शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

जिल्ह्यातील ४० ते ४५ टक्के ग्रामपंचायतींत ‘महाविकास आघाडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:23 IST

उस्मानाबाद -राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. यांचे सरकार फार ...

उस्मानाबाद -राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. यांचे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा भाजपाकडून पहिल्या दिवसापासून केला जात आहे. असे असतानाच मध्यंतरी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने एकी दाखवून दिली. सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत मात्र १०० टक्के ग्रामपंचायतींत तिन्ही पक्षांची माेट बांधून ‘महाविकास आघाडी’चा एकच पॅनल देण्यात स्थानिक नेतृत्व यशस्वी हाेऊ शकले नाही. तीनही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी केलेल्या दाव्यानुसार केवळ ४० ते ४५ टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी लढत देत आहे. मात्र, निकालानंतर अनेक ठिकाणी तिन्ही पक्षांची गट्टी जमून येईल, अशी आशा या मंडळीने व्यक्त केली.

जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली हाेती. यापैकी ४० ग्रामपंचायती बिनिवराेध निघाल्या आहेत. त्यामुळे १५ जानेवारी राेजी ३८८ ग्रामपंचायतींसाठी मतदान हाेणार आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. ही महाविकास आघाडी विधान परिषद निवडणुकीतही दिली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या आखाड्यातही हे तीन पक्ष एकत्र येत ताकद दाखवतील, असा दावा राज्यपातळीवरील नेत्यांकडून करण्यात आला हाेता. परंतु, प्रत्यक्षात स्थानिक पातळीवरील नेतेमंडळीला या तीन पक्षांची माेट बांधण्यात फारसे यश आलेले नाही. ४० ते ४५ टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे पॅनल एकत्रित लढत आहे, असा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात हे प्रमाण कमी आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर अनेक ग्रामपंचायतीत वेगवेगळे लढणारे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, असा विश्वासही या तीनही पक्षांकडून व्यक्त करण्यात आला आहे. असे असले तरी महाविकास आघाडीला विधानसभा, विधानपरिषदेत जे जमले ते स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत का जमले नाही? हे स्थानिक नेत्यांचे अपयश आहे का? असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

चाैकट...

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. हे सरकार चांगले काम करीत आहे. हेत्र सूत्र जास्तीत जास्त ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्यक्षात यावे, यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात आले. त्याला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास ५० टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी लढत देत आहे.

-कैलास पाटील, आमदार तथा जिल्हाध्यक्ष, शिवसेना.

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला माेठे यश मिळाले. त्यामुळे अधिकाधिक ग्रामपंचायतींतही तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढावी, अशी चर्चा झाली हाेती. त्यानुसार प्रयत्नही करण्यात आले. त्यास चांगले यश आले आहे. साधारणपणे ४० ते ४५ टक्के ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढत आहेत.

-ॲड. धीरज पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून ज्या-ज्या निवडणुका झाल्या, त्यांमध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढत देण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त ग्रामपंचायतींत हा प्रयत्न केला आहे. साधारपणे ४५ ते ५० टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी म्हणून आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते लढत आहेत. हा प्रयाेगही निश्चित यशस्वी हाेईल.

-सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस.

निकालानंतर बदलू शकते चित्र...

काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीकडून ४० ते ४५ टक्के ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढत आहाेत, असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात हे प्रमाण एवढे नाही. मात्र, निवडणूक निकालानंतर अनेक ग्रामपंचायतींत हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता काबीज करू शकतात. त्यामुळे निकालानंतर महाविकास आघाडीच्या स्थानिक नेतेमंडळीचा दावा प्रत्यक्षात येऊ शकताे.

पाॅईंटर...

जिल्ह्यातील निवडणूक रणधुमाळी सुरू असलेल्या खासकरून माेठ्या ग्रामपंचायतींत अनेक ठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादी या दाेनच पक्षात प्रमुख लढत झालेली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी महाविकास आघाडी आकारास येऊ शकली नाही. तसेच काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दाेनच पक्ष प्रबळ आहेत. त्यामुळे अशा ठिकाणीही आघाडी हाेऊ शकली नाही. ज्या ठिकाणी भाजपा प्रमुख विराेधक आहे, अशा बहुतांश ठिकाणी आघाडी दिसते. तर काही काही ठिकाणी आघाडीत फूट पडली आहे.