शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

शेतकऱ्यांना पिकांवरील कीड, रोगांची ओळख आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:23 IST

उमरगा : शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करणे काळाची गरज आहे. शेतकऱ्यांना पिकावरील रोग व किडीची ओळख असणे आवश्यक असून, ...

उमरगा : शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करणे काळाची गरज आहे. शेतकऱ्यांना पिकावरील रोग व किडीची ओळख असणे आवश्यक असून, बीजप्रक्रिया करून लागवड करणे फायदेशीर ठरणारे आहे, असे मत शेती शास्त्रज्ञ डॉ. श्रीकृष्ण झगडे यांनी व्यक्त केले.

तालुका कृषी विभाग व शेतकरी शांतिदूत परिवार यांच्या वतीने तालुका व परिसरातील शेतकऱ्यांसाठी खरीप पिके व फळबाग लागवड या विषयावर बुधवारी ‘शेतकरी - शास्त्रज्ञ परिसंवाद’ येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव अध्यक्षस्थानी होते. यावेळी तुळजापूरच्या कृषी विज्ञान केंद्रातील कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सूर्यवंशी, कीडरोग तज्ज्ञ डॉ. श्रीकृष्ण झगडे, फळबाग तज्ज्ञ डॉ. गणेश मंडलिक, मृद शास्त्रज्ञ डॉ. भगवान अरबाड, हवामान तज्ज्ञ नुकुल हरवाडीकर, शांतिदूत परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा विद्याताई जाधव, तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव, माजी कृषी अधिकारी एम.एस. जाधव, प्रा. युसुफ मुल्ला आदींची उपस्थिती होती.

डॉ. भागवत अरबाड यांनी सेंद्रिय खत हा जमिनीचा आत्मा असून, शेतीमध्ये जैविक खताचा वापर करावा व गांडूळ खत शेतीला फायदेशीर असल्याचे सांगितले. डॉ. गणेश मंडलिक यांनी शेतकऱ्यांनी फळबागाला शेतीपूरक व्यवसाय म्हणून पहावे. शेती करण्यापूर्वी माती आणि पाण्याचे परीक्षण महत्त्वाचे असून, रोपे खरेदी करत असताना मान्यताप्राप्त नर्सरीमधूनच घेण्याचे आवाहन केले. हवामान तज्ज्ञ नकुल हरवाडीकर यांनी शेतीपूर्वक हवामानाचा अंदाज व पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली. तुळजापूर येथील कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांनी शेती करत असताना तज्ज्ञांचे मत घ्यावे, असे सांगितले.

डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी शेती व शेतकरी यांना प्रतिष्ठा मिळावी, शेतीमालाला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्षीय समारोपप्रसंगी सांगितले. यावेळी समाजसेविका शकुंतला मोरे, माजी सरपंच विलास व्हटकर, भूमिपुत्र वाघ यांचीही उपस्थिती होती. प्रा. जीवन जाधव, गणेश गरुड, प्रा. अभय हिरास, करीम शेख, किशोर औरादे यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.