शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

सांगवीतील पुलाचा प्रश्न २५ वर्षांपासून कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:23 IST

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) गावाला जोडणाऱ्या पुलाची उंची केवळ चार फूट असून, हा पूल प्रत्येक वर्षी पाण्याखाली ...

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) गावाला जोडणाऱ्या पुलाची उंची केवळ चार फूट असून, हा पूल प्रत्येक वर्षी पाण्याखाली जातो. गतवर्षीदेखील दोन गावांचा तीन दिवस संपर्क तुटला होता. असे असताना वर्षभरात केवळ पाहणी करण्याशिवाय दुसरी कुठलीही कार्यवाही प्रशासनाकडून झाली नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही गावकऱ्यांना पुन्हा पाण्यातूनच वाट शोधावी लागणार आहे.

जवळपास ३० वर्षांपूर्वी सांगवी गावाला जोडणाऱ्या या पुलाचे काम करण्यात आले होते. सध्या हा पूल जमिनीबरोबर आला असून, गाळ साचल्याने तलावातून ओव्हर फ्लो होऊन येणारे पाणी पुलावरून वाहाते. त्यामुळे सांगवी, पांगरदरवाडी या दोन गावांच्या गावकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. गतवर्षी परतीच्या पावसात अतिवृष्टी होऊन पुराच्या पाण्यामुळे हा पूल १५ दिवस पाण्याखाली होता. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यातून वाट शोधत गाव गाठावे लागले. त्याची पुनरावृत्ती यंदाच्या पावसाळ्यात होऊ नये, यासाठी सांगवी (काटी) ग्राम पंचायतीच्या वतीने प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्ते ग्रामीण विकास संस्था यांच्याकडे अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु, वर्षभरात यावर कुठलीच कार्यवाही झाली नाही. याशिवाय, राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ ते पांगरदरवाडी हा पाच किमी रस्तादेखील पूर्णत: खड्ड्यात गेला असून, चालकाना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने पावसाळ्यात अपघात होत आहेत.

चौकट

अधिकाऱ्यांकडून केवळ पाहणी

ऑक्टोबर २०२०मध्ये झालेल्या अतिवृष्टीने सांगवी गावाला पुराच्या पाण्याने दोन्ही बाजुने वेढा घातला होता. गावच्या दोन्ही बाजूचे पूल पाण्याखाली गेल्याने तीन दिवस गावांचा संपर्क तुटला होता. पाणी ओसरल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली. त्यावेळी गावच्या पश्चिम बाजूस असलेल्या पुलाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. मात्र, वर्ष लोटले तरी कुठलीच कार्यवाही झाली नाही.

आ. पाटील यांची शिफारस

सांगवी ग्रामपंचायतीच्या सरपंच ललिता मगर, उपसरपंच मिलिंद मगर यांनी या पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन स्तरावर लेखी पत्रव्यवहार केला. यासोबतच आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीदेखील डिसेंबर २०२०मध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या पुलासाठी निधीची मागणी केली होती, अशी माहिती उपसरपंच मिलिंद मगर यांनी दिली.