शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
4
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
5
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
6
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
7
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
8
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
9
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
10
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
11
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
12
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
13
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
14
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
15
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
16
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
17
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
18
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
19
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
20
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...

आंब्याच्या बागेतून पावणेचार लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST

कळंब : सेवानिवृत्तीनंतर निरामय जीवन जगता यावे यासाठी त्यांनी एका गावात जमीन घेत त्यामध्ये सेंद्रीय पध्दतीने मशागत करून आंब्याची ...

कळंब : सेवानिवृत्तीनंतर निरामय जीवन जगता यावे यासाठी त्यांनी एका गावात जमीन घेत त्यामध्ये सेंद्रीय पध्दतीने मशागत करून आंब्याची बाग जोपासली. मागच्या काही वर्षात त्या बागेने वर्षाला दोनेक लाखाचे उत्पन्न दिले असतानाचा यंदा ही सेंद्रीय बाग पावणेचार लाखाला गेली आहे. फळबाग लागवडीची ही यशोगाथा वयाच्या साठीनंतर साकारली आहे ती डॉ. देवीदास गंभिरे यानी.

कळंब तालुक्यातील ईटकूर येथील प्रा. डॉ. देवीदास बाबूराव गंभिरे यांनी मोठ्या जिद्दीने कमवा व शिका योजनेतून शिक्षण घेत कायम गुणवत्ता राखली. पुढे उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात भूगोल विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले. या ठिकाणी ३५ वर्षे विभागप्रमुख म्हणून काम केलेल्या डॉ. गंभिरे यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे नाव. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षण मंडळाचे पंचवीस वर्षे सदस्य तर पाच वर्षे भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या गंभिरे यांनी शाहू कॉलेजला पाच वर्षे पदव्युत्तरला मार्गदर्शन केले. विविध शोधनिबंध प्रसिद्ध असलेल्या डॉ. देवीदास गंभिरे यांची दोन्ही मुले एमडी डॉक्टर. एक अमेरिकेत तर दुसरा मुंबईत. एक सून सनदी लेखापाल तर एक डॉक्टर. आपली मुले आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करत असतानाच डॉ. देवीदास गंभिरे यांनी सेवानिवृत्तीनंतर करायचे काय, या प्रश्नाचे उत्तरही स्वतःच शोधले अन् स्वतःला शेतीमातीशी रममाण करून घेतले.

खामसवाडीत जमीन घेत केशर, रत्ना आंब्याची लागवड केली. सेंद्रिय जोपासनेतून त्यांनी मागच्या सात-आठ वर्षात दोनेक लाखांचे दरवर्षी उत्पन्न मिळवले. यातच यंदा उच्चांकी असे पावणेचार लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. वयाच्या साठीनंतरही कार्यशील राहत डॉ. गंभिरे यांनी फळबाग शेतीची निर्माण केलेली यशोगाथा उल्लेखनीय अशी आहे.

चौकट...

सेंद्रिय पध्दतीने जोपासली बाग...

डॉ. देवीदास गंभिरे यांनी आपल्या खामसवाडी येथील जमिनीच्या दोन एकर क्षेत्रात आठ बाय आठ मीटर अंतरावर आंब्याची २००७ मध्ये गावरान रोपे लागवड केली. यानंतर दुसऱ्या वर्षी त्यास कलम केले. खड्ड्यात शेताच्या गोठ्यातील काडी कचरा, शेणखताचा सातत्याने वापर केला. ठिबक सिंचनाचा अवलंब करत केवळ उन्हाळ्यात दोन महिने पाण्याची काळजी घेतली. यातून त्यांच्या शंभर रोपाचे मोठ्या आम्रवृक्षात रूपांतर झाले आहे.

मूठभर खत नाही, लाखोंचे उत्पन्न

डॉ. गंभिरे यांनी आपल्या शेतातील केशर, रत्ना आंब्याची बाग जोपासताना मूठभरही रासायनिक खत वापरले नाही. गांडूळ खत व गाईंच्या भुसकटाचा वापर केला. या प्रयत्नाला पत्नी वैशाली गंभिरे यांचीही मोलाची साथ मिळाली. यामध्ये सोयाबीन, उडीद व मूग अशी आंतरपिकेही घेतली जातात. यातून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दोन वर्षांपूर्वी या बागेतील काही आंबा परदेशीही गेला होता.

जेथे जाईल तेथे समरस व्हायचं

यासंदर्भात ‘लोकमत’शी संवाद साधताना डॉ. देवीदास गंभिरे यांनी आपण ज्या क्षेत्रात जाऊ, तेथे समरस व्हायला हवे. मी पण सेवेत असताना तेथे समरस झालो. परत सेवानिवृत्तीनंतर गावाकडे, शेतात रममाण होतो. कमी खर्चात, कमी पाण्यात, कमी मेहनतीमध्ये सातत्यपूर्ण चांगले उत्पन्न देणारी आंबा ही एक फळबाग आहे, असेही त्यांनी सांगितले.