शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

कळंब तालुक्यातील चाैदा गावांमध्ये जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST

कळंब -कळंब तालुक्यातील १४ गावांत कोविड पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या दहापेक्षा अधिक आहे. त्यामुळे संबंधित गावांत १९ मे पर्यंत उपविभागीय ...

कळंब -कळंब तालुक्यातील १४ गावांत कोविड पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या दहापेक्षा अधिक आहे. त्यामुळे संबंधित गावांत १९ मे पर्यंत उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी जनता कर्फ्यू लागू केला आहे. तसे आदेशही त्यांनी निर्गमित केले आहेत.

कळंब तालुक्यातील ग्रामीण भागात आता कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत. अशी गंभीर परिस्थिती असताना गावातील चौकात, पारावर ग्रामस्थांची वर्दळ कायम आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढते आहे. याची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी ६ ते १९ मे पर्यंत तालुक्यातील १४ गावांत जनता कर्फ्यू लागू केला आहे.

या दरम्यान संबंधित गावात गटविकास अधिकारी यांनी कोरोना योद्धा पथक तयार करून त्या गावातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचा घरपोच पुरवठा करावा. तसेच कोरोना वाॅरिअर्सची कोविड चाचणी करूनच त्यांची नेमणूक करावी असेही या आदेशात म्हटले आहे. याव्यतिरिक्त त्या गावात शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार किराणा, औषध, दूध, शेती विषयक दुकाने चालू राहणार आहेत.

या जनता कर्फ्यू बरोबरच त्या १४ गावांत आता कलम १४४ ही लागू करण्यात आले आहे.

चौकट -

या गावात जनता कर्फ्यू

कळंब तालुक्यातील मोहा, डिकसळ, हासेगाव केज, आथर्डी, मंगरूळ, येरमाळा, शिराढोण, गोविंदपूर, कण्हेरवाडी, बोर्डा, इटकूर आवाड शिरपुरा, कोठाळवाडी, उमरा या १४ गावांत १९ मे पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या गावातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १० च्या पुढे गेल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी सांगितले.