शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

खरीप अतिवृष्टीत वाहिली, रब्बी पिके अवकाळीत गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:34 IST

खरीप हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बीवर मोठी आशा ठेवली होती. पोषक वातावरण व पाण्याची मुबलकता, यामुळे शेतकऱ्यांनी रात्र-रात्र जागून पाणी ...

खरीप हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बीवर मोठी आशा ठेवली होती. पोषक वातावरण व पाण्याची मुबलकता, यामुळे शेतकऱ्यांनी रात्र-रात्र जागून पाणी देत पिके जोपासली होती. विशेषत: ज्वारी, हरभरा अन् गव्हावर शेतकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीतही मोठी मेहनत घेतली. यानंतर आता सध्या या तिन्ही पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु झाला आहे. पाणी दिलेली पिके जोमात आल्याने चांगल्या उत्पन्नाची आस शेतकऱ्यांना होती. अनेकांनी हरभरा, गहू व ज्वारीची काढणी सुरू केली. काहींनी गंजी लावल्या तर काही शेतकऱ्यांची काढणी झालेली पिके अजून गोळा करायची राहिली होती. त्यातच वातावरण बदलले. बुधवारी रात्री हलका पाऊस झाला; तर गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस. यामुळे काढून ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाले. शिवाय, उभ्या ज्वारी व गव्हाने जागीच लोळण घेतली.

विम्यासाठी करा अर्ज...

रब्बी हंगामातील पिकांचा ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे, त्यांना कंपनीच्या अटीनुसार ऑनलाईन अर्ज ७२ तासांच्या आत करणे आवश्यक आहे. खरीप हंगामात केवळ अर्जाअभावी हजारो शेतकरी विम्यापासून वंचित राहिले. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तातडीने अर्ज करावा.