शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

माेठ्या गावांत काेराेनाचा वाढताेय संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST

भूम : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विविध उपाययाेजना केल्या जात आहेत. असे असतानाही खासकरून माेठ्या गावांत काेराेनाने तीव्र ...

भूम : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विविध उपाययाेजना केल्या जात आहेत. असे असतानाही खासकरून माेठ्या गावांत काेराेनाने तीव्र स्वरूप धारण केले आहे. हा प्रश्न लक्षात घेऊन तहसीलदारांनी अशा गावांत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. परंतु, स्थानिक लाेक फारशी खबरदारी घेत नसल्याने धाेका आणखी वाढत आहे.

तालुक्यात मार्च महिन्यापासून काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. दिवसागणिक बाधितांच्या संख्येत भर पडत आहे, तर दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. आजअखेर चिंचपूर ढगे येथे ९७ रुग्ण आढळून आले आहेत. यात ७७ जण काेराेनामुक्त झाले, तर २० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. माणकेश्वर येथे ७६ रुग्ण आढळून आले. यातील ४७ जणांनी काेराेनावर मात केली. त्यामुळे सध्या २९ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. देवळाली येथेही ६१ रुग्ण आढळून आले असता, ११ जणांनी काेराेनाला हरविले. परिणामी सध्या ४९ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, लहान-माेठ्या गावांत वाढत चाललेला काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी तहसील प्रशासनाकडून ज्या गावात दहापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत, तेथे जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी नियमांचे काटेकाेरपणे पालन करावे, असे आदेशितही केले. गावाेगावी याच्या उलट चित्र पाहावयास मिळत आहे. लाेक बेफिकीरपणे वावरत आहेत. त्यामुळे काेराेनाचा धाेका कमी हाेण्याऐवजी वाढत असल्याचे दिसून येते. साेबतच स्थानिक कर्मचारीही पहिल्या लाटेप्रमाणे काटेकाेरपणे उपाययाेजना करताना दिसत नाहीत. ग्रामपंचायतींचे पदाधिकारीही माेहिमेपासून दूर राहणेच पसंत करीत आहेत. हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा.

चाैकट...

भूम शहरातही वर्दळ...

ग्रामीण भागासाेबतच भूम शहरामध्येही दिवसभर वर्दळ पाहावयास मिळते. ग्रामीण भागातून कामासाठी येणारे अनेक लाेक मास्कही लावत नाही. फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याकडेही डाेळेझाक केली जात आहे. परिणामी काेराेनाचा धाेका वाढण्याची दाट शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन नगर पालिकेने पुढे येऊन उपाययाेजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अन्यथा हे असेच सुरू राहिल्यास काेराेनाचा संसर्ग कमी हाेण्याऐवजी वाढत जाईल, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.