शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीव्र वळणामुळे वाढला अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:32 IST

(फोटो : अजित २०) तुळजापूर : शहरातील उस्मानाबाद रोडपासून दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर असलेल्या पालिका वाचनालयासमोर तुळजापूर ...

(फोटो : अजित २०)

तुळजापूर : शहरातील उस्मानाबाद रोडपासून दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर असलेल्या पालिका वाचनालयासमोर तुळजापूर (खुर्द) मार्गावरील वळण अतिशय धोकादायक बनले आहे. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे गेले असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित विभागाने उपाययोजना न केल्याने येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुळजापूरहून उस्मानाबाद रोडलगत असलेल्या तुळजापूर (खुर्द) मार्गावरून तडवळा, मोर्डा, धारूर, बामणी (वाडी), केशेगाव, अनसुर्डा, बेंबळी, तेर आदी गावांना याच मार्गावरून प्रवास करावा लागतो. याचबरोबर या मार्गावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखाना येथील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. तुळजापूर खुर्द येथील श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी या मार्गावरूनच भाविकांना जावे लागत असल्याने या मार्गावरून सतत वाहने धावतात. तसेच तुळजापूर ते तुळजापूर खुर्द या मार्गावर वसाहत वाढीमुळे, लोकसंख्या वाढीमुळे नागरिकांचीही सतत रेलचेल असते. यामुळेच सहा महिन्यांपूर्वी तुळजापूर-उस्मानाबाद रोड ते तुळजापूर खुर्द या मार्गाचे कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटीकरण केले आहे. मात्र, तुळजापूर-उस्मानाबाद रोडपासून दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर पालिका वाचनालयाच्या समोर धोकादायक वळण असून, या वळणावरच रस्ता अरुंद असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच येथे दिशादर्शक, तीव्र वळणासंबंधी सूचना फलकदेखील लावण्यात आलेला नाही. यामुळे वाहनचालकांना पुढे धोकादायक वळण असल्याचे लक्षात येत नाही. पादचारी तसेच दुचाकी चालकाला आपला जीव धोक्यात घालून येेथून जावे लागत आहे. त्यामुळे येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

कोट.............

तुळजापूर (खुर्द) मार्गावरील वळण अतिशय धोकादायक बनले आहे. या वळणामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच या मार्गावर समोरून येत असलेले वाहन दिसत नसल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. जमिनीपासून रस्त्याची उंचीदेखील वाढली गेल्याने, एखाद्या वाहन चालकाचा ताबा सुटल्यानंतर ही दुचाकी पडून अपघात होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने येथे तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.

- बालाजी जाधव, रहिवासी, शिवरत्न नगर