शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

माेठ्या गावांत काेराेनाचा वाढताेय संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST

भूम : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विविध उपाययाेजना केल्या जात आहेत. असे असतानाही खासकरून माेठ्या गावांत काेराेनाने तीव्र ...

भूम : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विविध उपाययाेजना केल्या जात आहेत. असे असतानाही खासकरून माेठ्या गावांत काेराेनाने तीव्र स्वरूप धारण केले आहे. हा प्रश्न लक्षात घेऊन तहसीलदारांनी अशा गावांत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. परंतु, स्थानिक लाेक फारशी खबरदारी घेत नसल्याने धाेका आणखी वाढत आहे.

तालुक्यात मार्च महिन्यापासून काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. दिवसागणिक बाधितांच्या संख्येत भर पडत आहे, तर दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. आजअखेर चिंचपूर ढगे येथे ९७ रुग्ण आढळून आले आहेत. यात ७७ जण काेराेनामुक्त झाले, तर २० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. माणकेश्वर येथे ७६ रुग्ण आढळून आले. यातील ४७ जणांनी काेराेनावर मात केली. त्यामुळे सध्या २९ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. देवळाली येथेही ६१ रुग्ण आढळून आले असता, ११ जणांनी काेराेनाला हरविले. परिणामी सध्या ४९ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, लहान-माेठ्या गावांत वाढत चाललेला काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी तहसील प्रशासनाकडून ज्या गावात दहापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत, तेथे जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी नियमांचे काटेकाेरपणे पालन करावे, असे आदेशितही केले. गावाेगावी याच्या उलट चित्र पाहावयास मिळत आहे. लाेक बेफिकीरपणे वावरत आहेत. त्यामुळे काेराेनाचा धाेका कमी हाेण्याऐवजी वाढत असल्याचे दिसून येते. साेबतच स्थानिक कर्मचारीही पहिल्या लाटेप्रमाणे काटेकाेरपणे उपाययाेजना करताना दिसत नाहीत. ग्रामपंचायतींचे पदाधिकारीही माेहिमेपासून दूर राहणेच पसंत करीत आहेत. हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा.

चाैकट...

भूम शहरातही वर्दळ...

ग्रामीण भागासाेबतच भूम शहरामध्येही दिवसभर वर्दळ पाहावयास मिळते. ग्रामीण भागातून कामासाठी येणारे अनेक लाेक मास्कही लावत नाही. फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याकडेही डाेळेझाक केली जात आहे. परिणामी काेराेनाचा धाेका वाढण्याची दाट शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन नगर पालिकेने पुढे येऊन उपाययाेजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अन्यथा हे असेच सुरू राहिल्यास काेराेनाचा संसर्ग कमी हाेण्याऐवजी वाढत जाईल, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.