शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

बालकुमार साहित्य संमेलनातून मुलांना व्यक्त होण्याची संधी : भास्कर चंदनशिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 16:50 IST

ग्रंथदिंडीमध्ये वेगवेगळ्या वेशभूषा करून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उस्मानाबादकरांचे लक्ष वेधून घेतले.   

ठळक मुद्देग्रंथदिंडीने संमेलनास थाटात प्रारंभबालकुमार साहित्य संमेलने भरविणे काळाची गरज

उस्मानाबाद (संत गोरोबा काका साहित्यनगरी) : सध्याच्या समाजव्यवस्थेत व्यक्त होण्यासाठी व्यासपीठं उरलेली नाहीत. अशा परिस्थितीत उस्मानाबाद जिल्हा परिषद शिक्षण विभागाने बालकुमार साहित्य संमेलन भरवून विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याकरिता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांनी व्यक्त केले.

उस्मानाबाद शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय बालकुमार साहित्य संमेलनास शनिवारी थाटात प्रारंभ झाला. याप्रसंगी विशेष अतिथी पदावरून ते बोलत होते. मंचावर आमदार राणाजगजितसिंह पाटील, संमेलनाध्यक्ष साक्षी तिगाडे, जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, संमेलनाच्या स्वागताध्यक्षा तथा जि.प. उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील आदींची उपस्थिती होती.

चंदनशिव म्हणाले, संपूर्ण समाजव्यवस्थेत सध्या संभ्रमावस्थेचे वातावरण निर्माण झाले आहे. माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. हे सर्व माणसाला माणुसकीपर्यंत घेऊन जाणाऱ्या व्यवस्थेच्या अभावामुळे घडत आहे. हे चित्र बदलण्याची क्षमता खऱ्या अर्थाने साहित्यात आहे़ मात्र, त्यासाठी सध्या व्यासपीठं उरलेली नाहीत. त्यामुळे साहित्य चळवळ हव्या तेवढ्या प्रमाणात व्यापक होताना दिसत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता ठासून भरलेली आहे. तळागळातील घटकांचे प्रश्न ते जवळून पाहत आहेत. परंतु, त्यांच्यातील कल्पकतेला योग्यवेळी योग्य व्यासपीठ मिळत नाही. पर्यायाने त्यांना व्यक्त होता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रामीण भागासोबतच शहरातही अशा प्रकारची बालकुमार साहित्य संमेलने भरविणे काळाची गरज असल्याचे मत चंदनशिव यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी आ. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेने अशा स्वरूपाचे संमेलन प्रत्येक वर्षी भरवावे, अशी सूचना त्यांनी केली. दरम्यान, संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. ग्रंथदिंडीमध्ये वेगवेगळ्या वेशभूषा करून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उस्मानाबादकरांचे लक्ष वेधून घेतले.   

टॅग्स :literatureसाहित्यOsmanabadउस्मानाबाद