शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

सिमला मिरची शेतकऱ्यांकडून पाच रुपयांना किलाे, ग्राहकांच्या पदरात वीसला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:36 IST

सवाल - ग्राहकांना लुटणारी ‘‘मध्यस्थी’’ कुठंपर्यंत सहन करायची... कळंब - तरकारी मार्केटला विक्रीसाठी गेल्यावर सिमला मिरची चार, पाच रुपये ...

सवाल - ग्राहकांना लुटणारी ‘‘मध्यस्थी’’ कुठंपर्यंत सहन करायची...

कळंब - तरकारी मार्केटला विक्रीसाठी गेल्यावर सिमला मिरची चार, पाच रुपये किलोने विकली जात असली तरी, बाजारात मात्र व्यापारी ती वीस रुपये किलोने ग्राहकांच्या घशात घालत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अन् ग्राहकांना लुटणारी ही ‘‘मध्यस्थी’’ कुठंवर सहन करायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आहारात लागणाऱ्या भाज्या बाजारात मिळतात. याच्या वितरण व्यवस्थेत शेतकरी कमी अन् व्यापारीच जास्त आहेत. यातच या भाज्या पिकवतात शेतकरी अन् विकतात मात्र व्यापारी. या प्रवासात शेतकऱ्यांचा हा ‘भाजीपाला’ व्यापाऱ्यांची ‘‘तरकारी’’ होतो अन् ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचत असला तरी, त्याच्या ठोक खरेदी किमतीत अन् किरकोळ विक्री भावात कमालीची तफावत आहे. कोरोना लॉकडाऊन पर्वानंतरच्या दराचा विचार केला, तर लुटीचा हा शिरस्ता कायमच असल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांचा खर्च निघेना

१) उभ्या पिकावर नांगर फिरवला

माझ्या दोन एकर क्षेत्रात सिमला मिरचीचे पीक घेतले होते. निजामाबाद, सोलापूर, पुणे असे विविध मार्केट दाखवले. मात्र, तीन-चार रुपयांच्या पुढे किलोला भाव मिळेना. यात उत्पादन खर्च तर सोडाच, वाहतूक खर्चही निघेना. यामुळे उभ्या पिकावर नांगर फिरवला आहे.

- रणजित दिवाने, शेलगाव (दि)

2) बिटमधील किलो, बाजारात पावकिलो

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या भाजीपाल्यास बाजारात दर मिळत नाही. व्यापारी लूट करायचे सोडत नाहीत. यात ना ग्राहकांचा फायदा आहे, ना शेतकऱ्यांचा होतोय. तो फक्त व्यापाऱ्यांना तरकारी मार्केटला एखादी भाजी १० रुपये किलो जात असेल, तर ग्राहकाला मात्र दहा रुपयाला पावकिलोच मिळत आहे.

- दत्तात्रय जाधव, इटकूर

ग्राहकांचे काय? विकणाऱ्यांनी ठरवायचे...

1) दररोजच्या आहारात भाजीसाठी विविध शेतीमाल खरेदी करावा लागतो. बाजारात व्यापाऱ्यांचे वर्चस्व असल्याने ते ठरवतील तोच दर आम्हाला कायम असतो. यामुळे आमच्या किंवा उत्पादक शेतकऱ्यांच्या मताला किंमत नसते. यामुळे शेतकऱ्यांकडून दहा रुपये किलोने घेतलेली भाजी आम्हाला केवळ मध्यस्थांच्या साखळीमुळे चाळीस रुपये किलोने घ्यावी लागते.

- सचिन क्षीरसागर, कळंब

2) देणाऱ्याने देत जावे अन् खाणाऱ्याने खात जावे, अशीच काहीशी अवस्था वर्षानुवर्षे आहे. टोमॅटो उत्पादक नातलगांना विचारले तर ते म्हणतात, चार, पाच रुपयांनी माल गेला अन् आम्ही बाजारात घ्यायला गेलो, तर वीस रुपयांच्या आत मिळत नाही. यामुळे मध्यस्थ लूट करत असल्याचे स्पष्ट होत आहे. दहा रुपयाची कारली चाळीस रुपयांनी घेतली.

भावात एवढा फरक का?

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला ठोक स्वरूपात विकला जातो. इथे काहींना किलोवर, तर काहींना जुडीवर, तर काहींना कॅरेटवर खरेदी केले जाते. यात स्थिरावलेले व्यापारी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च व वाहतूक या बाबीचा विचार न करता आपला विशेषाधिकार वापरत भाव काढतात. पुढे ते इतर लहानसहान व्यापाऱ्यांना माल देतात. ते पुढे ग्राहकांना देतात. यामध्ये उत्पादकापेक्षा अधिक नफा हे मध्यस्थ कमावतात. यामुळे ग्राहकांनाही भुर्दंड सहन करावा लागतो. या सर्व बाबी एका व्यापाऱ्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केल्या.