शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

२६ टक्केच पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : खरीप हंगामात यावर्षी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, खासगी, जिल्हा बँकेस १,५३९ कोटी ८० लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले. बॅंकांच्या उदासीन ...

उस्मानाबाद : खरीप हंगामात यावर्षी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, खासगी, जिल्हा बँकेस १,५३९ कोटी ८० लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले. बॅंकांच्या उदासीन धोरणामुळे आतापर्यंत २६ टक्के पीककर्ज वाटप करुन ६४ हजार १४३ शेतकऱ्यांना लाभ दिला आहे.

जिल्ह्यात वर्षा-दोन वर्षाआड पडणारा दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत चालले आहेत. शेतकऱ्यांना पेरणी, बियाणे, खत खरेदीस तसेच अन्य शेतीकामात अडथळे येऊ नयेत, यासाठी शासनाकडून पीककर्ज उपलब्ध करुन दिले जात असते. यंदा उस्मानाबाद जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी १,५३९ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. १ एप्रिल पासून प्रत्यक्ष कर्ज वितरणास सुरुवातही झाली आहे. मात्र, एप्रिल व मे महिन्यात कोविड प्रतिबंधासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच संचारबंदी ही लावण्यात आलेली आहे. त्यामुळे या काळात एसटीची वाहतूक सेवाही ठप्प होती. परिणामी, वाहतूक सेवा सुरळीत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शहरात बँकामध्ये येता येत नव्हते. या कालावधीत अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज घेण्यास अडथळे निर्माण होत होते. असे असतानाही अनेक शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करुन पेरणी उरकून घेतली. त्यानंतर पिकांना खत तसेच खुरपणी, कोळपणी, खतासाठी शेतकरी पीककर्ज मिळविण्यासाठी बँकेत चकरा मारत आहेत. मात्र, बँकाच्या उदासीन धोरणामुळे जून अखेर केवळ ६४ हजार १४३ शेतकऱ्यांना ४०२ कोटी ६६ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. कर्जवाटपाची टक्केवारी २६ टक्के इतकी आहे. अद्यापही ७४ टक्के पीक वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण आहे.

कर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर

खरीप हंगामासाठी १,५३९ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेस ३२७ कोटी ४ लाख कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. जून अखेरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखेकडून ४३ हजार ५७५ शेतकऱ्यांना १७४ कोटी ११ लाख रुपये वितरित करण्यात आले आहे. त्याची टक्केवारी ५३ टक्के इतकी आहे.