शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

जिल्हा परिषदेच्या अधिकारांना लागली कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:33 IST

‘जलसंधारण’ची कुरघाेडी -प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसाठी ‘झेडपी’च्या नाहरकतीची नाही गरज उस्मानाबाद -राज्यात भाजप-सेना युती सरकार सत्तेत असताना नेहमीच ‘‘हे सरकार ...

‘जलसंधारण’ची कुरघाेडी -प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसाठी ‘झेडपी’च्या नाहरकतीची नाही गरज उस्मानाबाद -राज्यात भाजप-सेना युती सरकार सत्तेत असताना नेहमीच ‘‘हे सरकार जिल्हा परिषदांचे महत्त्व कमी करीत आहे’’, असा आराेप तत्कालीन विराेधकांकडून (सध्याचे सत्ताधारी) हाेत हाेता; मात्र सत्तेत येताच आराेपांचा विसर पडलेल्या विद्यमान राज्यकर्त्यांकडूनही ताेच कित्ता गिरवला जावू लागला आहे. जिल्हा परिषद लघु पाटबंधारेच्या अखत्यारितील कुठल्याही प्रकल्पावर अन्य यंत्रणेला काम करायचे असल्यास ‘नाहरकत’ बंधनकारक हाेती; परंतु ही अट काढून टाकत ‘जलसंधारण’ला (राज्यस्तर) रान माेकळे करून दिले आहे. हाही प्रकार ‘झेडपी’चे खच्चीकरण करणाराच मानला जात आहे.

जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित लघु, मध्यम प्रकल्पांसाेबतच पाझर तलाव, साठवण तलाव तसेच काेल्हापुरी बंधाऱ्यांची संख्या माेठी आहे. विशेष म्हणजे, मृद व जलसंधारण (राज्यस्तर) विभागापेक्षा कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता आदी मनुष्यबळही माेठे आहे. असे असतानाही राज्यातील सेना-राष्ट्रवादी व काँग्रेस महाघाडी सरकारच्या जलसंधारण विभागाने निधी देता जिल्हा परिषदेपेक्षा ‘जलसंधारण’ला अधिक झुकते माप दिले आहे. हे थाेडके म्हणून की काय, अधिकार क्षेत्रातही कुरघाेडी करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या प्रकल्पांच्या अन्य काेणत्याही यंत्रणेला काम करायचे असल्यास ‘झेडपी’ची नाहरकत घेणे बंधनकारक हाेते. त्यामुळे खराेखर काेणत्या प्रकल्पाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे? काेणत्या प्रकल्पास अधिक तरतूद लागणार आहे? यासह आदी बाबींची तपासणी करून नाहरकत दिली जात हाेती; परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ही महत्त्वपूर्ण कमी करून ‘जलसंधारण’ला रान माेकळे करून दिले आहेे. त्यामुळे तत्कालीन भाजप-सेना युती सरकारचाच कित्ता महाविकास आघाडी सरकार गिरवित आहे, हे विशेष.

चाैकट...

मनुष्यबळ अधिक, निधी कमी...

जलसंधारण विभागापेक्षा जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडे मनुष्यबळ अधिक आहे. प्रकल्पांची संख्याही माेठी आहे. असे असतानाही डागडुजीसाठी अवघे दहा ते बारा काेटी रुपये दिले आहेत. तर तुलनेत मनुष्यबळ कमी असताना ५० ते ५४ काेटी रुपये दिले आहेत. याबाबत आता पदाधिकाऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे.

माेठ्या कामांची बयाणा रक्कमही केली कमी...

निविदा भरताना संबंधित एजन्सीला कामाच्या एकूण रकमेच्या १ टक्के बयाणा रक्कम शासनखाती भरावी लागते. म्हणजेच १ काेटीचे काम असेल तर लाख रुपये शासनाच्या तिजाेरीत जमा हाेतात. हा नियम पूर्वी सर्वांना सारखाच हाेता; परंतु यातही सध्या बदल करण्यात आला आहे. १५ काेटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांना १ ऐवजी ०.५ टक्के बयाणा रक्कम निश्चित केली आहे. तर लहान कामांना ती रक्कम १ टक्केच ठेवली आहे. त्यामुळे माेठ्या ठेकेदारांचे एवढे लांगुलचालन का? ही उठाठेव ‘मर्जिती’ल मंडळीसाठी तर नाही ना? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

काेट...

एखादे माेठे काम असेल तर ठेकेदार कमी येतात. ते १ टक्के या प्रमाणे बयाणा रक्कम भरण्यास राजी नसतात. त्यामुळे ही रक्कम शासनाने ०.५ टक्के केली आहे. ही सर्व प्रक्रिया शासनाच्या निर्देशानुसार केली जात आहे.

-कलशेट्टी, कार्यकारी अभियंता, स्थानिक स्तर.