शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

जलसाठे वाढण्यासाठी मोठ्या पावसाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:22 IST

भूम : तालुक्यात शुक्रवारी पाचही मंडळात पावसाने कमी-अधिक हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले. वाढीच्या अवस्थेत असलेल्या खरिपास हा ...

भूम : तालुक्यात शुक्रवारी पाचही मंडळात पावसाने कमी-अधिक हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले. वाढीच्या अवस्थेत असलेल्या खरिपास हा पाऊस उपयुक्त ठरला आहे. परंतु, तालुक्यातील जलसाठ्यात पाणीसाठा वाढण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

तालुक्यात खरीप पेरण्यांनंतर १५ दिवस पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतित होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगले पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तालुक्यात खरिपाचे ४९ हजार ३८६ हेक्टर सरासरी क्षेत्र असताना मान्सून वेळेत सक्रिय झाल्याने प्रत्यक्षात ५१ हजार २०६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केल्यावर पिकाची उगवण होऊन पिके वाढीच्या अवस्थेत असताना तब्बल १५ दिवस पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. ७ जुलैपासून पावसाने वापसी केल्याने तूर्तास खरीप पिकास जीवदान मिळाले आहे. तालुक्यात शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या मागील २४ तासांत आंबी मंडळात १७.५०, माणकेश्वर ३६.३०, भूम २९.८०, वालवड ४९.३० तर ईट मंडळात २३ मिमी पावसाची नोंद झाली.

तालुक्यात १ ते १० जुलै या दहा दिवसांत भूम मंडळात सर्वाधिक ८९.४० मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल माणकेश्वर मंडळात ८४.९०, वालवड ७४.८० मिमी, तर अंबी व ईट मंडळात प्रत्येकी ४९.८० मिमी पाऊस झाला आहे. एकूणच अजूनही ईट, वालवड व आंबी मंडळात पावसाचे प्रमाण कमी असून, भूम व माणकेश्वर मंडळात समाधानकारक दिसून येत आहे. शिवाय, तालुक्यातील प्रकल्प अजूनही कोरडे असून, यातील पाणीपातळी वाढण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.