केशेगाव येथे एप्रिल, मे दाेन महिन्यांत दोन तर अन्य लक्षणांमुळे आठ असे दहा जणांचा मृत्यू झाला. आजघडीला कोरोनाबाधित दहा रुग्णांची नोंद झालेली आहे. काेराेनाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्यावतीने गावात निर्जंतुकांची फवारणी, साफसफाई, सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर, काेराेनाबद्दलची भीती, लसीकरण तसेच जनजागृतीवर भर देण्यात आला आहे, असे असतानाही कमी हाेताना दिसत नसल्याने सरपंच रेश्मा घंटे, उपसरपंच जाकीर शेख यांनी गावात सात दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रदीप हुकीरे, पोलीस पाटील कमलबाई स्वामी, ग्रामपंचायत सदस्य चन्नाप्पा साखरे, मुख्याध्यापक भीमाशंकर घंटे, काशीनाथ देडे, डॉ. जगदीश शिंदे, परिचारिका मृणालिनी कांबळे, आशा कार्यकर्ती शीतल हुकिरे, संतोषी कांबळे आदींनी पुढाकार घेतला आहे.
संसर्ग वाढला, केशेगावात सात दिवस जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:34 IST