शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

हॉटेल बंदीने महिलांची भाजी भाकरी थांबली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:33 IST

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव हे गाव औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर आहे. या रस्त्यावर पारगाव नजीक सहा सात ...

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव हे गाव औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर आहे. या रस्त्यावर पारगाव नजीक सहा सात हॉटेल असून, येथे काम करून अनेकजण आपले उदरनिर्वाह भागवितात. परंतु, आता हॉटेल व्यवसायावर निर्बंध आल्यामुळे येथे काम करणाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

देशभरात कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असून, या अनुषंगाने राज्य शासनाने अनेक प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील मंगळवारपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, हॉटेल चालकांना केवळ पार्सल सेवा पुरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे इतर व्यावसायांप्रमाणेच हॉटेल व्यवसाय देखील अडचणीत सापडले आहेत. पारगाव येथील हॉटेल्स महामार्गावर असल्यामुळे सतत ग्राहकांची वर्दळ असते. येथे इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच महिला देखील भाकळी, पोळी बनविण्यासाठी कामाला येतात. त्यांना दिवसाकाठी तीनशे ते साडेतीनशे रुपये हजेरी मिळते. परंतु, प्रशासनाच्या निर्णयामुळे हॉटेल व्यवसाय निम्यावर आला असून, हा व्यवसाय परवडत नसल्याने अनेकानी कामगार कपात सुरू केली आहे. यामुळे येथील कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चाैकट......

वर्ष कसे काढले आमचे आम्हाला ठाऊक

मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यामुळे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. या कालावधीत प्रत्येकाने आपापल्या परीने इतर पर्याय शोधले होते.

पारगाव येथील शालन बिरू पवार या महिलेने गेल्या लॉकडाऊन कालावधीत हॉटेल व्यवसाय बंद झाल्यानंतर कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी फुटाणे तयार करून विकले. तसेच प्रसंगी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी देखील केली.

प्रतिक्रिया

पतीचे अकाली निधन झाल्याने व मूल लहान असल्याने कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरच आली. त्यामुळे मी हॉटेलमध्ये भाकरी-पोळी बनवून कुटुंबाचा उदर निर्वाह भागविते. मागील वीस वर्षांपासून मी हे काम करीत आहे. गेल्या लॉक डाऊन काळात हॉटेल बंद झाल्याने शेतात काम केले. त्याच बरोबर महिलांचे उन्हाळी काम करून देणे, हरभरे घेऊन फुटाणे तयार करून दिले. आता पुन्हा तीच परिस्थिती उद्‌भवल्याने पुन्हा नवा पर्याय शोधावा लागणार आहे.

- शालन पवार, पारगाव

भाजी भाकरी बनवण्यासाठी मी मागील पाच महिन्यापासून कुटुंबासह येथे आले. गावाकडे शेती आहे. मात्र, माळरान असल्याने पिकत नाही. परंतु, आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आले असून, हॉटेल व्यवसायावर देखील बंधने घालण्यात आली आहेत. येथील काम बंद झाल्यास पुन्हा गावाकडे जाऊन मिळेल ती मोलमजुरीच करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही.

- दीपाली साखरे, रा. शिराळा, जि. लातूर

सरकारने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांची संख्या निम्म्याने कमी झाली आहे. अशा स्थितीत हॉटेल मॅनेजमेंट करताना आर्थिक स्थिती गणित बिघडत आहे. त्यामुळे हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी २५ कर्मचारी असून, उद्यापासून हॉटेल बंद होत असल्याने या सर्वांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे शासनाने अशा कामगारांसाठी पर्यायी उपाय योजना करणे गरजेचे आहे.

- दादा तांबे, व्यवस्थापक