शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पाथरूड परिसरात कांदा बियाणाचीही टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST

नामांकित बियाणे मिळेना -दर पाेहाेचला पावणेतीन हजारांवर पाथरुड: भूम तालुक्यातील पाथरुड परिसरात रोहिणी व मृग नक्षत्रात कमी-अधिक प्रमाणात ...

नामांकित बियाणे मिळेना -दर पाेहाेचला पावणेतीन हजारांवर

पाथरुड: भूम तालुक्यातील पाथरुड परिसरात रोहिणी व मृग नक्षत्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकरी पावसाळी कांदा लागवडीच्या तयारीला लागले आहेत. परंतु सध्या कृषी दुकानांमध्ये मागणीच्या तुलनेत विविध नामांकित कंपन्यांचे कांदा बियाणे उपलब्ध नाही. बियाणे घेण्यासाठी कृषी दुकानांमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहेत. तर काही शेतकरी अन्य जिल्ह्यांतून बियाणे उपलब्ध करू लागले आहेत.

मागील काही वर्षांत भूम तालुक्यातील पाथरुड परिसरातील पाथरुडसह जेजला, आनंदवाडी, सावरगाव, अंतरवली, जयवंतनगर आदी गावातील शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत. पावसाळ्यात पाण्याची टंचाई नसते. त्यामुळे कांदा पिकाला मुबलक पाणी मिळते. परिणामी उत्पादनही चांगले मिळते. दरम्यान, यासाठी मे-जून महिन्यापासून शेतकरी तयारी करतात. पेरणी व बियाणे टाकून रोपे तयार करून पुन्हा लागवड करणे अशा दोन पद्धतीचा अवलंब केला जातो. अधिकतर शेतकरी बियाणे शेतात टाकून रोपे तयार करूनच कांद्याची लागवड करतात. अशा पद्धतीने लागवड केलेल्या कांद्याची वाढ चांगली हाेऊन उत्पादनही अधिक मिळते. विशेष म्हणजे, पावसाळी कांद्याला बाजारपेठेत दरही अधिक मिळताे. त्यामुळे बहुतांश शेतकरी पावसाळी कांदा लागवड करतात. मात्र, सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बियाणे टंचाईला सामाेरे जावे लागत आहे. नामांकित कंपन्यांचे बियाणे पाथरूडसह परिसरातील कृषी केंद्रामध्ये उपलब्ध नाही. थाेडेबहुत बियाणे मिळालेच तरी अवघ्या काही तासात ते संपते. त्यामुळे कांदा लागवड लांबणीवर पडते की काय, अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जाऊ लागली आहे.

चाैकट..

बियाणाचे दर वाढले...

कांदा बियाणाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळेच की काय, यंदा दरही वाढले आहेत. नामांकित कंपनीच्या एक किलाे बियाणासाठी पावणेतीन ते तीन हजार रुपये माेजावे लागत आहेत. परिणामी उत्पादन खर्चात वाढ हाेणार असल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

काेट....

कांदा बियाणाची बुकिंग केलेली आहे. परंतु मागणीच्या तुलनेत कांदा बियाणे उपलब्ध होत नसल्याने कांदा बियाणे घेण्यासाठी आलेल्या अनेक शेतकऱ्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे.

-बाळासाहेब पिंपळे, कृषी सेवा केंद्र, बावी.