शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

पाथरूड परिसरात कांदा बियाणाचीही टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST

नामांकित बियाणे मिळेना -दर पाेहाेचला पावणेतीन हजारांवर पाथरुड: भूम तालुक्यातील पाथरुड परिसरात रोहिणी व मृग नक्षत्रात कमी-अधिक प्रमाणात ...

नामांकित बियाणे मिळेना -दर पाेहाेचला पावणेतीन हजारांवर

पाथरुड: भूम तालुक्यातील पाथरुड परिसरात रोहिणी व मृग नक्षत्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकरी पावसाळी कांदा लागवडीच्या तयारीला लागले आहेत. परंतु सध्या कृषी दुकानांमध्ये मागणीच्या तुलनेत विविध नामांकित कंपन्यांचे कांदा बियाणे उपलब्ध नाही. बियाणे घेण्यासाठी कृषी दुकानांमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहेत. तर काही शेतकरी अन्य जिल्ह्यांतून बियाणे उपलब्ध करू लागले आहेत.

मागील काही वर्षांत भूम तालुक्यातील पाथरुड परिसरातील पाथरुडसह जेजला, आनंदवाडी, सावरगाव, अंतरवली, जयवंतनगर आदी गावातील शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत. पावसाळ्यात पाण्याची टंचाई नसते. त्यामुळे कांदा पिकाला मुबलक पाणी मिळते. परिणामी उत्पादनही चांगले मिळते. दरम्यान, यासाठी मे-जून महिन्यापासून शेतकरी तयारी करतात. पेरणी व बियाणे टाकून रोपे तयार करून पुन्हा लागवड करणे अशा दोन पद्धतीचा अवलंब केला जातो. अधिकतर शेतकरी बियाणे शेतात टाकून रोपे तयार करूनच कांद्याची लागवड करतात. अशा पद्धतीने लागवड केलेल्या कांद्याची वाढ चांगली हाेऊन उत्पादनही अधिक मिळते. विशेष म्हणजे, पावसाळी कांद्याला बाजारपेठेत दरही अधिक मिळताे. त्यामुळे बहुतांश शेतकरी पावसाळी कांदा लागवड करतात. मात्र, सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बियाणे टंचाईला सामाेरे जावे लागत आहे. नामांकित कंपन्यांचे बियाणे पाथरूडसह परिसरातील कृषी केंद्रामध्ये उपलब्ध नाही. थाेडेबहुत बियाणे मिळालेच तरी अवघ्या काही तासात ते संपते. त्यामुळे कांदा लागवड लांबणीवर पडते की काय, अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जाऊ लागली आहे.

चाैकट..

बियाणाचे दर वाढले...

कांदा बियाणाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळेच की काय, यंदा दरही वाढले आहेत. नामांकित कंपनीच्या एक किलाे बियाणासाठी पावणेतीन ते तीन हजार रुपये माेजावे लागत आहेत. परिणामी उत्पादन खर्चात वाढ हाेणार असल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

काेट....

कांदा बियाणाची बुकिंग केलेली आहे. परंतु मागणीच्या तुलनेत कांदा बियाणे उपलब्ध होत नसल्याने कांदा बियाणे घेण्यासाठी आलेल्या अनेक शेतकऱ्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे.

-बाळासाहेब पिंपळे, कृषी सेवा केंद्र, बावी.