शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बालकुमार साहित्य संमेलनातून मुलांना व्यक्त होण्याची संधी : भास्कर चंदनशिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 16:50 IST

ग्रंथदिंडीमध्ये वेगवेगळ्या वेशभूषा करून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उस्मानाबादकरांचे लक्ष वेधून घेतले.   

ठळक मुद्देग्रंथदिंडीने संमेलनास थाटात प्रारंभबालकुमार साहित्य संमेलने भरविणे काळाची गरज

उस्मानाबाद (संत गोरोबा काका साहित्यनगरी) : सध्याच्या समाजव्यवस्थेत व्यक्त होण्यासाठी व्यासपीठं उरलेली नाहीत. अशा परिस्थितीत उस्मानाबाद जिल्हा परिषद शिक्षण विभागाने बालकुमार साहित्य संमेलन भरवून विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याकरिता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांनी व्यक्त केले.

उस्मानाबाद शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय बालकुमार साहित्य संमेलनास शनिवारी थाटात प्रारंभ झाला. याप्रसंगी विशेष अतिथी पदावरून ते बोलत होते. मंचावर आमदार राणाजगजितसिंह पाटील, संमेलनाध्यक्ष साक्षी तिगाडे, जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, संमेलनाच्या स्वागताध्यक्षा तथा जि.प. उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील आदींची उपस्थिती होती.

चंदनशिव म्हणाले, संपूर्ण समाजव्यवस्थेत सध्या संभ्रमावस्थेचे वातावरण निर्माण झाले आहे. माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. हे सर्व माणसाला माणुसकीपर्यंत घेऊन जाणाऱ्या व्यवस्थेच्या अभावामुळे घडत आहे. हे चित्र बदलण्याची क्षमता खऱ्या अर्थाने साहित्यात आहे़ मात्र, त्यासाठी सध्या व्यासपीठं उरलेली नाहीत. त्यामुळे साहित्य चळवळ हव्या तेवढ्या प्रमाणात व्यापक होताना दिसत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता ठासून भरलेली आहे. तळागळातील घटकांचे प्रश्न ते जवळून पाहत आहेत. परंतु, त्यांच्यातील कल्पकतेला योग्यवेळी योग्य व्यासपीठ मिळत नाही. पर्यायाने त्यांना व्यक्त होता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रामीण भागासोबतच शहरातही अशा प्रकारची बालकुमार साहित्य संमेलने भरविणे काळाची गरज असल्याचे मत चंदनशिव यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी आ. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेने अशा स्वरूपाचे संमेलन प्रत्येक वर्षी भरवावे, अशी सूचना त्यांनी केली. दरम्यान, संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. ग्रंथदिंडीमध्ये वेगवेगळ्या वेशभूषा करून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उस्मानाबादकरांचे लक्ष वेधून घेतले.   

टॅग्स :literatureसाहित्यOsmanabadउस्मानाबाद