शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

पीक विम्याबाबत कृषिमंत्र्यांच्या निर्णयानंतर भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:29 IST

उस्मानाबाद : पीक विम्यासंदर्भात कृषिमंत्र्यांनी सर्व बाबींची सखोल माहिती घेऊन दोन दिवसांत निर्णय घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या ...

उस्मानाबाद : पीक विम्यासंदर्भात कृषिमंत्र्यांनी सर्व बाबींची सखोल माहिती घेऊन दोन दिवसांत निर्णय घेण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयानंतर भारतीय जनता पार्टी आपली पुढील दिशा ठरविणार असून, वंचित शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी व्यक्त केला आहे.

ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले अधिकांश बाधित शेतकरी तांत्रिक कारणामुळे पीकविम्याच्या हक्काच्या नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. या संदर्भात राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे १२ जानेवारी रोजी केली होती. दरम्यान, भुसे हे आजारी असल्यामुळे याबाबत काही निर्णय होऊ शकला नव्हता. सदर विषयाबाबत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची मंत्रिमहोदयांसोबत चर्चा झाली असून, या अनुषंगाने सर्व बाबींची सखोल माहिती घेऊन दोन दिवसांत भूमिका जाहीर करण्याचे आश्वासन मंत्री दादाजी भुसे यांनी दिले असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

चौकट........

विमा कंपनीने २४, ऑक्टोबरनंतर आलेले अर्ज गृहीत न धरण्याची भूमिका घेतली होती. याबाबत कृषी आयुक्त व विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर उशिराने आलेले अर्ज ग्राह्य धरत अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसानीच्या अनुषंगाने रक्कम वर्ग करण्यात येत आहे; परंतु बहुतांश शेतकरी अर्जच करू न शकल्याने ते नुकसानभरपाईपासून वंचित राहत आहेत. या शेतकऱ्यांना विमा मिळावा या अनुषंगाने कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे तांत्रिक दोष निदर्शनास आणून देत याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

खरीप २०१९ मध्ये अशीच परिस्थिती असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमा कंपन्यांना सरसकट मदत करण्यास बाध्य केले होते, ही बाबदेखील कृषिमंत्र्यांना अवगत केली. कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन सर्व शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवून देतील, अशी अपेक्षा असल्याचेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.