शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन परतीच्या नाेटिसीला शेकडाे करदात्या शेतकऱ्यांचा ठेंगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:25 IST

बालाजी आडसूळ कळंब - शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या ‘पीएम किसान’ योजनेत अपात्र ...

बालाजी आडसूळ

कळंब - शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या ‘पीएम किसान’ योजनेत अपात्र असतानाही शेतकरी म्हणून लाभ घेतलेल्या व्यक्तींची संख्या हजारापार झाल्याचे समोर आले आहे. यात बहुतांश लाभार्थी ‘करदाते’ असून आता त्यांच्यामागे वसुलीचा ससेमिरा लागला आहे.

आजही असंख्य शेतकरी अल्प उत्पन्न गटात मोडतात. यास्थितीत लहरी निसर्गामुळे बेभरवशाची बनलेली शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चित आर्थिक मदतीचा आधार देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली.

यानुसार निकष व अटीमध्ये पात्र असलेल्या प्रत्येक वर्षी सहा हजार रुपयांची मदत देण्यात येते. प्रत्येकी दोन हजार रुपये, याप्रमाणे तीन हप्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्यात येते.

या योजनेतून आजवर मदतीचे आठच्या आसपास हफ्ते जमा करण्यात आले आहेत. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत झाली असली तरी निकषात बसत नसतानाही अपात्र असलेल्या काही व्यक्तींनी ‘ऑनलाईन’ प्रस्ताव दाखल करत, मदत उचलल्याचे समोर आले होते. यामुळे योजनेच्या अटी व निकषात बसत नसलेल्या, परंतु ऑनलाईन प्रक्रियेतून पात्र ठरत अनुदान उचलणाऱ्या लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाने नोटीस बजावत रक्कम तहसिलदार यांच्या खात्यावर जमा करण्याची तंबी दिली आहे.

चौकट....

आत्तापर्यंत चाळीस लाखापेक्षा जास्त वसुली

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत प्रथमतः अल्प भूधारक शेतकऱ्यांना मदतीचे कवच भेटत होते. यानंतर याची व्याप्ती वाढवण्यात आली. यामुळे तालुक्यात या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली.

तालुक्यात जवळपास ६९ हजार शेतकरी खातेदार आहेत. यापैकी ४२ हजार २६४ शेतकरी या योजनेस पात्र आहेत.

यातील ३९ हजार ३३५ शेतकऱ्यांना सध्या थेट पेन्शनचा लाभ मिळत आहे. यात ९९७ करदाते व विविध कारणांमुळे १९७ शेतकरी अपात्र ठरले आहेत.

त्यांच्याकडून ७४ लाख ६२ हजार रुपयांच्या वसुलीची नोटीस बजावण्यात आल्या होत्या. पैकी ४० लाखापेक्षा जास्त रक्कम वसूल झाली आहे.

ते शेतकरी अद्याप प्रतीक्षेत

पात्र ४१ हजार २६४ शेतकऱ्यांपैकी ३९ हजार ३६५ शेतकऱ्यांना सद्या थेट पीएम किसान योजनेच्या आर्थिक मदतीचा लाभ भेटत असला तरी यात दीड हजारावर शेतकरी ‘प्रतीक्षेत’ दिसून येत आहेत. यातील अधिकांश लोकांच्या आधार किंवा इतर तांत्रिक अडचणीवर मार्ग काढणे आवश्यक आहे. काही शेतकऱ्यांना पोर्टलवरील तांत्रिक अडचण, कृषि व महसूल कर्मचाऱ्यांचा तिढा यामुळे मदत मिळत नसल्याचे समजते.

आकडेवारी

पीएम किसान पात्र लाभार्थी

४२२६४

थेट मदत मिळत असेलले लाभार्थी

३९३६५

अपात्र असताना पात्र म्हणून लाभ घेतलेले

११९४

वसुलीसाठी नोटीसा दिलेली रक्कम

७६६२०००

आजवर वसुली झालेली रक्कम

४०१३९०८