शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

जिल्हा परिषदेच्या अधिकारांना लागली कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:33 IST

‘जलसंधारण’ची कुरघाेडी -प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसाठी ‘झेडपी’च्या नाहरकतीची नाही गरज उस्मानाबाद -राज्यात भाजप-सेना युती सरकार सत्तेत असताना नेहमीच ‘‘हे सरकार ...

‘जलसंधारण’ची कुरघाेडी -प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसाठी ‘झेडपी’च्या नाहरकतीची नाही गरज उस्मानाबाद -राज्यात भाजप-सेना युती सरकार सत्तेत असताना नेहमीच ‘‘हे सरकार जिल्हा परिषदांचे महत्त्व कमी करीत आहे’’, असा आराेप तत्कालीन विराेधकांकडून (सध्याचे सत्ताधारी) हाेत हाेता; मात्र सत्तेत येताच आराेपांचा विसर पडलेल्या विद्यमान राज्यकर्त्यांकडूनही ताेच कित्ता गिरवला जावू लागला आहे. जिल्हा परिषद लघु पाटबंधारेच्या अखत्यारितील कुठल्याही प्रकल्पावर अन्य यंत्रणेला काम करायचे असल्यास ‘नाहरकत’ बंधनकारक हाेती; परंतु ही अट काढून टाकत ‘जलसंधारण’ला (राज्यस्तर) रान माेकळे करून दिले आहे. हाही प्रकार ‘झेडपी’चे खच्चीकरण करणाराच मानला जात आहे.

जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित लघु, मध्यम प्रकल्पांसाेबतच पाझर तलाव, साठवण तलाव तसेच काेल्हापुरी बंधाऱ्यांची संख्या माेठी आहे. विशेष म्हणजे, मृद व जलसंधारण (राज्यस्तर) विभागापेक्षा कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता आदी मनुष्यबळही माेठे आहे. असे असतानाही राज्यातील सेना-राष्ट्रवादी व काँग्रेस महाघाडी सरकारच्या जलसंधारण विभागाने निधी देता जिल्हा परिषदेपेक्षा ‘जलसंधारण’ला अधिक झुकते माप दिले आहे. हे थाेडके म्हणून की काय, अधिकार क्षेत्रातही कुरघाेडी करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या प्रकल्पांच्या अन्य काेणत्याही यंत्रणेला काम करायचे असल्यास ‘झेडपी’ची नाहरकत घेणे बंधनकारक हाेते. त्यामुळे खराेखर काेणत्या प्रकल्पाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे? काेणत्या प्रकल्पास अधिक तरतूद लागणार आहे? यासह आदी बाबींची तपासणी करून नाहरकत दिली जात हाेती; परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ही महत्त्वपूर्ण कमी करून ‘जलसंधारण’ला रान माेकळे करून दिले आहेे. त्यामुळे तत्कालीन भाजप-सेना युती सरकारचाच कित्ता महाविकास आघाडी सरकार गिरवित आहे, हे विशेष.

चाैकट...

मनुष्यबळ अधिक, निधी कमी...

जलसंधारण विभागापेक्षा जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडे मनुष्यबळ अधिक आहे. प्रकल्पांची संख्याही माेठी आहे. असे असतानाही डागडुजीसाठी अवघे दहा ते बारा काेटी रुपये दिले आहेत. तर तुलनेत मनुष्यबळ कमी असताना ५० ते ५४ काेटी रुपये दिले आहेत. याबाबत आता पदाधिकाऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे.

माेठ्या कामांची बयाणा रक्कमही केली कमी...

निविदा भरताना संबंधित एजन्सीला कामाच्या एकूण रकमेच्या १ टक्के बयाणा रक्कम शासनखाती भरावी लागते. म्हणजेच १ काेटीचे काम असेल तर लाख रुपये शासनाच्या तिजाेरीत जमा हाेतात. हा नियम पूर्वी सर्वांना सारखाच हाेता; परंतु यातही सध्या बदल करण्यात आला आहे. १५ काेटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांना १ ऐवजी ०.५ टक्के बयाणा रक्कम निश्चित केली आहे. तर लहान कामांना ती रक्कम १ टक्केच ठेवली आहे. त्यामुळे माेठ्या ठेकेदारांचे एवढे लांगुलचालन का? ही उठाठेव ‘मर्जिती’ल मंडळीसाठी तर नाही ना? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

काेट...

एखादे माेठे काम असेल तर ठेकेदार कमी येतात. ते १ टक्के या प्रमाणे बयाणा रक्कम भरण्यास राजी नसतात. त्यामुळे ही रक्कम शासनाने ०.५ टक्के केली आहे. ही सर्व प्रक्रिया शासनाच्या निर्देशानुसार केली जात आहे.

-कलशेट्टी, कार्यकारी अभियंता, स्थानिक स्तर.