुठंपर्यंत सहन करायची... कळंब - तरकारी मार्केटला विक्रीसाठी गेल्यावर सिमला मिरची चार, पाच रुपये ...

सवाल - ग्राहकांना लुटणारी ‘‘मध्यस्थी’’ कुठंपर्यंत सहन करायची...

कळंब - तरकारी मार्केटला विक्रीसाठी गेल्यावर सिमला मिरची चार, पाच रुपये किलोने विकली जात असली तरी, बाजारात मात्र व्यापारी ती वीस रुपये किलोने ग्राहकांच्या घशात घालत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अन् ग्राहकांना लुटणारी ही ‘‘मध्यस्थी’’ कुठंवर सहन करायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आहारात लागणाऱ्या भाज्या बाजारात मिळतात. याच्या वितरण व्यवस्थेत शेतकरी कमी अन् व्यापारीच जास्त आहेत. यातच या भाज्या पिकवतात शेतकरी अन् विकतात मात्र व्यापारी. या प्रवासात शेतकऱ्यांचा हा ‘भाजीपाला’ व्यापाऱ्यांची ‘‘तरकारी’’ होतो अन् ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचत असला तरी, त्याच्या ठोक खरेदी किमतीत अन् किरकोळ विक्री भावात कमालीची तफावत आहे. कोरोना लॉकडाऊन पर्वानंतरच्या दराचा विचार केला, तर लुटीचा हा शिरस्ता कायमच असल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांचा खर्च निघेना

१) उभ्या पिकावर नांगर फिरवला

माझ्या दोन एकर क्षेत्रात सिमला मिरचीचे पीक घेतले होते. निजामाबाद, सोलापूर, पुणे असे विविध मार्केट दाखवले. मात्र, तीन-चार रुपयांच्या पुढे किलोला भाव मिळेना. यात उत्पादन खर्च तर सोडाच, वाहतूक खर्चही निघेना. यामुळे उभ्या पिकावर नांगर फिरवला आहे.

- रणजित दिवाने, शेलगाव (दि)

2) बिटमधील किलो, बाजारात पावकिलो

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या भाजीपाल्यास बाजारात दर मिळत नाही. व्यापारी लूट करायचे सोडत नाहीत. यात ना ग्राहकांचा फायदा आहे, ना शेतकऱ्यांचा होतोय. तो फक्त व्यापाऱ्यांना तरकारी मार्केटला एखादी भाजी १० रुपये किलो जात असेल, तर ग्राहकाला मात्र दहा रुपयाला पावकिलोच मिळत आहे.

- दत्तात्रय जाधव, इटकूर

ग्राहकांचे काय? विकणाऱ्यांनी ठरवायचे...

1) दररोजच्या आहारात भाजीसाठी विविध शेतीमाल खरेदी करावा लागतो. बाजारात व्यापाऱ्यांचे वर्चस्व असल्याने ते ठरवतील तोच दर आम्हाला कायम असतो. यामुळे आमच्या किंवा उत्पादक शेतकऱ्यांच्या मताला किंमत नसते. यामुळे शेतकऱ्यांकडून दहा रुपये किलोने घेतलेली भाजी आम्हाला केवळ मध्यस्थांच्या साखळीमुळे चाळीस रुपये किलोने घ्यावी लागते.

- सचिन क्षीरसागर, कळंब

2) देणाऱ्याने देत जावे अन् खाणाऱ्याने खात जावे, अशीच काहीशी अवस्था वर्षानुवर्षे आहे. टोमॅटो उत्पादक नातलगांना विचारले तर ते म्हणतात, चार, पाच रुपयांनी माल गेला अन् आम्ही बाजारात घ्यायला गेलो, तर वीस रुपयांच्या आत मिळत नाही. यामुळे मध्यस्थ लूट करत असल्याचे स्पष्ट होत आहे. दहा रुपयाची कारली चाळीस रुपयांनी घेतली.

भावात एवढा फरक का?

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला ठोक स्वरूपात विकला जातो. इथे काहींना किलोवर, तर काहींना जुडीवर, तर काहींना कॅरेटवर खरेदी केले जाते. यात स्थिरावलेले व्यापारी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च व वाहतूक या बाबीचा विचार न करता आपला विशेषाधिकार वापरत भाव काढतात. पुढे ते इतर लहानसहान व्यापाऱ्यांना माल देतात. ते पुढे ग्राहकांना देतात. यामध्ये उत्पादकापेक्षा अधिक नफा हे मध्यस्थ कमावतात. यामुळे ग्राहकांनाही भुर्दंड सहन करावा लागतो. या सर्व बाबी एका व्यापाऱ्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केल्या.