शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

जिल्ह्यात भूजल साक्षरतेचा चित्ररथ झाला दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:38 IST

उस्मानाबाद : अटल भूजल अर्थात अटल जल योजनेंतर्गत राज्यातील भूजल क्षेत्रातील सुधारणांच्या अनुषंगाने भूजल साक्षरता वाढविण्यासाठी चित्ररथ जिल्ह्यात दाखल ...

उस्मानाबाद : अटल भूजल अर्थात अटल जल योजनेंतर्गत राज्यातील भूजल क्षेत्रातील सुधारणांच्या अनुषंगाने भूजल साक्षरता वाढविण्यासाठी चित्ररथ जिल्ह्यात दाखल झाला आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतर्फे या चित्ररथाची निर्मिती करण्यात आली असून, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथून या चित्ररथाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली आहे.

राज्यातील भूजल क्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने भूजलाची गुणवत्ता आणि उपलब्धता सुधारण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल (अटल जल) योजना राज्यातील १३ जिल्ह्यातील ७३ पाणलोट क्षेत्रातील १३३९ ग्रामपंचायतींमधील १४४३ गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग यांच्या शासन निर्णयानुसार योजनेचे नियोजन, अटी, शर्ती, योजनांची आखणी, प्रशासकीय यंत्रणा इत्यादी बाबीची माहिती अंतर्भूत करण्यात आली आहे. या योजनांतर्गत जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुका ५० व उमरगा तालुक्यातील ५ अशा एकूण ५५ गावांचा समावेश करण्यात आहे.

या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी भूजल सर्वेक्षणचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यामार्फत भूजल साक्षरता चित्ररथाद्वारे प्रबोधन करण्यात येत आहे. या चित्ररथाचे सोलापूर जिल्ह्यातून तामलवाडी येथे सरपंच गवळी आणि इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हस्तांतरण करुन उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दीपकनगर तांडा (ता.उस्मानाबाद) येथे चित्ररथ फिरविण्यात आला.

चित्ररथाच्या आगमनावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते रिबीन कापून आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता (भाप्रसे) यांनी हिरवा झेंडा दाखवून चित्ररथाचे संचलन केले. यावेळी महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती टेकाळे, सहायक भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड, कनिष्ठ भूवैज्ञानिक अमित जिरंगे, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता डी. आर. देवकर, भूवैज्ञानिक शुभांगी गुरवे, मनिषा डोंगरे, तसेच पाणी व स्वच्छता कक्षातील गादगे, मिसाळ आदी उपस्थित होते.