शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
2
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
3
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
4
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
5
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
6
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
7
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
8
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
9
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
10
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
11
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
12
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
13
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
14
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
15
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
16
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
17
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
18
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
19
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याबाबत कृषिमंत्र्यांच्या निर्णयानंतर भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:29 IST

उस्मानाबाद : पीक विम्यासंदर्भात कृषिमंत्र्यांनी सर्व बाबींची सखोल माहिती घेऊन दोन दिवसांत निर्णय घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या ...

उस्मानाबाद : पीक विम्यासंदर्भात कृषिमंत्र्यांनी सर्व बाबींची सखोल माहिती घेऊन दोन दिवसांत निर्णय घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयानंतर भारतीय जनता पार्टी आपली पुढील दिशा ठरविणार असून, वंचित शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी व्यक्त केला आहे.

ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले अधिकांश बाधित शेतकरी तांत्रिक कारणामुळे पीकविम्याच्या हक्काच्या नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. या संदर्भात राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे १२ जानेवारी रोजी केली होती. दरम्यान, भुसे हे आजारी असल्यामुळे याबाबत काही निर्णय होऊ शकला नव्हता. सदर विषयाबाबत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची मंत्रिमहोदयांसोबत चर्चा झाली असून, या अनुषंगाने सर्व बाबींची सखोल माहिती घेऊन दोन दिवसांत भूमिका जाहीर करण्याचे आश्वासन मंत्री दादाजी भुसे यांनी दिले असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

चौकट........

विमा कंपनीने २४, ऑक्टोबरनंतर आलेले अर्ज गृहीत न धरण्याची भूमिका घेतली होती. याबाबत कृषी आयुक्त व विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर उशिराने आलेले अर्ज ग्राह्य धरत अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसानीच्या अनुषंगाने रक्कम वर्ग करण्यात येत आहे; परंतु बहुतांश शेतकरी अर्जच करू न शकल्याने ते नुकसानभरपाईपासून वंचित राहत आहेत. या शेतकऱ्यांना विमा मिळावा या अनुषंगाने कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे तांत्रिक दोष निदर्शनास आणून देत याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

खरीप २०१९ मध्ये अशीच परिस्थिती असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमा कंपन्यांना सरसकट मदत करण्यास बाध्य केले होते, ही बाबदेखील कृषिमंत्र्यांना अवगत केली. कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन सर्व शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवून देतील, अशी अपेक्षा असल्याचेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.