शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल बंदीने महिलांची भाजी भाकरी थांबली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:33 IST

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव हे गाव औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर आहे. या रस्त्यावर पारगाव नजीक सहा सात ...

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव हे गाव औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर आहे. या रस्त्यावर पारगाव नजीक सहा सात हॉटेल असून, येथे काम करून अनेकजण आपले उदरनिर्वाह भागवितात. परंतु, आता हॉटेल व्यवसायावर निर्बंध आल्यामुळे येथे काम करणाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

देशभरात कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असून, या अनुषंगाने राज्य शासनाने अनेक प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील मंगळवारपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, हॉटेल चालकांना केवळ पार्सल सेवा पुरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे इतर व्यावसायांप्रमाणेच हॉटेल व्यवसाय देखील अडचणीत सापडले आहेत. पारगाव येथील हॉटेल्स महामार्गावर असल्यामुळे सतत ग्राहकांची वर्दळ असते. येथे इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच महिला देखील भाकळी, पोळी बनविण्यासाठी कामाला येतात. त्यांना दिवसाकाठी तीनशे ते साडेतीनशे रुपये हजेरी मिळते. परंतु, प्रशासनाच्या निर्णयामुळे हॉटेल व्यवसाय निम्यावर आला असून, हा व्यवसाय परवडत नसल्याने अनेकानी कामगार कपात सुरू केली आहे. यामुळे येथील कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चाैकट......

वर्ष कसे काढले आमचे आम्हाला ठाऊक

मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यामुळे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. या कालावधीत प्रत्येकाने आपापल्या परीने इतर पर्याय शोधले होते.

पारगाव येथील शालन बिरू पवार या महिलेने गेल्या लॉकडाऊन कालावधीत हॉटेल व्यवसाय बंद झाल्यानंतर कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी फुटाणे तयार करून विकले. तसेच प्रसंगी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी देखील केली.

प्रतिक्रिया

पतीचे अकाली निधन झाल्याने व मूल लहान असल्याने कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरच आली. त्यामुळे मी हॉटेलमध्ये भाकरी-पोळी बनवून कुटुंबाचा उदर निर्वाह भागविते. मागील वीस वर्षांपासून मी हे काम करीत आहे. गेल्या लॉक डाऊन काळात हॉटेल बंद झाल्याने शेतात काम केले. त्याच बरोबर महिलांचे उन्हाळी काम करून देणे, हरभरे घेऊन फुटाणे तयार करून दिले. आता पुन्हा तीच परिस्थिती उद्‌भवल्याने पुन्हा नवा पर्याय शोधावा लागणार आहे.

- शालन पवार, पारगाव

भाजी भाकरी बनवण्यासाठी मी मागील पाच महिन्यापासून कुटुंबासह येथे आले. गावाकडे शेती आहे. मात्र, माळरान असल्याने पिकत नाही. परंतु, आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आले असून, हॉटेल व्यवसायावर देखील बंधने घालण्यात आली आहेत. येथील काम बंद झाल्यास पुन्हा गावाकडे जाऊन मिळेल ती मोलमजुरीच करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही.

- दीपाली साखरे, रा. शिराळा, जि. लातूर

सरकारने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांची संख्या निम्म्याने कमी झाली आहे. अशा स्थितीत हॉटेल मॅनेजमेंट करताना आर्थिक स्थिती गणित बिघडत आहे. त्यामुळे हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी २५ कर्मचारी असून, उद्यापासून हॉटेल बंद होत असल्याने या सर्वांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे शासनाने अशा कामगारांसाठी पर्यायी उपाय योजना करणे गरजेचे आहे.

- दादा तांबे, व्यवस्थापक