शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

बालकुमार साहित्य संमेलनातून मुलांना व्यक्त होण्याची संधी : भास्कर चंदनशिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 16:50 IST

ग्रंथदिंडीमध्ये वेगवेगळ्या वेशभूषा करून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उस्मानाबादकरांचे लक्ष वेधून घेतले.   

ठळक मुद्देग्रंथदिंडीने संमेलनास थाटात प्रारंभबालकुमार साहित्य संमेलने भरविणे काळाची गरज

उस्मानाबाद (संत गोरोबा काका साहित्यनगरी) : सध्याच्या समाजव्यवस्थेत व्यक्त होण्यासाठी व्यासपीठं उरलेली नाहीत. अशा परिस्थितीत उस्मानाबाद जिल्हा परिषद शिक्षण विभागाने बालकुमार साहित्य संमेलन भरवून विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याकरिता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांनी व्यक्त केले.

उस्मानाबाद शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय बालकुमार साहित्य संमेलनास शनिवारी थाटात प्रारंभ झाला. याप्रसंगी विशेष अतिथी पदावरून ते बोलत होते. मंचावर आमदार राणाजगजितसिंह पाटील, संमेलनाध्यक्ष साक्षी तिगाडे, जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, संमेलनाच्या स्वागताध्यक्षा तथा जि.प. उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील आदींची उपस्थिती होती.

चंदनशिव म्हणाले, संपूर्ण समाजव्यवस्थेत सध्या संभ्रमावस्थेचे वातावरण निर्माण झाले आहे. माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. हे सर्व माणसाला माणुसकीपर्यंत घेऊन जाणाऱ्या व्यवस्थेच्या अभावामुळे घडत आहे. हे चित्र बदलण्याची क्षमता खऱ्या अर्थाने साहित्यात आहे़ मात्र, त्यासाठी सध्या व्यासपीठं उरलेली नाहीत. त्यामुळे साहित्य चळवळ हव्या तेवढ्या प्रमाणात व्यापक होताना दिसत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता ठासून भरलेली आहे. तळागळातील घटकांचे प्रश्न ते जवळून पाहत आहेत. परंतु, त्यांच्यातील कल्पकतेला योग्यवेळी योग्य व्यासपीठ मिळत नाही. पर्यायाने त्यांना व्यक्त होता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रामीण भागासोबतच शहरातही अशा प्रकारची बालकुमार साहित्य संमेलने भरविणे काळाची गरज असल्याचे मत चंदनशिव यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी आ. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेने अशा स्वरूपाचे संमेलन प्रत्येक वर्षी भरवावे, अशी सूचना त्यांनी केली. दरम्यान, संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. ग्रंथदिंडीमध्ये वेगवेगळ्या वेशभूषा करून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उस्मानाबादकरांचे लक्ष वेधून घेतले.   

टॅग्स :literatureसाहित्यOsmanabadउस्मानाबाद