शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

अखेर शाळांची वेळ ठरली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:34 IST

उस्मानाबाद - कोरोनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाने पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले; परंतु जबाबदारी आणि वेळ निश्चित न केल्यामुळे ...

उस्मानाबाद - कोरोनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाने पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले; परंतु जबाबदारी आणि वेळ निश्चित न केल्यामुळे शिक्षकांत संभ्रमाचे वातावरण होते. याबाबत बुधवारी लोकमतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळांची वेळ आणि शिक्षकांची जबाबदारी निश्चित करणारे पत्र काढले.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले. हे वर्ग सुरळीत झाल्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले. शाळांची टायमिंग आणि जबाबदारी निश्चितीकरण स्थानिक शिक्षण विभागावर सोपविले होते. मात्र, शाळा सुरू होऊनही शिक्षण विभागाने ना शाळांची वेळ निश्चित केली ना गुरुजींची जबाबदारी. परिणामी शिक्षकांत संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, शिक्षण विभागाने शाळांनाची वेळ निश्चित करावी, यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीस अन्य संघटनांकडून निवेदने देण्यात आली, तरीही काहीच कार्यवाही झाली नाही. हा प्रकार समोर आल्यानंतर ‘लोकमत’ने ‘निवेदनावर निवेदने, शिक्षण विभाग हलेना’ या मथळ्याखाली बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तामुळे खडबडून जाग्या झालेल्या शिक्षण विभागाने शाळांच्या वेळा निश्चित करून संभ्रम दूर केला.

चौकट...

अशी असेल शाळांची वेळ...

पाचवी ते बारावी वर्गाच्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. या गुरुजींनी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत शाळेवर थांबणे बंधनकारक केले आहे. चार तासांच्या तासिका झाल्यानंतर उर्वरित वेळेत अध्यापनाच्या नियोजनाची कार्यवाही करावी लागणार आहे.

अध्यक्षांनी काढली खरडपट्टी...

शाळांच्या वेळेच्या अनुषंगाने लोकमतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी शिक्षण अधिकारी डॉ. मोहरे यांची खरडपट्टी काढली. नियोजनाअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या, अशा शब्दात सुनावले.