शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापूर तालुक्यात राजकीय वातावरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:30 IST

तुळजापूर : एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तुळजापूर तालुक्यातील ...

तुळजापूर : एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तुळजापूर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींपैकी ५३ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुका होत असून, अधिकाधिक ग्रामपंचायती आपल्या पक्षाच्या ताब्यात राहतील यासाठी मात्र आजी-माजी आमदार, पक्ष पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीची सत्ता आहे. असे असले तरी तुळजापूर तालुक्यात सध्या तरी काही ठिकाणी स्वतंत्र तर अनेक गावात अन्य पक्षांशी सोयीस्कर हात मिळवणी सुरू आहे. काही ठिकाणी गुप्त बैठका सुरू असल्याने कोणी आघाडी केली की स्वतंत्र लढणार, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. तालुक्यात मंगरूळ, तामलवाडी, सिंदफळ, अणदूर, जळकोट या गावांमध्ये मोठी चुरस निर्माण होणार आहे. तालुक्यात भाजपा, सेनेची अशी ताकत नव्हती. मात्र, राष्ट्रवादीचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी विधानसभेला पक्ष बदलून काँग्रेसचे माजी आ. मधुकरराव चव्हाण यांचा पराभव करून तुळजापूर विधानसभेवर भाजपाचा झेंडा फडकवला आहे. त्यातच पंचायत समितीत अडीच वर्षाचा कालावधीही त्यांनी भाजपाच्या ताब्यात मिळवून घेतल्याने, तालुक्यात भाजपला मोठी ताकद मिळाली आहे. याचा परिणाम ग्रामपंचायत निवडणुकीवर होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात कॉंग्रेसची पकड मजबूत होती. ती टिकविण्यासाठी माजी आ. मधुकरराव चव्हाण व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या समोर मोठे आव्हान आहे. तसेच या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांच्या पॅनल समोर युवकांनीही दंड थोपटले आहेत. अनेक गावात तरुण निवडणुकीच्या आखाड्यात उतरत असल्याने गावागावात निवडणुकीची चुरस वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी ग्रामपंचायत बिनविरोधकसाठी देखील लाखो रुपयांची बोली करून सरपंच-सदस्याच्या निवडी करण्याचे ठरविले जात आहे. दरम्यान, काही ठिकाणी अपक्ष उमेदवाराही निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने पॅनल प्रमुखाची मोठी कोंडी निर्माण होणार आहे.

अणदूरकडे विशेष लक्ष

५३ ग्रामपंचायतीच्या ४६१ सदस्य निवडीसाठी ही निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत. माजी आ. मधुकरराव चव्हाण यांच्या अणदूर गावाचीही निवडणूक होत असून, पंचायत समितीसह तुळजापूर विधानसभेची जागाही काँग्रेसच्या हातून गेल्याने ग्रामपंचायतीमध्ये काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

आजपर्यंत सरपंच आरक्षणानुसार उमेदवार उभे केले जात होते. मात्र, यावर्षी प्रथमच मतमोजणीनंतर सरपंच आरक्षण सोडत होणार असल्याने खर्च कोणी करायचा, असा मोठा प्रश्न उभा टाकला आहे.