शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

माेफत प्रवेशाकडे पालकांची पाठ, आरटीईच्या ५० टक्केच जागा भरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:37 IST

उस्मानाबाद - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना माेफत प्रवेश दिला ...

उस्मानाबाद - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना माेफत प्रवेश दिला जाताे. मात्र, यंदा या प्रवेशाकडे पालकांनी पाठ फिरविली आहे. प्रवेशनिश्चितीसाठी मुदतवाढ देऊनही जिल्ह्यातील ५० टक्के जागा रिकाम्याच आहेत. आरटीईअंतर्गत माेफत प्रवेशासाठी जिल्ह्यातील १२५ शाळा निवडण्यात आल्या आहेत. या सर्व शाळांमध्ये मिळून जवळपास ६४१ जागा आहेत. शासनाने आवाहन केल्यानंतर सुमारे एक हजार ९१ पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज ऑनलाईन केले. साेडत पद्धतीने ५२२ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली. मात्र पहिल्यांदा दिलेल्या मुदतीत अत्यल्प प्रवेश झाले. यानंतर शासनाने प्रवेशनिश्चितीची मुदत वाढविली. त्यामुळे पालकांना २३ जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत. या मुदतवाढीनंतरही प्रवेश प्रक्रिया गतिमान हाेताना दिसत नाही. आजघडीला ५० टक्के म्हणजेच २८५ जागा रिक्तच आहेत, हे विशेष.

चाैकट...

एकूण जागा

६४१

आतापर्यंत झालेले प्रवेश

३५६

शिल्लक जागा

२८५

आरटीईअंतर्गत जिल्ह्यातील शाळांची नाेंद

१२५

पालकांच्या अडचणी काय?

गावापासून दहा किती दूर जाऊन ऑनलाईन फाॅर्म भरला. परंतु, जवळची शाळा मिळाली नाही. मिळालेली शाळा गैरसाेयीची ठरत आहे. त्यामुळे आर्थिक ऐपत नसतानाही अन्य शाळेत प्रवेश निश्चित केला.

- पाेपट साेनावणे, पालक

माेफत प्रवेशासाठी अर्ज करताना अनंत अडचणीला ताेंड द्यावे लागले. या अडचणींचा सामना करून फाॅर्म ऑनलाईन केला. निवड झाल्याचा अद्याप मेसेज आलेला नाही. मागील काही दिवसांपासून मी प्रवेशासंबंधी मेसेजच्या प्रतीक्षेत आहे.

- संजय माळी, पालक.

दुसऱ्यांदा मुदतवाढ

२५ टक्के माेफत प्रवेशासाठी साेडत निघाल्यानंतर निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नाहीत. त्यामुळे शासनाने प्रवेश घेण्यासाठी २३ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे. असे असले तरी आजवर अवघे ३५६ प्रवेश निश्चित झाले आहेत.

चाैकट...

जिल्ह्यातील १२५ शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश याेजनेअंतर्गत ६४१ जागा मंजूर आहेत. आजवर ३५६ प्रवेश निश्चित झाले आहेत. शासनाने २३ जुलैपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. या मुदतीत १०० टक्के प्रवेश हाेण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत.

-उद्धव सांगळे, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.

चाैकट...

संस्थाचालकांतूनही व्यक्त हाेतेय नाराजी...

गाेरगरीब कुटुंबांतील मुलांनाही नामांकित खासगी शाळांतून शिक्षण घेता यावे, यासाठी २५ टक्के माेफत प्रवेश दिले जातात. या विद्यार्थ्यांच्या शिकवणी शुल्काचे पैसे शासनाकडून शाळांना जमा केले जातात. परंतु, त्या-त्या शैक्षणिक वर्षात मागणीनुसार निधी उपलब्ध हाेत नाही. परिणामी संस्थाचालकांतूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. २०१८-१९ या आर्थिक वर्षात एकूण मागणीच्या ५० टक्केच निधी उपलब्ध झाला. त्यामुळे शाळांनाही देताना मागणीच्या पन्नास टक्केचे पैसे वर्ग करण्यात आले आहेत. २०१९-२० मध्ये तर याहीपेक्षा विदारक स्थिती आहे. शिक्षण विभागाने केलेल्या एकूण मागणीच्या ३० टक्केच तरतूद उपलब्ध झाली. ही रक्कम शाळांना वर्ग करण्यात आली आहे. परिणामी आजही शासनाकडे ७० टक्के रक्कम थकीत आहे. दरम्यान, उर्वरित निधी मिळावा, यासाठी शाळांकडून पाठपुरावा केला जात आहे. परंतु, शिक्षण विभागाच्या हातातही काहीच नसल्याने शासनाकडे बाेट दाखविण्याशिवाय गत्यंतर नाही. दरम्यान, शासनाने प्रत्येक शैक्षणिक वर्षात मागणीनुसार निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संस्थाचालकांतून हाेऊ लागली आहे.