शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शाळांची वेळ ठरली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:34 IST

उस्मानाबाद - कोरोनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाने पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले; परंतु जबाबदारी आणि वेळ निश्चित न केल्यामुळे ...

उस्मानाबाद - कोरोनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाने पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले; परंतु जबाबदारी आणि वेळ निश्चित न केल्यामुळे शिक्षकांत संभ्रमाचे वातावरण होते. याबाबत बुधवारी लोकमतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळांची वेळ आणि शिक्षकांची जबाबदारी निश्चित करणारे पत्र काढले.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले. हे वर्ग सुरळीत झाल्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले. शाळांची टायमिंग आणि जबाबदारी निश्चितीकरण स्थानिक शिक्षण विभागावर सोपविले होते. मात्र, शाळा सुरू होऊनही शिक्षण विभागाने ना शाळांची वेळ निश्चित केली ना गुरुजींची जबाबदारी. परिणामी शिक्षकांत संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, शिक्षण विभागाने शाळांनाची वेळ निश्चित करावी, यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीस अन्य संघटनांकडून निवेदने देण्यात आली, तरीही काहीच कार्यवाही झाली नाही. हा प्रकार समोर आल्यानंतर ‘लोकमत’ने ‘निवेदनावर निवेदने, शिक्षण विभाग हलेना’ या मथळ्याखाली बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तामुळे खडबडून जाग्या झालेल्या शिक्षण विभागाने शाळांच्या वेळा निश्चित करून संभ्रम दूर केला.

चौकट...

अशी असेल शाळांची वेळ...

पाचवी ते बारावी वर्गाच्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. या गुरुजींनी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत शाळेवर थांबणे बंधनकारक केले आहे. चार तासांच्या तासिका झाल्यानंतर उर्वरित वेळेत अध्यापनाच्या नियोजनाची कार्यवाही करावी लागणार आहे.

अध्यक्षांनी काढली खरडपट्टी...

शाळांच्या वेळेच्या अनुषंगाने लोकमतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी शिक्षण अधिकारी डॉ. मोहरे यांची खरडपट्टी काढली. नियोजनाअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या, अशा शब्दात सुनावले.